शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
4
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
6
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
7
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
8
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
9
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
10
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
11
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
12
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
13
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
14
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
15
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
16
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
17
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
18
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
19
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
20
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...

अंगठेबहाद्दरांच्या फौजेने कशी होणार महासत्ता?

By संदीप प्रधान | Updated: May 13, 2024 10:35 IST

अंगठाबहाद्दरांची फौज घेऊन देश ना विकसित राष्ट्र होईल ना विश्वगुरू. मात्र याबद्दल प्रचारात अवाक्षर नाही हेच आपले दुर्दैव आहे.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानात ठाणे जिल्ह्यातील १५ ते ६६ वयोगटातील १३ हजार ७७ निरक्षर पुरुष, महिला, मुले, मुली साक्षर झाले. ही सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कोलाहलात फारशी कुणाच्या कानात न शिरलेली बातमी आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत १७ मार्च २०२४ रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल लागला. अन्य जिल्ह्यांत असेच अनेक जण उत्तीर्ण झाले असतील. निवडणूक आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांचे व नेत्यांचे कोट्यवधी रुपये या जुगारात लागल्यामुळे आता अनेकजण एकेरीवर आले आहेत. त्यांचे हे वर्तन त्यांनी प्रतिज्ञापत्रात दावा केलेल्या पदव्यांच्या विपरीत आहे. अशिक्षितेसारख्या मूलभूत प्रश्नावर बोलायला उमेदवार व नेत्यांना फुरसत नाही. मात्र भारत २०४७ साली किंवा त्यापूर्वी जर विकसित राष्ट्र व्हावा, असे वाटत असेल तर अशिक्षिततेच्या अंधाऱ्या गुहेत चाचपडत असलेल्या या जनतेला जलद गतीने शिक्षणाचा प्रकाश दाखवावा लागेल.

ठाणे जिल्हा हा तुलनेने बराच प्रगत जिल्हा आहे. येथील ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर वगैरे शहरी भाग आहे. येथे मॉल, मल्टिप्लेक्सपासून हॉटेल, पब आहेत. या शहरी भागातही काही अंशी निरक्षर असू शकतात. शहरी भागाला खेटूनच ग्रामीण भाग आहे. मुरबाड, शहापूर वगैरे परिसरात आदिवासी पाडे आहेत. तेथे निरक्षरांची संख्या अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या परीक्षेत १० हजार २४८ महिला उत्तीर्ण झाल्या, ही सर्वांत समाधानाची बाब आहे. घरातील महिलेस अक्षर ओळख झाली, ती शिकली तर घरातील मुले, मुली नक्की शिकणार. शिक्षण नसल्याने भिवंडी, मुरबाड, शहापूर किंवा शेजारील पालघर जिल्ह्यात वीटभट्टीवर आठवड्याला जेमतेम ५०० रुपये रोजगारावर वीटभट्टी मजुरांना वेठबिगार म्हणून राबवले जाते. त्यांच्या कुटुंबातील महिला, मुलींचे शोषण केले जाते. 

विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखालील श्रमजीवी संघटनेने काही प्रकरणात कारवाई करण्यास भाग पाडले आहे. परंतु जोपर्यंत आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत नाही तोपर्यंत आपले शोषण होत असल्याचे त्यांच्या लक्षात येणार नाही.

भोंदूगिरी करणाऱ्यांकरिता असा अशिक्षित वर्ग ही मोठी ‘बाजारपेठ’ आहे. ‘पुढे पोलिस आहेत त्यामुळे अंगावरील दागिने काढून कागदाच्या पुडीत ठेवा’, असे सांगून फसवणूक होणारे वृद्ध हे बहुतांशी अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असतात. आता तर उच्चशिक्षित लोकांचीही सायबर ठगांकडून फसवणूक होतेय. देशाने २०४७ पूर्वी विकसित राष्ट्र व्हावे असे वाटत असेल तर अशिक्षितता संपवणे हाच मार्ग असू शकतो. अंगठाबहाद्दरांची फौज घेऊन देश ना विकसित राष्ट्र होईल ना विश्वगुरू. मात्र याबद्दल प्रचारात अवाक्षर नाही हेच आपले दुर्दैव आहे.

 

टॅग्स :Politicsराजकारण