शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
3
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
4
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
5
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
6
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
7
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
8
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
9
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
10
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
11
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
12
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
13
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
14
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
15
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
16
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
17
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
18
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
19
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
20
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासायचा कसा?, ‘दक्षता, गुणनियंत्रण’पुढे पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 03:49 IST

कल्याण : रस्ते दुरुस्तीच्या कामांचा गुणात्मक दर्जा राखण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत.

कल्याण : रस्ते दुरुस्तीच्या कामांचा गुणात्मक दर्जा राखण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी या कामांची गुणवत्ता कशी तपासायची, असा पेच केडीएमसीच्या दक्षता व गुणनियंत्रण विभागापुढे उभा राहिला आहे. या विभागाच्या प्रमुखांनी याबाबत मौन बाळगले असलेतरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांची चांगलीच कसरत होत आहे.सध्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. गणपती, दसरा आणि त्यापाठोपाठ दिवाळीतही खड्डे कायम होते. आता पावसाने विश्रांती घेतल्याने कल्याण-डोंबिवलीतही रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. डांबरीकरणाने खड्डे भरले जात आहेत. परंतु, रस्ते दुरुस्ती करताना कामांचा गुणात्मक दर्जा व कामांच्या व्याप्तीबाबत योग्य ती खबरदारी घ्या, अशा सूचना आयुक्त वेलरासू यांनी शहरअभियंते प्रमोद कुलकर्णी यांना दिल्याआहेत. त्यादृष्टीने कुलकर्णी यांनी अभियंत्यांना सूचना केल्या आहेत. रस्तेदुरुस्ती करताना खड्ड्यांच्या परिघानुसार चारही बाजूंचे सरळ रेषेत खोदकाम करून आखणी करण्याबाबत सांगितले आहे. त्याचबरोबर रस्ते दुरुस्तीच्या कामांचा गुणात्मक दर्जा राखण्यासाठी आणि त्रयस्थ अभियंत्यांमार्फत परिणामांची पडताळणी करण्याकरिता कल्याण विभागासाठी तरुण जुनेजा आणि डोंबिवली विभागासाठी घनश्याम नवांगुळ या कार्यकारी अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या त्रयस्थ अभियंत्यांचा आणि दक्षता व गुणनियंत्रण विभागाचा समाधानकारक अहवाल आल्यानंतरच या कामांची बिले मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.परंतु, दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि लॅब टेक्निशन आदी तिघांचेच मनुष्यबळ आहे. त्यांना कल्याण-डोंबिवली अशा स्वतंत्र विभागासाठी प्रत्येकी एका कनिष्ठ अभियंत्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या विभागाची अपुºया मनुष्यबळामुळे काम करताना धावपळ उडत आहे. यासंदर्भात संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामांचा दर्जा योग्य प्रकारे राखण्यासाठी नमुने घेतले जात आहेत. येथील प्रयोगशाळेत त्यांची तपासणी होत असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.>...अन्यथा चाबूक घेणारकेडीएमसीने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरु वात केली आहे. परंतु, हे काम संथगतीने सुरू असल्याने महापौर राजेंद्र देवळेकर संतप्त झाले आहेत. प्रशासनाने कामात गती न आणल्यास आम्हाला चाबूक हातात घेऊन त्यांच्यामागे लागावे लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली अहे.महापौरांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला रात्री स्वत: कल्याण शहरातील काही भागांमध्ये फिरून अधिकाºयांकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करून घेतले होते. देवळेकर यांनी १५ दिवसांत संपूर्ण कल्याण-डोंबिवली खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी देवळेकर यांनी अचानक मंगळवारी मध्यरात्री दौरा केला. मात्र, अत्यंत धीम्या गतीने चाललेल्या कामांमुळे ते चांगलेच संतापले आहेत. प्रामुख्याने आयुक्तांनी या कामांची पाहणी करणे आवश्यक असताना ते मात्र अद्यापही फिरकलेले नाहीत. त्यात, कामास विलंब होत असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.

टॅग्स :kalyanकल्याणroad safetyरस्ते सुरक्षा