शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

बीएसयूपीच्या घरांमध्येही हाल, ‘नागूबाई’वासींची व्यथा, पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 04:28 IST

पश्चिमेतील धोकादायक बनलेल्या नागूबाई निवासच्या रहिवाशांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कचोरे येथील बीएसयूपीच्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. रहिवाशांना तात्पुरता निवारा मिळाला असला, तरी त्यांच्या व्यथा कायम आहेत.

डोंबिवली : पश्चिमेतील धोकादायक बनलेल्या नागूबाई निवासच्या रहिवाशांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कचोरे येथील बीएसयूपीच्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. रहिवाशांना तात्पुरता निवारा मिळाला असला, तरी त्यांच्या व्यथा कायम आहेत. कचोरे येथे पाण्याच्या दुर्भिक्षाबरोबर असुविधांचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे आगीतून फुफाट्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.बीएसयूपी प्रकल्पात राहायला गेल्यापासून चार दिवस झाले, पण पाण्याचा पत्ता नाही. नोकरी-कामानिमित्त घरातील पुरुष बाहेर जातात. त्यामुळे गृहिणींना मात्र त्याच संकुलातील अन्य इमारतींच्या टाकीतून पाणी भरावे लागत असल्याने प्रचंड हाल होत आहेत, असे रहिवाशांनी सांगितले. पालकमंत्री शिंदे यांनी घरांचा ताबा दिल्यानंतर काही काळ महापौर राजेंद्र देवळेकर होते, पण आता कोणीही येत नसल्याचा संताप प्रसाद भानुशाली यांनी व्यक्त केला.कचोरे हे ठिकाण कल्याण असो की डोंबिवली, या दोन्ही प्रमुख शहरांच्या जवळपास नाही. येथे कोणतीही बाजारपेठ नाही की, कसलीच सुविधा नाही. त्यामुळे एका कोपºयात आल्यासारखे आम्हाला वाटत आहे. देवी चौकात आम्ही लोकांमध्ये राहतोय, असे वातावरण होते. आता मात्र कोनाड्यात आल्यासारखे वाटते. कल्याण असो की डोंबिवली स्थानक गाठण्यासाठी रिक्षाला एका वेळेला १०० रुपयांची नोट मोडावी लागते. एवढी वर्षे डोंबिवलीतील देवी चौकात राहिलो. गॅस एजन्सी, बँक, मुलांच्या शाळा, शिकवण्या, किराणा दुकान हे सगळे काही तेथे आहे. त्यामुळे आता येथे आल्यावर प्रत्येक व्यवहारासाठी जुन्या जागेत, त्या परिसरात जावे लागत आहे. अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत.पाणी नसल्याने अजूनही काही घरांमध्ये अन्न शिजलेले नाही. गॅस आहे, तर शेगडी नाही, असा सगळा विस्कळीतपणा सुरू आहे. काय करावे उमजत नाही. त्यामुळे घरमालकाने येथे यावे आणि आमची स्थिती बघावी, असेही एक रहिवासी म्हणाले.मालकाची भूमिका अस्पष्टमुख्यमंत्र्यांमुळे निवारा तर मिळाला, पण तो किती दिवस असेल, याची शाश्वती नाही. मालक पुढे काय करणार, हे देखील स्पष्ट करत नाही. घरांचा प्रश्न ऐरणीवरच आला असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीWaterपाणी