शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात ‘मानवी साखळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भरपावसात भूमिपुत्रांनी कल्याण, डोंबिवली व ग्रामीण ...

कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भरपावसात भूमिपुत्रांनी कल्याण, डोंबिवली व ग्रामीण भागात मानवी साखळी आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आता हे आंदोलन शांततेने करीत आहोत. परंतु, या पुढील आंदोलनात संयम ठेवला जाणार नाही, असा इशारा भूमिपुत्रांनी या वेळी सरकारला दिला.

कल्याण पूर्वेतील तीसगावनाका, चक्कीनाका, नेवाळीनाका, आडिवली ढोकळी, द्वारली भाल, काटई, मानपाडा, भोपर, शीळफाटा येथे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले होते. त्यात महिला, ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे लोक तसेच भाजप आमदार गणपत गायकवाड, मनसे आ. राजू पाटील हेदेखील मानवी साखळीत सहभागी झाले होते.

आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, ‘दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भरपावसात भूमिपुत्र रस्त्यावर उतरला आहे. २४ जूनला याच मागणीसाठी सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आता समाजाचा संयम सुटण्याआधीच सरकारने समाजाच्या मागणीचा विचार करावा.’

आ. गायकवाड म्हणाले, ‘विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी योग्य आहे. मात्र, हे सरकार मनमानी करीत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे विविध प्रकल्पांना दिली जात आहे. भूमिपुत्रांचे नेते असलेल्या दि.बा. पाटील यांचेच नाव विमानतळास द्यावे.’ तर, आ. पाटील म्हणाले, ‘विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात सरकारची भेट घेतली होती. मात्र, सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. आता मानवी साखळी शांततेत पार पडली असली, तरी समाज यापुढील आंदोलनात शांतता व संयम ठेवणार नाही.’

आडिवली ढोकळी येथे झालेल्या मानवी साखळीत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, ‘दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या हितासाठी रक्त सांडले होते. त्यांचेच नाव विमानतळास द्यावे. सरकारने याप्रकरणी राजकारण करू नये.’

------------------------