शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो कारशेडमधील बाधीत शेतकऱ्यांना मोबदला कसा मिळणार; आमदार सरनाईक यांनी उपस्थित केले प्रश्न

By अजित मांडके | Updated: September 8, 2023 16:34 IST

घोडबंदर भागातील मोघरपाडा भागात असलेल्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे.

ठाणे: घोडबंदर भागातील मोघरपाडा भागात असलेल्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार जागा हस्तांतरण करण्यासाठी पावले उचलली आहेत. परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मोबदला किती मिळणार, कशा स्वरुपात मिळणार?, तसेच जी जमीन शासनाकडून मिळणार त्यावर किती बांधकाम करायचे याची उत्तरे अद्याप मिळाली नसल्याची माहिती ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी एम.एम.आर.डी.ए. व महसुल खात्याच्या अधिकाऱ्यांसह पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या बैठकीत नवी मुंबईच्या धर्तीवर २२.५ टक्के विकसित जमिन शेतकऱ्यांना देण्याची भुमिका शासनाने जाहिर केली व त्यानुसार महसुल खात्याने कार्यवाही देखील चालू केली. या आठवड्यामध्ये झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मोघरपाडा येथील ज्या शेतकऱ्यांच्या नावे जमिन असून कसत असलेल्या शेतकऱ्यांना २२.५ टक्के व शेजजमिन ताब्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना १२.५ टक्के मोबदला देण्यासंदर्भात निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. परंतु काही शेतकऱ्यांकडे ६४ गुंठ्यांपेक्षा जास्त जमिन ताब्यात असून त्यावर शेती व्यवसाय करीत असल्याने नक्की किती जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळणार?, हा मोबदला देत असताना जमिन नक्की कुठे व विकसित म्हणजे कशा स्वरूपात देणार?, जी जमिन शासनाकडून शेतकऱ्याला मिळणार त्या जमिनीवर किती क्षेत्रफळाचे बांधकाम अनुज्ञेय होणार आहे? व ते नकाशे ठाणे महानगरपालिकेकडून किंवा एम.एम.आर.डी.ए. कडून मंजूर होणार याची माहिती सुध्दा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना समजलेली नाही.

 विकसित जमिन देत असताना त्या जागेवर रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा कशा प्रकारे देणार आहेत? या जमिनी शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र राज्य शासन कशा प्रकारे देणार? ही विकसित जमिन देत असताना त्या जमिनीचा झोन कुठल्या स्वरूपाचा असणार? तसेच या सर्व जमिनींचे शासनातर्फे सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचा नकाशा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पहावयास मिळालेला नाही. अशा प्रकारची अनेक प्रश्न शेतकऱ्यांना मिळाली नसून त्यामुळे त्यांच्याच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळेच हा संभ्रम दूर करण्यासाठी तत्काळ बैठकीचे आयोजन करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :thaneठाणेpratap sarnaikप्रताप सरनाईक