शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंगठेबहाद्दरांच्या फौजेने कशी होणार महासत्ता?

By संदीप प्रधान | Updated: May 13, 2024 10:35 IST

अंगठाबहाद्दरांची फौज घेऊन देश ना विकसित राष्ट्र होईल ना विश्वगुरू. मात्र याबद्दल प्रचारात अवाक्षर नाही हेच आपले दुर्दैव आहे.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानात ठाणे जिल्ह्यातील १५ ते ६६ वयोगटातील १३ हजार ७७ निरक्षर पुरुष, महिला, मुले, मुली साक्षर झाले. ही सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कोलाहलात फारशी कुणाच्या कानात न शिरलेली बातमी आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत १७ मार्च २०२४ रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल लागला. अन्य जिल्ह्यांत असेच अनेक जण उत्तीर्ण झाले असतील. निवडणूक आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांचे व नेत्यांचे कोट्यवधी रुपये या जुगारात लागल्यामुळे आता अनेकजण एकेरीवर आले आहेत. त्यांचे हे वर्तन त्यांनी प्रतिज्ञापत्रात दावा केलेल्या पदव्यांच्या विपरीत आहे. अशिक्षितेसारख्या मूलभूत प्रश्नावर बोलायला उमेदवार व नेत्यांना फुरसत नाही. मात्र भारत २०४७ साली किंवा त्यापूर्वी जर विकसित राष्ट्र व्हावा, असे वाटत असेल तर अशिक्षिततेच्या अंधाऱ्या गुहेत चाचपडत असलेल्या या जनतेला जलद गतीने शिक्षणाचा प्रकाश दाखवावा लागेल.

ठाणे जिल्हा हा तुलनेने बराच प्रगत जिल्हा आहे. येथील ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर वगैरे शहरी भाग आहे. येथे मॉल, मल्टिप्लेक्सपासून हॉटेल, पब आहेत. या शहरी भागातही काही अंशी निरक्षर असू शकतात. शहरी भागाला खेटूनच ग्रामीण भाग आहे. मुरबाड, शहापूर वगैरे परिसरात आदिवासी पाडे आहेत. तेथे निरक्षरांची संख्या अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या परीक्षेत १० हजार २४८ महिला उत्तीर्ण झाल्या, ही सर्वांत समाधानाची बाब आहे. घरातील महिलेस अक्षर ओळख झाली, ती शिकली तर घरातील मुले, मुली नक्की शिकणार. शिक्षण नसल्याने भिवंडी, मुरबाड, शहापूर किंवा शेजारील पालघर जिल्ह्यात वीटभट्टीवर आठवड्याला जेमतेम ५०० रुपये रोजगारावर वीटभट्टी मजुरांना वेठबिगार म्हणून राबवले जाते. त्यांच्या कुटुंबातील महिला, मुलींचे शोषण केले जाते. 

विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखालील श्रमजीवी संघटनेने काही प्रकरणात कारवाई करण्यास भाग पाडले आहे. परंतु जोपर्यंत आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत नाही तोपर्यंत आपले शोषण होत असल्याचे त्यांच्या लक्षात येणार नाही.

भोंदूगिरी करणाऱ्यांकरिता असा अशिक्षित वर्ग ही मोठी ‘बाजारपेठ’ आहे. ‘पुढे पोलिस आहेत त्यामुळे अंगावरील दागिने काढून कागदाच्या पुडीत ठेवा’, असे सांगून फसवणूक होणारे वृद्ध हे बहुतांशी अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असतात. आता तर उच्चशिक्षित लोकांचीही सायबर ठगांकडून फसवणूक होतेय. देशाने २०४७ पूर्वी विकसित राष्ट्र व्हावे असे वाटत असेल तर अशिक्षितता संपवणे हाच मार्ग असू शकतो. अंगठाबहाद्दरांची फौज घेऊन देश ना विकसित राष्ट्र होईल ना विश्वगुरू. मात्र याबद्दल प्रचारात अवाक्षर नाही हेच आपले दुर्दैव आहे.

 

टॅग्स :Politicsराजकारण