शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण; ठाणे शहरात प्रथमच कोरोनाचे शून्य रूग्ण!

By सुरेश लोखंडे | Updated: November 29, 2022 22:54 IST

अडीच वर्षांत प्रथमच एकही रुग्ण नाही.

ठाणे : येथील महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोनाच्या गेल्या अडीच वर्षांपासून प्रथमच शून्य रुग्ण निदान मंगळवारी झाले आहे. हा कोरोनानंतरचा ऐतिहासिक क्षण नोंदवण्यात आल्याचे ठाणे सिव्हिलचे डॉ. प्रसाद भंडारी यांनी लोकमतला सांगितले.

कोरोना हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी घेतलेल्या अपरिमित परिश्रमानंतर आज आपण शून्य रुग्ण संख्येवर येऊन पोहोचलेलो आहोत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेतील फक्त प्रत्येकी एक एक नवीन रुग्ण आज आढळून आला आहे. या निदाना व्यतिरिक्त संपूर्ण जिल्ह्यातून आज एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कोरोनानंतर हे अत्यंत सकारात्मक दृष्टीने पडलेले पाऊल असल्याचे समाधान भंडारी यांनी व्यक्त केले.

आज दिवसभरात फक्त दोन रुग्ण सापडले आहेत. या व्यतिरिक्त ठाणे मनपासह उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर या महापालिकांमध्ये व अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिका आणि ग्रामीण भागात एकही रुग्ण आज सापडला नाही. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात सात लाख ४७ हजार ३१४ रुग्णांची नोंद गेल्या अडीच वर्षांच्या या कोरोना कालावधी झाली आहे. सध्या ६९ रुग्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत सात लाख ३६ हजार ४४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृत्यू आजही शुन्य नोंद असताना या कोरोना कालावधी ठाणे जिल्ह्यात ११ हजार ९६७ मृतांची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे