शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात ‘मानवी साखळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भरपावसात भूमिपुत्रांनी कल्याण, डोंबिवली व ग्रामीण ...

कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भरपावसात भूमिपुत्रांनी कल्याण, डोंबिवली व ग्रामीण भागात मानवी साखळी आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आता हे आंदोलन शांततेने करीत आहोत. परंतु, या पुढील आंदोलनात संयम ठेवला जाणार नाही, असा इशारा भूमिपुत्रांनी या वेळी सरकारला दिला.

कल्याण पूर्वेतील तीसगावनाका, चक्कीनाका, नेवाळीनाका, आडिवली ढोकळी, द्वारली भाल, काटई, मानपाडा, भोपर, शीळफाटा येथे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले होते. त्यात महिला, ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे लोक तसेच भाजप आमदार गणपत गायकवाड, मनसे आ. राजू पाटील हेदेखील मानवी साखळीत सहभागी झाले होते.

आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, ‘दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भरपावसात भूमिपुत्र रस्त्यावर उतरला आहे. २४ जूनला याच मागणीसाठी सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आता समाजाचा संयम सुटण्याआधीच सरकारने समाजाच्या मागणीचा विचार करावा.’

आ. गायकवाड म्हणाले, ‘विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी योग्य आहे. मात्र, हे सरकार मनमानी करीत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे विविध प्रकल्पांना दिली जात आहे. भूमिपुत्रांचे नेते असलेल्या दि.बा. पाटील यांचेच नाव विमानतळास द्यावे.’ तर, आ. पाटील म्हणाले, ‘विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात सरकारची भेट घेतली होती. मात्र, सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. आता मानवी साखळी शांततेत पार पडली असली, तरी समाज यापुढील आंदोलनात शांतता व संयम ठेवणार नाही.’

आडिवली ढोकळी येथे झालेल्या मानवी साखळीत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, ‘दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या हितासाठी रक्त सांडले होते. त्यांचेच नाव विमानतळास द्यावे. सरकारने याप्रकरणी राजकारण करू नये.’

------------------------