शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नैसर्गिक रंग तयार करून वांगणीच्या विद्यार्थिनींकडून होळीचा रंगोत्सव!

By सुरेश लोखंडे | Updated: March 25, 2024 18:18 IST

नैसर्गिक रंग तयार केले आणि जल्लाेषात धुळवड साजरी केली.

ठाणे : ‘नैसर्गिक रंगाने रंगपंचमी खेळूया, आरोग्य आणि पर्यावरण जपूया’ असे गीत गाऊन अंबरनाथच्या जिल्हा परिषद शाळा वांगणी क्रमांक ३ च्या विद्यार्थ्यांनी अनोख्या,नाविन्यपूर्ण पद्धतीने हाेळीच्या धुळवडीचा रंगाेत्सव साजरा केला केला. यासाठी त्यांनी कार्यशाळेत धडे घेऊन नैसर्गिक रंग तयार केले आणि जल्लाेषात धुळवड साजरी केली.

हाेळीच्या रंगपंचमी निमित्त बाजारात रासायनिक रंगाने दुकाने सजलेली दिसतात. हे रंग आपल्या आरोग्यास आणि पर्यावरणास हानिकारक असतात. रासायनिक रंगाने केस, त्वचा डोळे यांना हानी पोहोचते तसेच रंग स्वच्छ करण्यास भरपूर पाणीही लागते. त्यामुळे नाहक पाण्याचा अपव्यय होतो. यावर मात करून वांगणी क्र. ३च्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली नवोपक्रमशील तालुका आदर्श शिक्षिका मनीषा रमेश जाधव यांनी नैसर्गिक रंगाने रंगपंचमी खेळूया आरोग्य आणि पर्यावरण ही जपूया हा उपक्रम शाळेत राबवला. त्यासाठी निसर्गातील पाणी, फुले फळे आणि घरातील कॉर्नफ्लॉवर मैदा, पाणी या साहित्याचा वापर करून सोप्या पद्धतीने नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक कार्यशाळा जाधव यांनी घेऊन त्यात विद्याथ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळवला .

या रंगाेत्सवासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना साहित्य जमा करण्यास सांगितले. काही कोरडे रंग आणि काही पातळ रंग तयार करण्यात आले. नैसर्गिक रंग बनवताना मनातले तरंग आनंदाने तरंगत होते. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे हात आणि मन दोन्ही रंगात रंगून जात होते. शाळेत बनवलेले रंग विद्यार्थी घरातही बनवणार आणि शाळेप्रमाणे घरात आणि परिसरात नैसर्गिक रंग बनवण्याचा संदेश दिला. रंगाचा वापर आरोग्य आणि पर्यावरण जपत विद्यार्थ्यांना धुळवडीचा आगळवेगळा आनंद मिळवून देण्यात आला. विद्यार्र्थ्याने बनवलेल्या नैसर्गिक रंगाचे प्रदर्शन भरविण्यात आले व त्याची विक्री साठी स्टॉल लावुन स्वनिर्मित रंगाची खरेदी तथा विक्रीचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटून एक अनोख्या पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे