शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

बीएसयूपीच्या घरांमध्येही हाल, ‘नागूबाई’वासींची व्यथा, पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 04:28 IST

पश्चिमेतील धोकादायक बनलेल्या नागूबाई निवासच्या रहिवाशांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कचोरे येथील बीएसयूपीच्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. रहिवाशांना तात्पुरता निवारा मिळाला असला, तरी त्यांच्या व्यथा कायम आहेत.

डोंबिवली : पश्चिमेतील धोकादायक बनलेल्या नागूबाई निवासच्या रहिवाशांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कचोरे येथील बीएसयूपीच्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. रहिवाशांना तात्पुरता निवारा मिळाला असला, तरी त्यांच्या व्यथा कायम आहेत. कचोरे येथे पाण्याच्या दुर्भिक्षाबरोबर असुविधांचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे आगीतून फुफाट्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.बीएसयूपी प्रकल्पात राहायला गेल्यापासून चार दिवस झाले, पण पाण्याचा पत्ता नाही. नोकरी-कामानिमित्त घरातील पुरुष बाहेर जातात. त्यामुळे गृहिणींना मात्र त्याच संकुलातील अन्य इमारतींच्या टाकीतून पाणी भरावे लागत असल्याने प्रचंड हाल होत आहेत, असे रहिवाशांनी सांगितले. पालकमंत्री शिंदे यांनी घरांचा ताबा दिल्यानंतर काही काळ महापौर राजेंद्र देवळेकर होते, पण आता कोणीही येत नसल्याचा संताप प्रसाद भानुशाली यांनी व्यक्त केला.कचोरे हे ठिकाण कल्याण असो की डोंबिवली, या दोन्ही प्रमुख शहरांच्या जवळपास नाही. येथे कोणतीही बाजारपेठ नाही की, कसलीच सुविधा नाही. त्यामुळे एका कोपºयात आल्यासारखे आम्हाला वाटत आहे. देवी चौकात आम्ही लोकांमध्ये राहतोय, असे वातावरण होते. आता मात्र कोनाड्यात आल्यासारखे वाटते. कल्याण असो की डोंबिवली स्थानक गाठण्यासाठी रिक्षाला एका वेळेला १०० रुपयांची नोट मोडावी लागते. एवढी वर्षे डोंबिवलीतील देवी चौकात राहिलो. गॅस एजन्सी, बँक, मुलांच्या शाळा, शिकवण्या, किराणा दुकान हे सगळे काही तेथे आहे. त्यामुळे आता येथे आल्यावर प्रत्येक व्यवहारासाठी जुन्या जागेत, त्या परिसरात जावे लागत आहे. अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत.पाणी नसल्याने अजूनही काही घरांमध्ये अन्न शिजलेले नाही. गॅस आहे, तर शेगडी नाही, असा सगळा विस्कळीतपणा सुरू आहे. काय करावे उमजत नाही. त्यामुळे घरमालकाने येथे यावे आणि आमची स्थिती बघावी, असेही एक रहिवासी म्हणाले.मालकाची भूमिका अस्पष्टमुख्यमंत्र्यांमुळे निवारा तर मिळाला, पण तो किती दिवस असेल, याची शाश्वती नाही. मालक पुढे काय करणार, हे देखील स्पष्ट करत नाही. घरांचा प्रश्न ऐरणीवरच आला असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीWaterपाणी