शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

बेघरांनी रात्र काढली रस्त्यावर, बाधितांच्या ‘रस्ता रोको’मुळे रिकाम्या इमारतींवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 02:00 IST

दिवा येथील अनधिकृत चाळींवर सोमवारी प्रचंड बंदोबस्तात केलेल्या कारवाईत बेघर झालेल्या अनेक कुटुंबीयांना सोमवारची रात्र रस्त्यावर झोपून काढली.

कुमार बडदे मुंब्रा : दिवा येथील अनधिकृत चाळींवर सोमवारी प्रचंड बंदोबस्तात केलेल्या कारवाईत बेघर झालेल्या अनेक कुटुंबीयांना सोमवारची रात्र रस्त्यावर झोपून काढली. कारवाईत पाडलेल्या घरांकडे बघून अनेकांच्या डोळ््यातील अश्रू अनावर झाले होते.दिवा येथील अनधिकृत चाळीेंवर सोमवारी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे येथील शेकडो घरे जमीनदोस्त झाली. जीवदानी नगर परिसरातील अनेक ठिकाणी कारवाईनंतर पडलेल्या काँक्रिटच्या ढिगाऱ्याखाली काही संसारोपयोगी वस्तू हाती लागतात का, याचा काही कुटुंबे मंगळवारीही शोध घेत होते. काहींनी त्यांच्या घराचे तुटलेले लोखंडी प्रवेशद्वार, घरातील जर्मनच्या मांडण्याचा ठोक भावात सौदा करु न त्याची भंगारमध्ये विक्री केली. त्यामुळे दिवसभर या परिसरात भंगार विक्रेत्यांची लगबग सुरु होती.कारवाई करण्यात आलेल्या चाळींमधील घरे स्वस्तामध्ये मिळाल्यामुळे खरेदी केली होती. ती विकत घेताना त्यावर कारवाई होऊन बेघर व्हावे लागेल याची पुसटशीही कल्पना नव्हती, असे भरत शर्मा याने सांगितले. ज्या घरांवर कारवाई करण्यात आली त्यातील अनेक कुटुंबे मागील १० ते १२ वर्षापासून येथे रहात होती. तोडण्यात आलेली घरे अनधिकृत होती, राखीव जागेवर बांधण्यात आली होती तर त्यामध्ये राहणाºया लोकांना विविध सुविधा देणाºया अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले नाही का? त्याचवेळी अनधिकृत बाधकामांवर कारवाई केली असती तर आणखी अनधिकृत बांधकामे झाली नसती, असे सुमन तांडे म्हणाल्या. काहीजण कारवाई झालेल्या परिसरात घिरट्या घालत होते. मातीच्या ढिगाºयांखाली कुणाचे काही राहिले असल्यास ते हडप करण्याकरिता भुरटे चोर फिरत असल्याची तक्रार काहींनी केली. या परीसरात काही चाळींचे बांधकाम केलेल्या सचिन चौबे या विकासकाने बांधलेल्या ज्या खोल्यांवर कारवाई करण्यात आली, त्या खोल्यांमध्ये राहणाºया कुटुंबांची पर्यायी व्यवस्था करणारा असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान बापलेकीच्या जमिनीच्या मालकी हक्कांच्या वादावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येथील वैभव ढाब्याजवळ सुरु असलेल्या दोन अनधिकृत इमारतीवर पोलीस बंदोबस्तामध्ये मंगळवारी कारवाई करण्यात आल्याची माहिती दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुनील मोरे यांनी दिली. घटनास्थळी आलेले आ. राजू पाटील यांनी स्थानिकांना बेघर होऊ देणार नसल्याचे तसेच या परीसराचा समूह विकास योजनेमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी ठामपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले.>महसूल विभागाने सोमवारी केलेल्या धडक कारवाईमुळे शेकडो कुटुंबे अक्षरश: रस्त्यावर आली. ऐन थंडीच्या दिवसात डोक्यावरील छत हरवल्याने ही कुटुंबे हवालदिल झाली आहेत. हातचा पैसा गेला आणि घरही गेले. आता करावे तरी काय, असा प्रश्न येथील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना घेऊन कुठे जायचे, असा प्रश्नही त्यांनी केला.