शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

आणखी किती बळी हवेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:42 IST

पश्चिमेकडील कर्णिक रोडवर गेल्या महिन्यात एका शाळकरी मुलाला अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागला होता.

कल्याण : पश्चिमेकडील कर्णिक रोडवर गेल्या महिन्यात एका शाळकरी मुलाला अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, यातून केडीएमसी प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. याची प्रचीती आधारवाडी जेल रोडची दयनीय अवस्था पाहताना येते. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम तर अपूर्ण राहिलेच, पण त्याचबरोबर यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे येथून जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागते आहे. याशिवाय, येथील धुळीमुळे या परिसरात राहणाºया नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. एकंदरीत परिस्थिती बघता प्रशासन आणखीन बळी जाण्याची वाट बघते आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.आधारवाडी चौकाची गणना महत्त्वाच्या चौकांत केली जाते. मुंबई-मुरबाड-नगर मार्ग आणि नाशिक मार्ग जोडणारे रस्ते या चौकातून जात असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. यात दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचाही समावेश आहे. यामुळे अनेकदा या चौकात सकाळ-संध्याकाळ वाहतूककोंडीचे चित्रही कायम दिसून येते. चौकातून जाणाºया आधारवाडी जेल रोडची अवस्था अत्यंत बिकट आहे. संथगतीने सुरू असलेले या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्णपणे खोळंबले आहे. पावसाळ्यात या रस्त्याची पुरती चाळण झाली होती. गणेशोत्सवात काही प्रमाणात डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न झाला, पण त्यानंतरही रस्त्यांची खड्डेमय अवस्था ‘जैसे थे’ राहिली आहे. गेले अनेक महिने ही परिस्थिती अशीच असूनही महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.जीवघेण्या खड्ड्यांमधून वाट काढणे बिकट बनले असताना धुळीचा प्रचंड त्रास पादचारी आणि रहिवाशांना सहन करावा लागतो आहे. या भागातील टोलेजंग इमारतीपर्यंत काँक्रिटीकरणाचे काम झालेले आहे, मग पुढील चाळी आणि घरांसमोरील रस्त्याकडे झालेला कानाडोळा यामागचे गौडबंगाल काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. जर आताच रस्त्याची अवस्था दयनीय असेल, तर पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनणार आहे. स्थानिक नगरसेवक वरुण पाटील यांच्या म्हणण्यानुसार महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. २०१४-१५ मध्ये काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते, पण प्रशासनाची मानसिकता नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. काही तांत्रिक अडचणी असतील, तर निदान डांबराने तरी खड्डे भरावेत, जेणेकरून रस्ता सुस्थितीत होईल, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे पाटील यांनी सांगितले.