शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

 राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल

By अजित मांडके | Updated: December 6, 2023 20:02 IST

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या ढेरी वरून टीका केल्यानंतर परांजपे यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे.

ठाणे: वैयक्तिक टीकेवरून जितेंद्र आव्हाड यांना त्रास झाला. मात्र त्यांनी आता पर्यंत राज्यातील किती नेत्यांवर वयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली याची आठवण आता आम्ही करू देऊ का असा सवाल करीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या ढेरी वरून टीका केल्यानंतर परांजपे यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते. 

अजित पवार यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले त्यावेळी मी पुढे होतो असे आव्हाड म्हणतात. मात्र त्यावेळी अजित पवार यांना आव्हाड यांची गरज नव्हती, आव्हाड याना स्वतःची ओळख हवी होती, महाराष्ट्रात त्यांना कोण ओळखत नव्हते म्हणून त्यांनी स्वतःची पोळी भाजण्याचे काम केल्याची टीकाही परांजपे यांनी केली. २००९ मध्ये जेव्हा आव्हाड पहिल्यांदा निवडून आले होते, तेव्हा त्यांच्या मतदार संघात सर्वात जास्त निधी हा अजित पवार यांनीच दिला होता याची आठवण ही त्यांनी करून दिली. विनय भणाची केस होती, तेव्हा आपण आमदारकीचा राजीनामा दिला होता तेव्हा तुमची मनधरणी करायला तुमच्या बंगल्यावर अजित पवार साडेतीन तास हजर होता हे विसरलात का ? असा सवालही त्यांनी केला. आपण केवळ अजित पवार यांचा द्वेश करीत आला आहात आजही तेच करत असल्याचे ही ते म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड