शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

करवसुलीच्या खाजगीकरणाचा मार्ग मोकळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:29 IST

काँग्रेस सरकारच्या काळात शहरातील कापड उद्योगास नियमित वीज मिळावी

पंढरीनाथ कुंभार, भिवंडी

भिवंडी महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत आधीच मर्यादित आहेत. त्यातच ५० टक्केही करवसुली होत नसल्याने शहरातील विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे. विकासकामे आणि नागरी सुविधांची पूर्तता करण्यासाठी करवसुलीत वाढ करण्याचे प्रयत्न महापौर दळवी यांनी सुरू केले होते. त्याचसाठी त्यांनी मनपाच्या करवसुली विभागाचे खाजगीकरण करण्याचे ठरवले होते. पण, नगरसेवकांनी त्याला विरोध करत ५० टक्के वसुलीबाबत काही नगरसेवकांनी लिहून दिल्याचे पालिका सूत्राने सांगितले.

दरम्यान, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कर भरावा, यासाठी मनपा आयुक्त मनोहर हिरे यांनी दोन वेळा अभय योजना जाहीर करून व्याज माफ केले. तरीही ३४४ कोटींंची मागणी असताना केवळ ६३ कोटी ६१ लाख रुपये वसुली झाली आहे, अशी माहिती कर विभागातील सहायक आयुक्त दिलीप खाने यांनी दिली. शहर विकासासाठी पालिकेला करवसुलीचा एकमेव मार्ग आहे. मात्र कमी वसुली होत असल्याने शहरातील विकास खुंटला आहे. करवसुली कमी होण्यास बऱ्याच अंशी पालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. बरेचदा स्थानिक राजकरणातून करवसुलीमध्ये खोडा घालण्यात येतो. वास्तविक अधिकाऱ्यांनी अशा दबावाला भीक घालण्याची गरज नाही. मात्र ही परिस्थिती बदलत नसल्याने त्याचा परिणाम विकासावर झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या करविभागाचे खाजगीकरण हा शेवटचा मार्ग उरला आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात शहरातील कापड उद्योगास नियमित वीज मिळावी आणि वीज थकबाकी वसूल व्हावी, यानिमित्ताने टोरंट वीज कंपनीस शहरातील वीज ग्राहकांस वीजपुरवठा करून त्यांच्याकडून वीजबिल वसुली करण्यासाठी फ्रॅन्चायसी दिली आहे. शहरात वीजपुरवठा करण्यासाठी मराविवि कंपनीने पूर्वीपासून पालिकेच्या जागेवर स्वत:च्या साधनांचे जाळे पसरले आहे. त्याचा उपयोग फ्रॅन्चायसी मिळाली म्हणून टोरंट पॉवर करत आहे. असे असताना मनपाचे माजी आयुक्त योगेश म्हसे यांनी शहरातील वीजपुरवठ्यासाठी मनपाच्या जागेचा वापर करते म्हणून टोरंट कंपनीस २००७ ते २०१७ पर्यंतचा मालमत्ताकर म्हणून २८५ कोटींची आकारणी केली. वास्तविक या सर्व साधनांचे मूळ मालक शासनाची वीज वितरण कंपनी आहे. त्यामुळे हा विषय शासनदरबारी गेला. त्यावेळी सरकारने सात दिवसांची स्थगिती दिली. तसेच पुढील सुनावणी राज्याच्या नगरविकास विभागाने ठेवली. त्यादरम्यान टोरंट पॉवर कंपनीचे व्यवस्थापन व मनपाचे प्रशासन यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली. दरम्यान, फेब्रुवारी २०१९ मध्ये शासनाने मनपाच्या आदेशाचे निलंबन केले होते.

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मनपाने बजावलेली नोटीस लोकहिताविरुद्ध असल्याचा अधिकृत निर्णय देत राज्य शासनाने पालिकेची नोटीस रद्द केली. त्यामुळे या रकमेची अपेक्षा धरून बसलेले मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा अपेक्षाभंग झाला. हे प्रकरण वादग्रस्त असल्याने महापालिकेने आपल्या २०१९-२० च्या मूळ अर्थसंकल्पात ही वसुली नमूद न करता इतर वसुलीमध्ये त्याची नोंद केली. त्यामुळे अर्थसंकल्पात फुगवटा निर्माण झाला नाही. अर्थसंकल्पात नमूद केलेल्या वसुलीतील ५० टक्के वसुली न झाल्याने करवसुली विभागाचे खाजगीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने २० डिसेंबर २०१८ रोजी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महापालिका यांच्याकडून आकारण्यात येणाºया करामधून शासकीय विद्युत कंपन्यांना वगळण्यात आल्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे. असे असताना भिवंडी महापालिकेने टोरंट कंपनीला थकीत मालमत्ताकराच्या वसुलीसाठी बजावलेली नोटीस रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय चुकीचा असून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे महापौर दळवी यांनी सांगितले. त्यामुळे ही करवसुलीची लढाई न्यायालयात सुरू होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. पण शहरातील धनधांडग्यांकडे असलेली थकीत करवसुली होत नाही, याकडे कोण लक्ष देणार? ही बाजूही यानिमित्ताने तेवढीच महत्त्वाची आहे.कर भरण्याबाबत नागरिक उदासीनता दाखवत असल्याने भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या तिजोरीवर ताण येत आहे. ५० टक्केही करवसुली होत नसल्याने महापौर जावेद दळवी यांनी करवसुली विभागाचे खाजगीकरण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर दोन वेळा अभय योजना आणूनही काही फायदा झाला नाही. त्यातच शासनाने टोरंट कंपनीला करमाफी दिल्याने करवसुलीचे गणितच कोलमडून पडले आहे. त्यामुळे करवसुली विभागाचे खाजगीकरण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :thaneठाणेMIDCएमआयडीसी