शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्याची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: October 29, 2015 23:32 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबतची मैत्री तोडून मैदानात उतरलेल्या भाजपची स्वबळावर सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे

नारायण जाधव, ठाणेकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबतची मैत्री तोडून मैदानात उतरलेल्या भाजपची स्वबळावर सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आतापर्यंत त्यांनी शहरात एक-दोन नव्हे तब्बल पाच सभा घेतल्या आहेत. एखाद्या महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: एकहाती प्रचार करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. मात्र, कपिल पाटील, किसन कथोरे, गणपत गायकवाड यासारख्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर त्यांची भिस्त असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक नेते कमालीचे नाराज झाले आहेत. यामुळे लोकसभा-विधानसभेप्रमाणे महापालिकेतही शत-प्रतिशत भाजपासाठी मुख्यमंत्र्यांना संघ स्वयंसेवकांची मनधरणी करावी लागली आहे. कधी डोंबिवली जिमखाना तर कधी एखाद्या व्यायामशाळेत स्वत: जाऊन संघ ‘दक्ष’ राहण्याची मनधरणी केली.महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून संपूर्ण प्रचाराची धुरा त्यांनी एकहाती पेलली. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी शहरात कधी आले, कोठे सभा घेतल्या, काय प्रचार केला आणि कोणाचे ‘कल्याण’ करून गेले, हे खऱ्या अर्थाने २ नोव्हेंबरला निकालाच्या दिवशीच कळणार आहे.पहिल्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीसाठी ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. नंतर, अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे शाही भोजन घेतले. या दोन्ही घटना सोशल मीडियावर चांगल्याच गाजल्या. तर, स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह निवडणुकीशी संबंध नसताना आयुक्त ई. रवींद्रन यांचा फोटो फेसबुकवर वापरून पक्षासह साऱ्यांनाच अडचणीत आणले. त्या २७ गावांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची स्थानिक नेत्यांनी तशी अडचणच केली आहे. कारण, कोकण आयुक्तांनी आपल्या अभ्यासपूर्ण अहवालानुसार त्या गावांची स्वतंत्र महापालिका शक्य नाही, हे लक्षात आणल्यानंतर त्यांना पुन्हा केडीएमसीत समाविष्ट केले. नंतर मात्र ती वगळल्यास काही बिल्डरांच्या ‘लोंढ्यां’मुळे महापालिकेत स्वबळावर भाजपाची ‘मंगलप्रभात’ कशी होईल, असे उपऱ्यांसह काही स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा गळी उतरवले. त्यामुळे कोणताही विचार न करता त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती गावे पुन्हा वगळली. मात्र, निवडणूक आयोगाने ते न जुमानल्याने त्यांना या प्रचारात पूर्ण ताकदीनिशी उतरवावे लागले. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबई, वसई-विरार, अंबरनाथ- बदलापूर येथे भाजपाने सपाटून मार खाल्ला. कारण स्वपक्षातील असंतुष्टांनीच या ठिकाणी सुरुंग लावला होता.