शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो कारशेडमधील बाधीत शेतकऱ्यांना मोबदला कसा मिळणार; आमदार सरनाईक यांनी उपस्थित केले प्रश्न

By अजित मांडके | Updated: September 8, 2023 16:34 IST

घोडबंदर भागातील मोघरपाडा भागात असलेल्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे.

ठाणे: घोडबंदर भागातील मोघरपाडा भागात असलेल्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार जागा हस्तांतरण करण्यासाठी पावले उचलली आहेत. परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मोबदला किती मिळणार, कशा स्वरुपात मिळणार?, तसेच जी जमीन शासनाकडून मिळणार त्यावर किती बांधकाम करायचे याची उत्तरे अद्याप मिळाली नसल्याची माहिती ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी एम.एम.आर.डी.ए. व महसुल खात्याच्या अधिकाऱ्यांसह पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या बैठकीत नवी मुंबईच्या धर्तीवर २२.५ टक्के विकसित जमिन शेतकऱ्यांना देण्याची भुमिका शासनाने जाहिर केली व त्यानुसार महसुल खात्याने कार्यवाही देखील चालू केली. या आठवड्यामध्ये झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मोघरपाडा येथील ज्या शेतकऱ्यांच्या नावे जमिन असून कसत असलेल्या शेतकऱ्यांना २२.५ टक्के व शेजजमिन ताब्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना १२.५ टक्के मोबदला देण्यासंदर्भात निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. परंतु काही शेतकऱ्यांकडे ६४ गुंठ्यांपेक्षा जास्त जमिन ताब्यात असून त्यावर शेती व्यवसाय करीत असल्याने नक्की किती जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळणार?, हा मोबदला देत असताना जमिन नक्की कुठे व विकसित म्हणजे कशा स्वरूपात देणार?, जी जमिन शासनाकडून शेतकऱ्याला मिळणार त्या जमिनीवर किती क्षेत्रफळाचे बांधकाम अनुज्ञेय होणार आहे? व ते नकाशे ठाणे महानगरपालिकेकडून किंवा एम.एम.आर.डी.ए. कडून मंजूर होणार याची माहिती सुध्दा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना समजलेली नाही.

 विकसित जमिन देत असताना त्या जागेवर रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा कशा प्रकारे देणार आहेत? या जमिनी शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र राज्य शासन कशा प्रकारे देणार? ही विकसित जमिन देत असताना त्या जमिनीचा झोन कुठल्या स्वरूपाचा असणार? तसेच या सर्व जमिनींचे शासनातर्फे सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचा नकाशा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पहावयास मिळालेला नाही. अशा प्रकारची अनेक प्रश्न शेतकऱ्यांना मिळाली नसून त्यामुळे त्यांच्याच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळेच हा संभ्रम दूर करण्यासाठी तत्काळ बैठकीचे आयोजन करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :thaneठाणेpratap sarnaikप्रताप सरनाईक