शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:39 IST

ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे ठाणे जिल्ह्याला घातलेल्या विळख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे हॉटेल्स, बार अँड रेस्टोरंट यांच्यावरही उपासमारीची वेळ आली  आहे. कोरोनाच्या काळात हॉटेल मालकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यात नवीन नियमावली आणि कडक निर्बंधामुळे हॉटेल मालकांनी मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा अशी कळकळीची विनंती हॉटेल मालकांनी केली आहे. तसेच  राज्य उत्पादन शुल्क विभागाची वार्षिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आणि त्याशिवाय बार अँड रेस्टोरंट चालविणो शक्य नसल्याने ठाण्यातील सर्वच बार अँड रेस्टोरंटमध्ये काही दिवसापूर्वी मद्यविक्र ी बंद करण्यात आलेली होती.  सरकारला महसूल हवा असल्यास त्यांनी सवलत द्यावी असा सूर ठाणे  हॉटेल असोशिएशनच्या वतीने लावला आहे. तसेच गुरवारी ठाण्यात मुक आंदोलनही करण्यात आले.

  देशात आणि खासकरून महाराष्ट्रत कोरोनाने अगदी थैमान घातले असून देशातील एकूण बाधिता पैकी जवळपास ३० टक्के रु ग्ण हे हे केवळ महाराष्ट्रातून येत आहेत. वाढती रु ग्णसंख्या पाहता सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत. त्याची कु:हाड हॉटेल व्यावासायावर कोसळली आहे. रात्री आठ वाजेपर्यंत पार्सल सव्र्हीसाठी उघडी असलेली हॉटेल्स सरसकट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या ठाण्यातील या व्यवसायातील सर्वांनीच एकत्र येत गुरवारी मूक आंदोलन केले. लाखोंची कर्जे आणि मिळकत शून्य झाल्याने या व्यवसायाशी निगडीत अनेकांनी एकत्र येत सरकारला निर्बंध शिथिल करण्याची विनंती केली. लवकरच हॉटेल उघडली नाहीत तर बायकामुलांना घेऊन आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.गावरून नौकरीसाठीच आलो, कुटुंबाच्या उदरिनर्वाहाची चिंता आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोक्यावर आहे. तर दुसरीकडे राज्यसरकारच्या नव्यानव्या नियमांमुळे हॉटेल, बार  बंद पडले, आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली. उपासमारीच्या उंबरठ्यावर आलेल्या हॉटेल आणि बार मालकासह बारमधील हातावरचे पोट असलेले कर्मचारी यांनाही गुरवारी मुक आंदोलन करून सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मिशन बिगेन अगेन नंतर ब्रेक द चैन, माझे  कुटूंब माझी जबाबदारी अशी ब्रीदवाक्य सांगतात.  परंतु माझे   कुटुंब  माझी  जबाबदारी, मग सरकारची काही नैतिकता आहे की नाही असा सवाल आता कर्मचारी वर्गाने उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे, तीन प्रकारचे टॅक्स भरत आहोत, त्यानंतर आता पुन्हा मोठा भार डोक्यावर आला आहे. कामगारांना पगार, राहणो करीत आहोत. आम्ही देखील व्यावसायिक आहोत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर विचार करुन लवकरच तोडगा काढावा.(चंद्रशेखर शेटटी - ठाणे  हॉटेल असोसिएशन, उपाध्यक्ष)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस