शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महासभेच्या मान्यतेशिवाय निविदा कशी काढली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:06 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत १०३ कोटी ८२ लाख रुपये खर्चाची विकासकामे एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जाणार आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत १०३ कोटी ८२ लाख रुपये खर्चाची विकासकामे एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जाणार आहेत. एमएमआरडीएने त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. मात्र, महापालिका महासभेच्या मान्यतेशिवाय ही निविदा कशी काढली, असा प्रश्न शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केला आहे. महासभेच्या मान्यतेशिवाय काढलेल्या निविदेप्रकरणी एमएमआरडीएविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.एमएमआरडीएने या विकासकामांसाठी जमीन संपादित करूनही कामे यापूर्वी कोणत्याही योजनेतून केलेली नाही, असा दाखला देणे. काम सुरू करण्यासाठी कामाचे प्राकलन तयार करणे, कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया करणे, त्यासाठी तांत्रिक मान्यता घेणे तसेच ही कामे सुरू होऊन ती पूर्ण होण्यास विलंब झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या वाढीव खर्चाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारणे, असे पत्र महापालिकेस एमएमआरडीएने पाठवले आहे.शिवसेना नगरसेवक शेट्टी म्हणाले, महापालिकेचे निर्णय महासभेत घेतले जातात. त्याचा ठराव घेतला जातो. त्यानंतर, सर्व सदस्यांच्या मान्यतेपश्चात त्याला मंजुरी दिली जाते. एमएमआरडीएने काम करताना निविदा काढताना महासभेची मंजुरी घेतलेली नाही. त्यामुळे ही निविदा प्रक्रियाच अवैध आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी. ही कामे करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. रस्त्याखालच्या जल, मल आदी सेवावाहिन्या स्थलांतरित केल्याशिवाय ही कामे करता येणार नाहीत. एमएमआरडीए ही कामे करणार असल्याने महापालिकेच्या अभियंत्यास काही कामच उरणार नाही. सुवर्णजयंती नगरोत्थान आणि अमृत योजनेंतर्गत केली जाणारी कामे एमएमआरडीए करत आहे.‘हे काम पालिकेकडे द्या’दोन वर्षांपूर्वीच महापालिकेतील २७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, दोन वर्षांपासून ही योजना निविदेच्या गटांगळ्या खात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही योजना राबवणार आहे.त्याला केंद्र व राज्य सरकारचा निधी आहे, हे काम महापालिकेकडे द्यावे. विविध योजनांची कामे महापालिका स्तरावर दिल्यास समन्वयाचा अभाव राहणार नाही, याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका