शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

२०० विद्यार्थी साजरी करणार पर्यावरणस्नेही होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:23 IST

होळी खेळताना पाण्याचा वापर कमी करा, नैसर्गिक रंगाचा वापर करा. रासायनिक रंगाचा वापर टाळा तसेच सुके नैसर्गिक रंग वापरा असे आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली.

जान्हवी मोर्र्येकल्याण : होळी खेळताना पाण्याचा वापर कमी करा, नैसर्गिक रंगाचा वापर करा. रासायनिक रंगाचा वापर टाळा तसेच सुके नैसर्गिक रंग वापरा असे आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी २०० शालेय विद्यार्थ्यानी पर्यावरणस्नेही होळी खेळण्याची तसेच पाणी वाचविण्याची शपथ घेतली.‘सुभेदार वाडा कट्टा’ यांच्या पुढाकारने हा कार्यक्रम सुभेदार वाडा शाळेत गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण दक्षता मंचाकडून पर्यावरण स्नेही होळीविषयी दरवर्षी जनजागृती केली जाते. पर्यावरण दक्षता मंचाच्या निष्ठा राऊत, हेमांगी सामंत यांच्यासह सुभेदार वाडा कट्ट्याचे प्रमुख दीपक जोशी हे या वेळी उपस्थित होते. सातवी तसेच आठवीच्या वर्गातील २०० विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. पर्यावरणपूरक होळी खेळून होळीचा खरा आनंद लुटता यावा, यासाठी विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याचे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले.पर्यावरणपूरक होळी खेळल्याने पर्यावरणाचे संतुलन राखता येऊ शकते. रासायनिक रंगाचा वापर केल्यास त्यातील शिसे आणि अन्य घातक पदार्थ हे शरीरावर दुष्परिणाम करणारे ठरतात. प्रसंगी या रंगामुळे अंधत्व तसेच त्वचा रोगही होतात. याविषयी विद्यार्थ्यांना मंचाच्या वतीने माहिती दिली.पर्यावरण स्नेही होळी खेळण्यासाठी केवळ नैसर्गिक रंगाचा वापर पुरेसा नाही. तर बिनपाण्याची होळी खेळणेही महत्त्वाचे आहे. होळीत रंग खेळताना लाखो लीटर पाण्याची नासाडी होते. एकीकडे महाराष्ट्राच्या काही भागात पाण्यामुळे शेती धोक्यात आली आहे. अनेक जिल्हे हे पाण्याच्या टंचाईने होरपळून निघत असताना पाण्याची नासाडी करणे कितपत योग्य आहे असा सवाल मंचाने विद्यार्थ्यांना केला.पर्यावरण स्नेही होळी कार्यक्रमाविषयी शालेय स्तरावर जनजागृती करण्याचा हा पहिलाच कार्यक्रम कट्ट्याच्या पुढाकाराने सुभेदारवाडा शाळेत सुरु करण्यात आला असून कल्याणमधील गजानन विद्यालय, शारदा मंदिर विद्यालय या शाळेमध्येही घेतला जाणार आहे. शालेय जीवनातच पर्यावरणाचा संस्कार विद्यार्थ्याच्या मनावर कोरला गेल्यास पुढची पिढी पर्यावरण स्नेही घडविण्यास मदत होणार आहे. उपक्रम लहान असला तरी पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, याकडे कट्ट्याचे प्रमुख जोशी यांनी लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांचा या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. याविषयी मंचाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.नैसर्गिक रंग कसे तयार करता येतात१. बीट - लाल रंग२. पळसाची पाने - सोनेरी रंग३. हळद -पिवळा रंग४. पालक -हिरवा रंग५.मेहंदी - मेहंदी रंग६.कात - तपकीरी रंग७.झेंडू - केशरी पिवळा रंगहे रंग तयार करण्याचे प्रात्याक्षिक दाखविले गेले. बीट, पळसाची पाने, हळदी, पालक, मेहंदी, पालक, कात, झेंडू हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यास त्यापासून हे रंग तयार करता येऊ शकतात. हे रंग सुकविता देखील येतात. त्यापासून सुके रंग तयार होतात. या सुक्या रंगाचा वापर केल्यास शरीराला कोणतीही हानी होत नाही. शिवाय पाण्याची बचत होते. याकडे मंचाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. मुलांनी या कार्यशाळेचा चांगला आनंद लुटला.

टॅग्स :Holiहोळी