शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती बळी हवेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:42 IST

पश्चिमेकडील कर्णिक रोडवर गेल्या महिन्यात एका शाळकरी मुलाला अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागला होता.

कल्याण : पश्चिमेकडील कर्णिक रोडवर गेल्या महिन्यात एका शाळकरी मुलाला अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, यातून केडीएमसी प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. याची प्रचीती आधारवाडी जेल रोडची दयनीय अवस्था पाहताना येते. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम तर अपूर्ण राहिलेच, पण त्याचबरोबर यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे येथून जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागते आहे. याशिवाय, येथील धुळीमुळे या परिसरात राहणाºया नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. एकंदरीत परिस्थिती बघता प्रशासन आणखीन बळी जाण्याची वाट बघते आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.आधारवाडी चौकाची गणना महत्त्वाच्या चौकांत केली जाते. मुंबई-मुरबाड-नगर मार्ग आणि नाशिक मार्ग जोडणारे रस्ते या चौकातून जात असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. यात दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचाही समावेश आहे. यामुळे अनेकदा या चौकात सकाळ-संध्याकाळ वाहतूककोंडीचे चित्रही कायम दिसून येते. चौकातून जाणाºया आधारवाडी जेल रोडची अवस्था अत्यंत बिकट आहे. संथगतीने सुरू असलेले या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्णपणे खोळंबले आहे. पावसाळ्यात या रस्त्याची पुरती चाळण झाली होती. गणेशोत्सवात काही प्रमाणात डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न झाला, पण त्यानंतरही रस्त्यांची खड्डेमय अवस्था ‘जैसे थे’ राहिली आहे. गेले अनेक महिने ही परिस्थिती अशीच असूनही महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.जीवघेण्या खड्ड्यांमधून वाट काढणे बिकट बनले असताना धुळीचा प्रचंड त्रास पादचारी आणि रहिवाशांना सहन करावा लागतो आहे. या भागातील टोलेजंग इमारतीपर्यंत काँक्रिटीकरणाचे काम झालेले आहे, मग पुढील चाळी आणि घरांसमोरील रस्त्याकडे झालेला कानाडोळा यामागचे गौडबंगाल काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. जर आताच रस्त्याची अवस्था दयनीय असेल, तर पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनणार आहे. स्थानिक नगरसेवक वरुण पाटील यांच्या म्हणण्यानुसार महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. २०१४-१५ मध्ये काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते, पण प्रशासनाची मानसिकता नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. काही तांत्रिक अडचणी असतील, तर निदान डांबराने तरी खड्डे भरावेत, जेणेकरून रस्ता सुस्थितीत होईल, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे पाटील यांनी सांगितले.