शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

राहनाळ शाळेमध्ये केली अवगुणांची होळी; वाईट विचार जाळून टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:27 IST

गोवऱ्या, सुकलेला पाला, कापूर याचा वापर, विद्यार्थ्यांचा सहभाग

आसनगाव : तालुक्यातील राहनाळ जिल्हा परिषद शाळेत नावीन्यपूर्ण पद्धतीने पारंपरिक होळीचा सण शनिवारी साजरा करण्यात आला. या वेळी मुलांनी वाईट सवयी, वाईट विचार कागदांवर लिहून होळीत जाळून होळी साजरी केली.

होळीसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते, तसेच होळी साजरी करताना सामाजिक भान ठेवले जात नाही. पाण्याचा अपव्यय तसेच रासायनिक मिश्रीत रंग वापरून शारीरिक इजा पोहोचवली जाते, हे होऊ नये म्हणून लहान वयात मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार व्हावे, यासाठी राहनाळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आजूबाजूचा कचरा, गोवºया, कापूर, सुकलेला पालापाचोळा गोळा करून होळी केली. त्यात मुलांनी आपल्या मनातील वाईट विचार जाळून टाकले. शाळेतील विद्यार्थिनी अंकिता आंबेकर, मानसी टोळे यांनी होळी पेटवली. मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांनी मुलांना होलिकेची कथा सांगितली. तसेच रासायनिक रंग वापरू नयेत, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या उपक्र माची संकल्पना राहनाळ शाळेचे शिक्षक अजय पाटील यांची होती. आठ दिवस इकोफ्रेंडली होळी कशी साजरी करावी, याबाबत त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तर शिक्षिका चित्रा पाटील, अनघा दळवी, संध्या जगताप या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाणीबचतीचे महत्त्व मुलांना पटवून देत इकोफ्रेंडली रंग कसे तयार करावेत, याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर होळीची विज्ञानाशी सांगड पटवून दिली. या वेळी शिक्षिकांनी मुलींबरोबर होळीभोवती फेर धरून होळीची गाणी म्हटली. या कार्यक्र माप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य नाईक यांनी मुलांना आणि ग्रामस्थांना शुभेच्छा देऊन पारंपरिक होळीचे समाजातील महत्त्व मुलांना पटवून दिले.