शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

ऐतिहासिक माहुली किल्ला दुर्लक्षित; सोयीसुविधांची वानवा, पर्यटकांची होतेय गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 01:03 IST

डागडुजीची गरज, सह्याद्री पर्वताच्या रांगांपैकी हा एक डोंगर अतिउंच सुळक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. निसर्गसमृद्धी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा माहुली गड अंगाला शहारे आणणाऱ्या स्थितीत इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन करीत आहे.

सुरेश लोखंडेठाणे : बालशिवबांवर गर्भसंस्कार करणारा, तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंचीवरील म्हणजे समुद्रसपाटीपासून २,८१५ फुटांवर असलेला शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला विविध स्वरूपांच्या डागडुजीसह सोयीसुविधांपासून अद्यापही वंचितच आहे. राज्यभरातील गिरिप्रेमी व पर्यटकांना आकर्षित करणाऱ्यांना या गडावर विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सह्याद्री पर्वताच्या रांगांपैकी हा एक डोंगर अतिउंच सुळक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. निसर्गसमृद्धी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा माहुली गड अंगाला शहारे आणणाऱ्या स्थितीत इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन करीत आहे. शहापूर शहराच्या वायव्य दिशेला अवघ्या आठ किमी अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या दरीमधील उंच शिखरावर त्याचा सुळका आजच्या पिढीला विचार करण्यास भाग पाडत आहे. जवळ असलेली कल्याण व सोपारा (जि. पालघर) ही मालवाहतुकीची बंदरे, माहुलीवरून जव्हारमार्गे सुरत तसेच मुरबाड नाणेघाटमार्गे नगर, नाशिक अशा भौगोलिक रचनेमुळे इतिहासात या किल्ल्याला विशेष महत्त्व होते.

ऐतिहासिक महत्त्व

  • शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी जिजामाता भोसले यांचे या माहुली किल्ल्यावर काही काळ वास्तव्य होते. त्यामुळे शिवबांची गर्भसंस्कारभूमी म्हणूनही हा किल्ला शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहे. 
  • निजामशाहीचे संचालक म्हणून १६३५-३६ मध्ये शहाजीराजे बाळ शिवाजी व जिजाबाईंसह निजामाच्या शेवटच्या वारसाला घेऊन या गडावर वास्तव्याला होते. या दरम्यान १६३६ मध्ये मोगल सेनापती खानजमान याने या गडास वेढा दिला होता.

 

किल्ल्याच्या महादरवाजाची पूर्णपणे पडझड झाली असून खोदलेल्या पायऱ्यांवर ढासळलेल्या बुरुजांची दगडमाती पडलेले आहे. रस्त्यावर केवड्याची वने वाढल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. कल्याण दरवाजा, घाण दरवाजा हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. ३० फूट लांब व रुंद राजसदरेचे फक्त कातळ दगडाचे जोते शिल्लक आहे. 

आम्ही गडावर स्वच्छता मोहीम, गड परिक्रमा, माहुली जागर यासारखे कार्यक्रम राबवितो. परंतु, किल्ल्याची डागडुजी न केल्यास गडावरील ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची भीती आहे. - राजेश मोगरे, माहुली सेवा निसर्ग न्यास, शहापूर

गडाच्या पायथ्याशी भक्त निवारा केंद्र उभारले आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’, ‘स्वदेशदर्शन’ यासारख्या योजनेत या किल्ल्याचा समावेश झाल्यास या परिसराचा पर्यटन केंद्र म्हणून विकास होऊ शकतो. - विनोद लुटे, गडप्रेमी 

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज