शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच-उपसरपंचांना मानधन; सदस्यांना मात्र केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:19 IST

राज्य शासनाकडे लवकरच व्यक्त करणार नाराजी

सुरेश लोखंडेठाणे :  जिल्ह्यातील १५८ पैकी १५३ ग्रामपंचायतींच्या १४७२ सदस्यांसाठी निवडणूक होऊन ते विजयी झाले. या निवडणूक रिंगणातील दोन हजार ४१३ उमेदवारांमधून निवडून आलेल्या या सदस्यांपैकी सरपंच आाणि उपसरपंच यांनाच मानधन दिले जाते. मात्र, उर्वरित सदस्यांना ते दिले जात नसल्यामुळे त्यांच्यातील नाराजी लवकरच राज्य शासनाच्या दरबारी ऐकविली जाणार आहे.

जिल्ह्यातील ४७९ मतदान केंद्रांवर गावपाड्यातील दोन लाख ५० हजार ५०० मतदार या एक हजार ७२ सदस्यांना निवडून दिले आहे. त्यासाठी घेतलेले परिश्रम आणि इतरांची ओढवून घेतलेली नाराजी या सदस्यांना काही वर्षे तरी शांत बसू देणार नाही. असे असूनही या विजयी उमेदवारांना मानधनाची तजवीज शासनाकडून अद्यापही झाली नसल्यामुळे त्यांच्यातील असंतोष लवकरच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचण्याची शक्यता आहे. या सदस्यांच्या निवडणुकीसाठी दोन हजार ९०० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आणि तीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात होते.

जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागातील गावपाडे, खेड्यांचा विकास साधणाऱ्या भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक एक महिन्यांपूर्वी म्हणजे १५ जानेवारीला झाली. एप्रिल ते डिसेंबर कालावधीत मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी या निवडणुका झाल्या आहेत. त्यासाठी चार हजार ३८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींसह ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित ९९४ सदस्यांसाठी मतदान झाले होते.

जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या; पण यातील ठाणे तालुक्यातील नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांच्या पाच ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.  या ग्रामपंचायतींच्या ५१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती; पण उमेदवारीअभावी पाच ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही.

 

टॅग्स :thaneठाणेgram panchayatग्राम पंचायत