शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

राहनाळ शाळेमध्ये केली अवगुणांची होळी; वाईट विचार जाळून टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:27 IST

गोवऱ्या, सुकलेला पाला, कापूर याचा वापर, विद्यार्थ्यांचा सहभाग

आसनगाव : तालुक्यातील राहनाळ जिल्हा परिषद शाळेत नावीन्यपूर्ण पद्धतीने पारंपरिक होळीचा सण शनिवारी साजरा करण्यात आला. या वेळी मुलांनी वाईट सवयी, वाईट विचार कागदांवर लिहून होळीत जाळून होळी साजरी केली.

होळीसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते, तसेच होळी साजरी करताना सामाजिक भान ठेवले जात नाही. पाण्याचा अपव्यय तसेच रासायनिक मिश्रीत रंग वापरून शारीरिक इजा पोहोचवली जाते, हे होऊ नये म्हणून लहान वयात मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार व्हावे, यासाठी राहनाळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आजूबाजूचा कचरा, गोवºया, कापूर, सुकलेला पालापाचोळा गोळा करून होळी केली. त्यात मुलांनी आपल्या मनातील वाईट विचार जाळून टाकले. शाळेतील विद्यार्थिनी अंकिता आंबेकर, मानसी टोळे यांनी होळी पेटवली. मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांनी मुलांना होलिकेची कथा सांगितली. तसेच रासायनिक रंग वापरू नयेत, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या उपक्र माची संकल्पना राहनाळ शाळेचे शिक्षक अजय पाटील यांची होती. आठ दिवस इकोफ्रेंडली होळी कशी साजरी करावी, याबाबत त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तर शिक्षिका चित्रा पाटील, अनघा दळवी, संध्या जगताप या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाणीबचतीचे महत्त्व मुलांना पटवून देत इकोफ्रेंडली रंग कसे तयार करावेत, याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर होळीची विज्ञानाशी सांगड पटवून दिली. या वेळी शिक्षिकांनी मुलींबरोबर होळीभोवती फेर धरून होळीची गाणी म्हटली. या कार्यक्र माप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य नाईक यांनी मुलांना आणि ग्रामस्थांना शुभेच्छा देऊन पारंपरिक होळीचे समाजातील महत्त्व मुलांना पटवून दिले.