शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

हाउसिंग फेडरेशन करणार सामूहिक अग्निहोत्र, १० हजार ठाणेकर होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 01:38 IST

ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनच्या वतीने ठाण्यात प्रथमच पर्यावरणाला पूरक अशा सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार असून त्यातील साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनच्या वतीने ठाण्यात प्रथमच पर्यावरणाला पूरक अशा सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार असून त्यातील साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. या अग्निहोत्रासाठी लागणाऱ्या होमकुंडासह सर्व साहित्याचेही मोफत वाटप केले जाणार असल्याची माहिती ठाणे डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी बुधवारी दिली.येत्या ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास उपवन तलावाच्या बाजूला असलेल्या मैदानामध्ये हा अनोखा उपक्रम होणार आहे. याठिकाणी उपस्थित राहण्यासाठी ठाणे रेल्वेस्थानकापासून पोखरण रोड क्रमांक एक येथील कॅडबरी कंपनी आणि पोखरण रोड क्रमांक दोन येथील मारिया हॉल तसेच माजिवडा येथून ठाणे परिवहन सेवेची (टीएमटी) दुपारी ३.३० ते ५.३० या काळात बसची व्यवस्था केली आहे.सामूहिक अग्निहोत्र हा पर्यावरणासाठी पूरक असा होम असून तो अक्कलकोट शिवपुरी येथील गजानन महाराज यांनी सुरू केलेला आहे. तो सूर्योदय आणि सूर्यास्त अशा दोन वेळेलाच करणे अपेक्षित असतो. असा अग्निहोत्र घरी केल्यास त्यापासून सकारात्मक ऊर्जा तयार होते. विद्यार्थ्यांसाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. हाउसिंग फेडरेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्र मास शिवपुरी येथील डॉक्टर त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.सोसायट्यांसह विद्यार्थ्यांचाही सहभागया अग्निहोत्रासाठी वर्तकनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर या भागातील अनेक गृहसंकुलांतील रहिवासी सहभाग घेणार आहेत. याच परिसरातील आर.जे. ठाकूर, थिराणी विद्यालय आणि ब्राह्मण विद्यालय या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीही आपला सहभाग नोंदविणार आहे. दहा हजार रहिवासी या अग्निहोत्रामध्ये सहभाग नोंदविण्याचे उद्दिष्ट असून त्यातील साडेचार हजार रहिवासी आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचेही राणे यांनी सांगितले.या अग्निहोत्रासाठी जोडप्याने एकत्र बसण्याची आवश्यकता नसून कोणतीही व्यक्ती बसू शकते. अग्निहोत्राने पवित्र आणि मंगल झालेल्या वातावरणात ध्यान, उपासना, मनन, चिंतन, अभ्यास करणे सहज साध्य होते. त्याचा उपयोग आपल्या परिसरातील पर्यावरणातील प्रदूषण कमी होऊन आॅक्सिजनमध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे कार्बनडायॉक्साइडचे प्रमाण कमी होते. याला शास्त्रीय दृष्टिकोनातूनही मान्यता आहे. संपूर्ण जगात अनेक ठिकाणी असंख्य कुटुंबे अग्निहोत्राचे आचरण करून त्यापासून लाभ मिळवित असल्याचा दावाही राणे यांनी केला.

टॅग्स :thaneठाणे