शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

मुख्यमंत्र्याची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: October 29, 2015 23:32 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबतची मैत्री तोडून मैदानात उतरलेल्या भाजपची स्वबळावर सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे

नारायण जाधव, ठाणेकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबतची मैत्री तोडून मैदानात उतरलेल्या भाजपची स्वबळावर सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आतापर्यंत त्यांनी शहरात एक-दोन नव्हे तब्बल पाच सभा घेतल्या आहेत. एखाद्या महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: एकहाती प्रचार करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. मात्र, कपिल पाटील, किसन कथोरे, गणपत गायकवाड यासारख्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर त्यांची भिस्त असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक नेते कमालीचे नाराज झाले आहेत. यामुळे लोकसभा-विधानसभेप्रमाणे महापालिकेतही शत-प्रतिशत भाजपासाठी मुख्यमंत्र्यांना संघ स्वयंसेवकांची मनधरणी करावी लागली आहे. कधी डोंबिवली जिमखाना तर कधी एखाद्या व्यायामशाळेत स्वत: जाऊन संघ ‘दक्ष’ राहण्याची मनधरणी केली.महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून संपूर्ण प्रचाराची धुरा त्यांनी एकहाती पेलली. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी शहरात कधी आले, कोठे सभा घेतल्या, काय प्रचार केला आणि कोणाचे ‘कल्याण’ करून गेले, हे खऱ्या अर्थाने २ नोव्हेंबरला निकालाच्या दिवशीच कळणार आहे.पहिल्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीसाठी ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. नंतर, अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे शाही भोजन घेतले. या दोन्ही घटना सोशल मीडियावर चांगल्याच गाजल्या. तर, स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह निवडणुकीशी संबंध नसताना आयुक्त ई. रवींद्रन यांचा फोटो फेसबुकवर वापरून पक्षासह साऱ्यांनाच अडचणीत आणले. त्या २७ गावांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची स्थानिक नेत्यांनी तशी अडचणच केली आहे. कारण, कोकण आयुक्तांनी आपल्या अभ्यासपूर्ण अहवालानुसार त्या गावांची स्वतंत्र महापालिका शक्य नाही, हे लक्षात आणल्यानंतर त्यांना पुन्हा केडीएमसीत समाविष्ट केले. नंतर मात्र ती वगळल्यास काही बिल्डरांच्या ‘लोंढ्यां’मुळे महापालिकेत स्वबळावर भाजपाची ‘मंगलप्रभात’ कशी होईल, असे उपऱ्यांसह काही स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा गळी उतरवले. त्यामुळे कोणताही विचार न करता त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती गावे पुन्हा वगळली. मात्र, निवडणूक आयोगाने ते न जुमानल्याने त्यांना या प्रचारात पूर्ण ताकदीनिशी उतरवावे लागले. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबई, वसई-विरार, अंबरनाथ- बदलापूर येथे भाजपाने सपाटून मार खाल्ला. कारण स्वपक्षातील असंतुष्टांनीच या ठिकाणी सुरुंग लावला होता.