शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच-उपसरपंचांना मानधन; सदस्यांना मात्र केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:19 IST

राज्य शासनाकडे लवकरच व्यक्त करणार नाराजी

सुरेश लोखंडेठाणे :  जिल्ह्यातील १५८ पैकी १५३ ग्रामपंचायतींच्या १४७२ सदस्यांसाठी निवडणूक होऊन ते विजयी झाले. या निवडणूक रिंगणातील दोन हजार ४१३ उमेदवारांमधून निवडून आलेल्या या सदस्यांपैकी सरपंच आाणि उपसरपंच यांनाच मानधन दिले जाते. मात्र, उर्वरित सदस्यांना ते दिले जात नसल्यामुळे त्यांच्यातील नाराजी लवकरच राज्य शासनाच्या दरबारी ऐकविली जाणार आहे.

जिल्ह्यातील ४७९ मतदान केंद्रांवर गावपाड्यातील दोन लाख ५० हजार ५०० मतदार या एक हजार ७२ सदस्यांना निवडून दिले आहे. त्यासाठी घेतलेले परिश्रम आणि इतरांची ओढवून घेतलेली नाराजी या सदस्यांना काही वर्षे तरी शांत बसू देणार नाही. असे असूनही या विजयी उमेदवारांना मानधनाची तजवीज शासनाकडून अद्यापही झाली नसल्यामुळे त्यांच्यातील असंतोष लवकरच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचण्याची शक्यता आहे. या सदस्यांच्या निवडणुकीसाठी दोन हजार ९०० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आणि तीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात होते.

जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागातील गावपाडे, खेड्यांचा विकास साधणाऱ्या भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक एक महिन्यांपूर्वी म्हणजे १५ जानेवारीला झाली. एप्रिल ते डिसेंबर कालावधीत मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी या निवडणुका झाल्या आहेत. त्यासाठी चार हजार ३८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींसह ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित ९९४ सदस्यांसाठी मतदान झाले होते.

जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या; पण यातील ठाणे तालुक्यातील नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांच्या पाच ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.  या ग्रामपंचायतींच्या ५१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती; पण उमेदवारीअभावी पाच ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही.

 

टॅग्स :thaneठाणेgram panchayatग्राम पंचायत