शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

'कोण किती कमावत, त्यापेक्षा समाजासाठी किती...'; मोहन भागवतांचा विद्यार्थ्यांशी संवाद

By नितीन पंडित | Updated: January 26, 2025 15:50 IST

भिवंडी : देश प्रगती करत आहे विश्वात देशाचा गौरव होत आहे हा सन्मान फक्त आणि फक्त देशातील सजक नागरिकांमुळे ...

भिवंडी: देश प्रगती करत आहे विश्वात देशाचा गौरव होत आहे हा सन्मान फक्त आणि फक्त देशातील सजक नागरिकांमुळे शक्य होत आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. ते भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे  संस्थाध्यक्ष विजय जाधव,कार्याध्यक्ष बी डी काळे,उपाध्यक्ष अरुणा जाधव,सरचिटणीस रोहित जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम भोईर, मुख्याध्यापक सुधीर घागस उपस्थित होते. तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी आरएसएस संघ स्वयंसेवक, प्रतिष्ठित नागरिक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.         'या संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी त्यागपूर्वक समाजासाठी कार्य केले. असेच अनेकांनी देशासाठी त्याग केला आज आपण आपल्या कर्तव्यासह जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परंपरांची  जपणूक करीत बंधुभावाने जगणे हाच खरा धर्म आहे', असे मोहन भागवत म्हणाले. 

कोण किती कमावतो... 

'समाजाचे सहयोग घेऊन समाजासाठी कार्य करणे हाच खरा धर्म आहे.देश पुढे जात असताना येथील भारतीयांची प्रतिष्ठा वाढली असून कोण किती कमावत त्यापेक्षा समाजासाठी किती वाटतो त्यावर माणसाची प्रतिष्ठा ओळखली जाते असे सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीत यश मिळवून त्याचा समाजासाठी उपयोग करावा', असा संदेश मोहन भागवत यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेतर्फे विजय जाधव यांनी डॉ मोहन भागवत यांना रामलल्लाच्या मूर्ती सोबत संस्थापक अण्णासाहेब जाधव यांचे चरित्र भेट देऊन त्यांचा सन्मान केला. तर प्रास्ताविकात कार्याध्यक्ष बी. डी. काळे यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा परिचय दिला. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४bhiwandiभिवंडी