शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

होळीसाठी यंदाही टँकर नाहीत, नैसर्गिक पद्धतीने सण साजरा करा; ठाणे महापालिकेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 13:40 IST

ठाणेकरांनी होळीचा सण पाण्याचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

ठाणे : ठाणेकरांनी होळीचा सण पाण्याचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. होळी सणासाठी कोणत्याही परिस्थितीत पाण्याचे टँकर देण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात पाण्याचा गैरवापर होतो. त्यामुळे या दिवशी कोणालाही पाण्याचे टँकर न पुरविण्याचे आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. तसेच शहरातील सर्व्हिस स्टेशनलाही तशा सूचना देण्याविषयी त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना निर्देशित केले आहे. ठाणे हे सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक परंपरा जपणारे शहर आहे. ही परंपरा अधिक समृद्ध आणि आरोग्यदायी व्हावी यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर करू नये, वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवू नये तसेच नैसर्गिक पद्धतीने होळी साजरी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.पिशव्यांची सर्रास विक्री-पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या असल्या तरी शहराच्या विविध भागात खास करून झोपडपट्टी भागात आजही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जात असून सर्रासपणे या पिशव्यी विकल्या जात असल्याचे दिसत आहे. यामुळे पालिका त्यावर कारवाई करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.होळीच्या काळात पाण्याचा अधिक अपव्यय होत असतो. त्यातही मागील काही वर्षात मोठ्या रंगपंचमींच्या ठिकाणी पालिकेचे टँकर घेऊन हा सण साजरा करण्याची प्रथा होती. परंतु,मागील काही वर्षांत पावसाने पाठ फिरविल्याने टँकरच्या वापराबाबत काही दक्ष नागरिकांनी आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर पालिकेने मागील चार वर्षांपासून ते न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदादेखील त्याच धोरणाची अंमलबजावणी केली जात असल्याचे पालिकेच्या अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८thaneठाणे