शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

झाडांवर किती दिवस दीपमाळा गुंडाळायच्या? 

By संदीप प्रधान | Updated: April 15, 2024 08:19 IST

ठाण्यात गुढीपाडवा, दसरा, दिवाळी अशा वेगवेगळ्या सणांच्या वेळी गल्लोगल्ली रोषणाई करण्याची हौस वाढली आहे.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहाय्यक संपादक

ठाण्यात गुढीपाडवा, दसरा, दिवाळी अशा वेगवेगळ्या सणांच्या वेळी गल्लोगल्ली रोषणाई करण्याची हौस वाढली आहे. झाडांवर दिव्यांच्या माळा सोडायच्या किंवा झाडांना दीपमाळा गुंडाळायच्या आणि परिसरात झगमगाट करायचा, हे करण्याकडे राजकीय नेते व महापालिकेचा कल आहे. ठाण्यातील दक्ष नागरिक रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. झाडांवर पक्षी, कीटक व काही प्राणी वास्तव्य करतात. त्यांच्या जीवनचक्रात या रोषणाईमुळे हस्तक्षेप होतो. प्रखर दिव्यांमुळे त्यांना त्रास होतो. अनेकदा अशा रोषणाईमुळे पक्षी या झाडांवर घरटी करत नाहीत. दिव्यांच्या रोषणाईच्या प्रखर प्रकाशाने काही कीटक, सरडे यांना हानी पोहोचते.

माणूस हा शक्तिशाली असल्याने तो आपल्याला अनुकूल अशा निर्णयांची अंमलबजावणी करताना आजूबाजूच्या जीवसृष्टीवर आपल्या निर्णयांचा काय परिणाम होईल, याचा विचारही करीत नाही. अनेक छोटे कीटक, सरपटणारे प्राणी हे तर अनेकांच्या खिजगणतीतच नसतात. साहजिकच अशा मंडळींना जोशी यांची याचिका अनावश्यक वाटू शकते. ठाणे शहर सणासुदीला सजले असताना त्यात अपशकुन करण्याचा हा प्रयत्न असल्याची काहींची भावना असू शकते. आमच्याच सणांच्या वेळी हे जैवविविधता प्रेम का उफाळून येते, असा अगोचर सवाल करण्याची फॅशन हल्ली वाढली आहे. मात्र त्याला काही अर्थ नाही.

शहरीकरणाच्या रेट्यात अनेक पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांचे अस्तित्व आपण संपवत आहोत. ज्याप्रमाणे माणसाने बिबट्यांच्या अधिवासात घुसखोरी केल्यामुळे बिबटे मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसाच हा रोषणाईचा सोस आहे. अनेक हॉटेल, रिसॉर्ट आपले ब्रँडिंग होऊन ग्राहकांनी आपल्याकडे यावे याकरिता आपल्या प्रवेशद्वारालगत असलेल्या झाडांवर बारा महिने चोवीस तास रोषणाई करतात. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात भर रस्त्यात मंडप घालून सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. अशा वेळी या झाडांवरच हॅलोजन चढवले जातात. अत्यंत प्रखर प्रकाशामुळे त्या झाडावरील पक्ष्यांची घरटी, सरडे, काही कीटक हे पोळून नष्ट होतात; पण कंबर मोडून नाचण्याच्या किंवा गरबाच्या उन्मादात याची जाणीव कुणालाच होत नसेल.

न्यायालयात हा विषय गेल्यावर आता ठाणे महापालिका आपली परवानगी न घेता झाडांवर रोषणाई केली जात असल्याचा दावा करते. मात्र दिवाळीत खुद्द महापालिकाच रोषणाई करते, हे उघड झाल्याने महापालिकेचे पितळ उघडे झाले. कल्याण-डोंबिवलीतही महापालिकेला आता न्यायालयाच्या दणक्याची जाणीव झाल्यावर जाग आली. झाडांवर रोषणाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करताना अधिकारी ‘कुणी तक्रार केली तर...’, असे पालुपद लावतात. यावरून प्रशासन याबाबत किती बेफिकीर आहे, हेच दिसून येते.

टॅग्स :thaneठाणे