शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

ठाणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण; ठाणे शहरात प्रथमच कोरोनाचे शून्य रूग्ण!

By सुरेश लोखंडे | Updated: November 29, 2022 22:54 IST

अडीच वर्षांत प्रथमच एकही रुग्ण नाही.

ठाणे : येथील महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोनाच्या गेल्या अडीच वर्षांपासून प्रथमच शून्य रुग्ण निदान मंगळवारी झाले आहे. हा कोरोनानंतरचा ऐतिहासिक क्षण नोंदवण्यात आल्याचे ठाणे सिव्हिलचे डॉ. प्रसाद भंडारी यांनी लोकमतला सांगितले.

कोरोना हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी घेतलेल्या अपरिमित परिश्रमानंतर आज आपण शून्य रुग्ण संख्येवर येऊन पोहोचलेलो आहोत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेतील फक्त प्रत्येकी एक एक नवीन रुग्ण आज आढळून आला आहे. या निदाना व्यतिरिक्त संपूर्ण जिल्ह्यातून आज एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कोरोनानंतर हे अत्यंत सकारात्मक दृष्टीने पडलेले पाऊल असल्याचे समाधान भंडारी यांनी व्यक्त केले.

आज दिवसभरात फक्त दोन रुग्ण सापडले आहेत. या व्यतिरिक्त ठाणे मनपासह उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर या महापालिकांमध्ये व अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिका आणि ग्रामीण भागात एकही रुग्ण आज सापडला नाही. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात सात लाख ४७ हजार ३१४ रुग्णांची नोंद गेल्या अडीच वर्षांच्या या कोरोना कालावधी झाली आहे. सध्या ६९ रुग्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत सात लाख ३६ हजार ४४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृत्यू आजही शुन्य नोंद असताना या कोरोना कालावधी ठाणे जिल्ह्यात ११ हजार ९६७ मृतांची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे