शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अंगठेबहाद्दरांच्या फौजेने कशी होणार महासत्ता?

By संदीप प्रधान | Updated: May 13, 2024 10:35 IST

अंगठाबहाद्दरांची फौज घेऊन देश ना विकसित राष्ट्र होईल ना विश्वगुरू. मात्र याबद्दल प्रचारात अवाक्षर नाही हेच आपले दुर्दैव आहे.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानात ठाणे जिल्ह्यातील १५ ते ६६ वयोगटातील १३ हजार ७७ निरक्षर पुरुष, महिला, मुले, मुली साक्षर झाले. ही सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कोलाहलात फारशी कुणाच्या कानात न शिरलेली बातमी आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत १७ मार्च २०२४ रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल लागला. अन्य जिल्ह्यांत असेच अनेक जण उत्तीर्ण झाले असतील. निवडणूक आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांचे व नेत्यांचे कोट्यवधी रुपये या जुगारात लागल्यामुळे आता अनेकजण एकेरीवर आले आहेत. त्यांचे हे वर्तन त्यांनी प्रतिज्ञापत्रात दावा केलेल्या पदव्यांच्या विपरीत आहे. अशिक्षितेसारख्या मूलभूत प्रश्नावर बोलायला उमेदवार व नेत्यांना फुरसत नाही. मात्र भारत २०४७ साली किंवा त्यापूर्वी जर विकसित राष्ट्र व्हावा, असे वाटत असेल तर अशिक्षिततेच्या अंधाऱ्या गुहेत चाचपडत असलेल्या या जनतेला जलद गतीने शिक्षणाचा प्रकाश दाखवावा लागेल.

ठाणे जिल्हा हा तुलनेने बराच प्रगत जिल्हा आहे. येथील ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर वगैरे शहरी भाग आहे. येथे मॉल, मल्टिप्लेक्सपासून हॉटेल, पब आहेत. या शहरी भागातही काही अंशी निरक्षर असू शकतात. शहरी भागाला खेटूनच ग्रामीण भाग आहे. मुरबाड, शहापूर वगैरे परिसरात आदिवासी पाडे आहेत. तेथे निरक्षरांची संख्या अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या परीक्षेत १० हजार २४८ महिला उत्तीर्ण झाल्या, ही सर्वांत समाधानाची बाब आहे. घरातील महिलेस अक्षर ओळख झाली, ती शिकली तर घरातील मुले, मुली नक्की शिकणार. शिक्षण नसल्याने भिवंडी, मुरबाड, शहापूर किंवा शेजारील पालघर जिल्ह्यात वीटभट्टीवर आठवड्याला जेमतेम ५०० रुपये रोजगारावर वीटभट्टी मजुरांना वेठबिगार म्हणून राबवले जाते. त्यांच्या कुटुंबातील महिला, मुलींचे शोषण केले जाते. 

विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखालील श्रमजीवी संघटनेने काही प्रकरणात कारवाई करण्यास भाग पाडले आहे. परंतु जोपर्यंत आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत नाही तोपर्यंत आपले शोषण होत असल्याचे त्यांच्या लक्षात येणार नाही.

भोंदूगिरी करणाऱ्यांकरिता असा अशिक्षित वर्ग ही मोठी ‘बाजारपेठ’ आहे. ‘पुढे पोलिस आहेत त्यामुळे अंगावरील दागिने काढून कागदाच्या पुडीत ठेवा’, असे सांगून फसवणूक होणारे वृद्ध हे बहुतांशी अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असतात. आता तर उच्चशिक्षित लोकांचीही सायबर ठगांकडून फसवणूक होतेय. देशाने २०४७ पूर्वी विकसित राष्ट्र व्हावे असे वाटत असेल तर अशिक्षितता संपवणे हाच मार्ग असू शकतो. अंगठाबहाद्दरांची फौज घेऊन देश ना विकसित राष्ट्र होईल ना विश्वगुरू. मात्र याबद्दल प्रचारात अवाक्षर नाही हेच आपले दुर्दैव आहे.

 

टॅग्स :Politicsराजकारण