शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

सरपंच-उपसरपंचांना मानधन; सदस्यांना मात्र केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:19 IST

राज्य शासनाकडे लवकरच व्यक्त करणार नाराजी

सुरेश लोखंडेठाणे :  जिल्ह्यातील १५८ पैकी १५३ ग्रामपंचायतींच्या १४७२ सदस्यांसाठी निवडणूक होऊन ते विजयी झाले. या निवडणूक रिंगणातील दोन हजार ४१३ उमेदवारांमधून निवडून आलेल्या या सदस्यांपैकी सरपंच आाणि उपसरपंच यांनाच मानधन दिले जाते. मात्र, उर्वरित सदस्यांना ते दिले जात नसल्यामुळे त्यांच्यातील नाराजी लवकरच राज्य शासनाच्या दरबारी ऐकविली जाणार आहे.

जिल्ह्यातील ४७९ मतदान केंद्रांवर गावपाड्यातील दोन लाख ५० हजार ५०० मतदार या एक हजार ७२ सदस्यांना निवडून दिले आहे. त्यासाठी घेतलेले परिश्रम आणि इतरांची ओढवून घेतलेली नाराजी या सदस्यांना काही वर्षे तरी शांत बसू देणार नाही. असे असूनही या विजयी उमेदवारांना मानधनाची तजवीज शासनाकडून अद्यापही झाली नसल्यामुळे त्यांच्यातील असंतोष लवकरच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचण्याची शक्यता आहे. या सदस्यांच्या निवडणुकीसाठी दोन हजार ९०० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आणि तीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात होते.

जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागातील गावपाडे, खेड्यांचा विकास साधणाऱ्या भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक एक महिन्यांपूर्वी म्हणजे १५ जानेवारीला झाली. एप्रिल ते डिसेंबर कालावधीत मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी या निवडणुका झाल्या आहेत. त्यासाठी चार हजार ३८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींसह ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित ९९४ सदस्यांसाठी मतदान झाले होते.

जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या; पण यातील ठाणे तालुक्यातील नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांच्या पाच ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.  या ग्रामपंचायतींच्या ५१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती; पण उमेदवारीअभावी पाच ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही.

 

टॅग्स :thaneठाणेgram panchayatग्राम पंचायत