शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात ‘मानवी साखळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भरपावसात भूमिपुत्रांनी कल्याण, डोंबिवली व ग्रामीण ...

कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भरपावसात भूमिपुत्रांनी कल्याण, डोंबिवली व ग्रामीण भागात मानवी साखळी आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आता हे आंदोलन शांततेने करीत आहोत. परंतु, या पुढील आंदोलनात संयम ठेवला जाणार नाही, असा इशारा भूमिपुत्रांनी या वेळी सरकारला दिला.

कल्याण पूर्वेतील तीसगावनाका, चक्कीनाका, नेवाळीनाका, आडिवली ढोकळी, द्वारली भाल, काटई, मानपाडा, भोपर, शीळफाटा येथे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले होते. त्यात महिला, ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे लोक तसेच भाजप आमदार गणपत गायकवाड, मनसे आ. राजू पाटील हेदेखील मानवी साखळीत सहभागी झाले होते.

आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, ‘दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भरपावसात भूमिपुत्र रस्त्यावर उतरला आहे. २४ जूनला याच मागणीसाठी सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आता समाजाचा संयम सुटण्याआधीच सरकारने समाजाच्या मागणीचा विचार करावा.’

आ. गायकवाड म्हणाले, ‘विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी योग्य आहे. मात्र, हे सरकार मनमानी करीत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे विविध प्रकल्पांना दिली जात आहे. भूमिपुत्रांचे नेते असलेल्या दि.बा. पाटील यांचेच नाव विमानतळास द्यावे.’ तर, आ. पाटील म्हणाले, ‘विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात सरकारची भेट घेतली होती. मात्र, सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. आता मानवी साखळी शांततेत पार पडली असली, तरी समाज यापुढील आंदोलनात शांतता व संयम ठेवणार नाही.’

आडिवली ढोकळी येथे झालेल्या मानवी साखळीत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, ‘दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या हितासाठी रक्त सांडले होते. त्यांचेच नाव विमानतळास द्यावे. सरकारने याप्रकरणी राजकारण करू नये.’

------------------------