शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

२०० विद्यार्थी साजरी करणार पर्यावरणस्नेही होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:23 IST

होळी खेळताना पाण्याचा वापर कमी करा, नैसर्गिक रंगाचा वापर करा. रासायनिक रंगाचा वापर टाळा तसेच सुके नैसर्गिक रंग वापरा असे आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली.

जान्हवी मोर्र्येकल्याण : होळी खेळताना पाण्याचा वापर कमी करा, नैसर्गिक रंगाचा वापर करा. रासायनिक रंगाचा वापर टाळा तसेच सुके नैसर्गिक रंग वापरा असे आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी २०० शालेय विद्यार्थ्यानी पर्यावरणस्नेही होळी खेळण्याची तसेच पाणी वाचविण्याची शपथ घेतली.‘सुभेदार वाडा कट्टा’ यांच्या पुढाकारने हा कार्यक्रम सुभेदार वाडा शाळेत गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण दक्षता मंचाकडून पर्यावरण स्नेही होळीविषयी दरवर्षी जनजागृती केली जाते. पर्यावरण दक्षता मंचाच्या निष्ठा राऊत, हेमांगी सामंत यांच्यासह सुभेदार वाडा कट्ट्याचे प्रमुख दीपक जोशी हे या वेळी उपस्थित होते. सातवी तसेच आठवीच्या वर्गातील २०० विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. पर्यावरणपूरक होळी खेळून होळीचा खरा आनंद लुटता यावा, यासाठी विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याचे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले.पर्यावरणपूरक होळी खेळल्याने पर्यावरणाचे संतुलन राखता येऊ शकते. रासायनिक रंगाचा वापर केल्यास त्यातील शिसे आणि अन्य घातक पदार्थ हे शरीरावर दुष्परिणाम करणारे ठरतात. प्रसंगी या रंगामुळे अंधत्व तसेच त्वचा रोगही होतात. याविषयी विद्यार्थ्यांना मंचाच्या वतीने माहिती दिली.पर्यावरण स्नेही होळी खेळण्यासाठी केवळ नैसर्गिक रंगाचा वापर पुरेसा नाही. तर बिनपाण्याची होळी खेळणेही महत्त्वाचे आहे. होळीत रंग खेळताना लाखो लीटर पाण्याची नासाडी होते. एकीकडे महाराष्ट्राच्या काही भागात पाण्यामुळे शेती धोक्यात आली आहे. अनेक जिल्हे हे पाण्याच्या टंचाईने होरपळून निघत असताना पाण्याची नासाडी करणे कितपत योग्य आहे असा सवाल मंचाने विद्यार्थ्यांना केला.पर्यावरण स्नेही होळी कार्यक्रमाविषयी शालेय स्तरावर जनजागृती करण्याचा हा पहिलाच कार्यक्रम कट्ट्याच्या पुढाकाराने सुभेदारवाडा शाळेत सुरु करण्यात आला असून कल्याणमधील गजानन विद्यालय, शारदा मंदिर विद्यालय या शाळेमध्येही घेतला जाणार आहे. शालेय जीवनातच पर्यावरणाचा संस्कार विद्यार्थ्याच्या मनावर कोरला गेल्यास पुढची पिढी पर्यावरण स्नेही घडविण्यास मदत होणार आहे. उपक्रम लहान असला तरी पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, याकडे कट्ट्याचे प्रमुख जोशी यांनी लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांचा या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. याविषयी मंचाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.नैसर्गिक रंग कसे तयार करता येतात१. बीट - लाल रंग२. पळसाची पाने - सोनेरी रंग३. हळद -पिवळा रंग४. पालक -हिरवा रंग५.मेहंदी - मेहंदी रंग६.कात - तपकीरी रंग७.झेंडू - केशरी पिवळा रंगहे रंग तयार करण्याचे प्रात्याक्षिक दाखविले गेले. बीट, पळसाची पाने, हळदी, पालक, मेहंदी, पालक, कात, झेंडू हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यास त्यापासून हे रंग तयार करता येऊ शकतात. हे रंग सुकविता देखील येतात. त्यापासून सुके रंग तयार होतात. या सुक्या रंगाचा वापर केल्यास शरीराला कोणतीही हानी होत नाही. शिवाय पाण्याची बचत होते. याकडे मंचाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. मुलांनी या कार्यशाळेचा चांगला आनंद लुटला.

टॅग्स :Holiहोळी