शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

धक्कादायक! ऐतिहासिक 'वसई किल्ला' बनला मद्यपींचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:52 IST

पुरातत्व विभागाचे कुठलेच नियंत्रण नसल्यामुळे वसई किल्ला परिसरामध्ये अनेक मद्यपींचा राबता वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : वसईच्या इतिहासात महत्वपूर्ण  ठरलेला, चारशे वर्षांचा साक्षीदार म्हणून जगविख्यात असलेला प्राचीन 'वसई किल्ला' सध्या मद्यपींचा अड्डा बनलेला आहे. यावर पुरातत्व विभागाचे कुठलेच नियंत्रण नसल्यामुळे वसई किल्ला परिसरामध्ये अनेक मद्यपींचा राबता वाढला आहे. विशेष म्हणजे या भागात गैर कृत्य होऊ नये म्हणून पुरातत्व विभागामार्फत १२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. तरीही राजरोसपणे अनेक गैरप्रकार घडत असतात. नव्याने घडलेल्या घटनेत अशीच मद्य मैफील शिवसैनिकांनी उधळून लावलेली आहे. 

अधिक माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिर नजीक बालेकिल्ला येथे काही मद्यपी मद्यपान करीत असल्याची माहिती वसईतील (उबाठा गट) शिवसैनिकांना प्राप्त झाली. त्याची खातरजमा करण्यासाठी कोर्ट नाका विभाग प्रमुख दत्ता जाधव, उमेळा विभाग प्रमुख राकेश कदम यांनी सदर ठिकाणी भेट दिली असता, पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर ऐतिहासिक बालेकिल्ल्याच्या वरच्या बाजूस मद्यपींची मैफिल रंगलेली दिसली. 

यावर आक्षेप घेत सदर मद्यपींना वसई पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. आरोपी पैकी विक्रम दुबे (२७) व अन्य तीन यांना अटक करून विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली. अधिक तपास पोलीस हवालदार कोकरे करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार