शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

२०० विद्यार्थी साजरी करणार पर्यावरणस्नेही होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:23 IST

होळी खेळताना पाण्याचा वापर कमी करा, नैसर्गिक रंगाचा वापर करा. रासायनिक रंगाचा वापर टाळा तसेच सुके नैसर्गिक रंग वापरा असे आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली.

जान्हवी मोर्र्येकल्याण : होळी खेळताना पाण्याचा वापर कमी करा, नैसर्गिक रंगाचा वापर करा. रासायनिक रंगाचा वापर टाळा तसेच सुके नैसर्गिक रंग वापरा असे आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी २०० शालेय विद्यार्थ्यानी पर्यावरणस्नेही होळी खेळण्याची तसेच पाणी वाचविण्याची शपथ घेतली.‘सुभेदार वाडा कट्टा’ यांच्या पुढाकारने हा कार्यक्रम सुभेदार वाडा शाळेत गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण दक्षता मंचाकडून पर्यावरण स्नेही होळीविषयी दरवर्षी जनजागृती केली जाते. पर्यावरण दक्षता मंचाच्या निष्ठा राऊत, हेमांगी सामंत यांच्यासह सुभेदार वाडा कट्ट्याचे प्रमुख दीपक जोशी हे या वेळी उपस्थित होते. सातवी तसेच आठवीच्या वर्गातील २०० विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. पर्यावरणपूरक होळी खेळून होळीचा खरा आनंद लुटता यावा, यासाठी विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याचे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले.पर्यावरणपूरक होळी खेळल्याने पर्यावरणाचे संतुलन राखता येऊ शकते. रासायनिक रंगाचा वापर केल्यास त्यातील शिसे आणि अन्य घातक पदार्थ हे शरीरावर दुष्परिणाम करणारे ठरतात. प्रसंगी या रंगामुळे अंधत्व तसेच त्वचा रोगही होतात. याविषयी विद्यार्थ्यांना मंचाच्या वतीने माहिती दिली.पर्यावरण स्नेही होळी खेळण्यासाठी केवळ नैसर्गिक रंगाचा वापर पुरेसा नाही. तर बिनपाण्याची होळी खेळणेही महत्त्वाचे आहे. होळीत रंग खेळताना लाखो लीटर पाण्याची नासाडी होते. एकीकडे महाराष्ट्राच्या काही भागात पाण्यामुळे शेती धोक्यात आली आहे. अनेक जिल्हे हे पाण्याच्या टंचाईने होरपळून निघत असताना पाण्याची नासाडी करणे कितपत योग्य आहे असा सवाल मंचाने विद्यार्थ्यांना केला.पर्यावरण स्नेही होळी कार्यक्रमाविषयी शालेय स्तरावर जनजागृती करण्याचा हा पहिलाच कार्यक्रम कट्ट्याच्या पुढाकाराने सुभेदारवाडा शाळेत सुरु करण्यात आला असून कल्याणमधील गजानन विद्यालय, शारदा मंदिर विद्यालय या शाळेमध्येही घेतला जाणार आहे. शालेय जीवनातच पर्यावरणाचा संस्कार विद्यार्थ्याच्या मनावर कोरला गेल्यास पुढची पिढी पर्यावरण स्नेही घडविण्यास मदत होणार आहे. उपक्रम लहान असला तरी पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, याकडे कट्ट्याचे प्रमुख जोशी यांनी लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांचा या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. याविषयी मंचाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.नैसर्गिक रंग कसे तयार करता येतात१. बीट - लाल रंग२. पळसाची पाने - सोनेरी रंग३. हळद -पिवळा रंग४. पालक -हिरवा रंग५.मेहंदी - मेहंदी रंग६.कात - तपकीरी रंग७.झेंडू - केशरी पिवळा रंगहे रंग तयार करण्याचे प्रात्याक्षिक दाखविले गेले. बीट, पळसाची पाने, हळदी, पालक, मेहंदी, पालक, कात, झेंडू हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यास त्यापासून हे रंग तयार करता येऊ शकतात. हे रंग सुकविता देखील येतात. त्यापासून सुके रंग तयार होतात. या सुक्या रंगाचा वापर केल्यास शरीराला कोणतीही हानी होत नाही. शिवाय पाण्याची बचत होते. याकडे मंचाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. मुलांनी या कार्यशाळेचा चांगला आनंद लुटला.

टॅग्स :Holiहोळी