शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

संक्रमण शिबिरातील घरे बाधितांनीच दिली भाड्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:08 IST

बीएसयूपी प्रकल्पातील किंवा अन्य विस्थापितांना पालिकेने दिलेली भाड्याची घरे इतरांना भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आलेला असताना ब्रह्मांड येथील संक्रमण शिबिराची सात

ठाणे : बीएसयूपी प्रकल्पातील किंवा अन्य विस्थापितांना पालिकेने दिलेली भाड्याची घरे इतरांना भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आलेला असताना ब्रह्मांड येथील संक्रमण शिबिराची सात मजल्याची अख्खी इमारतच कोपरीतील विस्थापितांनी भाड्याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या इमारतीत गेली चार वर्षे भाडेतत्वावर रहिवासी आहेत आणि एकाने काही महिन्यांपूर्वी या इमारतीतील घर विकून टाकले.कोपरीच्या सिध्दार्थनगर भागात बीएसयूपीच्या इमारती उभारण्यात येणार होत्या. त्यातील काहींची कामे पूर्ण झाली असून काही सुरु आहेत. तेथील बाधीतांचे पुनर्वसन तात्पुरत्या स्वरुपात विविध संक्रमण शिबिरात केले होते. ब्रह्मांड येथील निशा टीएमसी या इमारतीत अशाच काही जणांचे पुनर्वसन करण्यात आले होते. ही इमारत साधारणपणे सात ते आठ वर्षापूर्वी उभारण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी गुरूवारी सकाळी या इमारतीची पाहणी केली, तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.तळ अधिक सात मजल्याच्या या इमारतीत प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट असे ३२ फ्लॅट आहेत. त्यातील पाच फ्लॅट पालिकेच्या कर्मचाºयांना देण्यात आले आहेत. उर्वरित ९५ टक्के फ्लॅट हे प्रकल्पग्रस्तांनी गेली चार वर्षे भाड्याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पहिल्या मजल्यावर पेस्ट कंट्रोल कंपनीचे आॅफिस थाटण्यात आले आहे. प्रत्येक मजल्यावर काही रहिवासी चार वर्षापासून, काही दोन; तर काही पाच महिन्यांपासून भाड्याने राहत आहेत.मालकच ठावूक नाहीसध्या तेथे राहणाºया पोटभाडेकरूंना ही घरे कोणाला दिली होती, कशासाठी दिली होती, याची माहिती नाही. अनेकांना तर घर कोणाकडून भाड्याने घेतले आहे हेही ठावूक नाही.भाड्याचा दरही वेगवेगळाप्रत्येक मजल्यावरच्या किंवा आजूबाजूच्या फ्लॅटच्या भाड्याचा दर वेगवेगळा असल्याचे पाहणीत दिसून आले. काही जण ७५००, तर कोणी ६५००, तर काही जण सहा हजार भाडे मोजत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांनी पोट भाडेकरूंकडून तीन ते चार लाखांची कमाई केल्याचे उघड झाले.इमारतीची अवस्था दयनीयविकासकाची इमारत पालिकेकडे देताना उत्तम होती, पण तिचा अजिबात मेटेनेन्स झालेला नाही. सांडपाणी वाहिन्या तुंबल्या आहेत. पॅसेजमध्ये विजेचीही सोय नाही. अनेक मजल्यांवर घाण साठली आहे, तर मागील बाजूसही कचरा-घाणीचे साम्राज्य आहे. पण पालिकेनेही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.पालिकेचे कानावर हातया इमारतीमधील घरे कोणासाठी दिली होती, ते तेथे राहतात का, याची माहितीच पालिकेकडे नसल्याचे उघड झाले. प्रकल्पग्रस्तांनी त्यांना दिलेल्या तात्पुरत्या घरात पोटभाडेकरू ठेवले असतील, तर ही घरे ताब्यात घेतली जातील, असे जरी पालिका बजावत असली तरी ते चार वर्षांत झालेले नाही. यापूवी भाड्याची घरे दुसºयांना भाड्याने देणाºयांवर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल गुन्हे दाखल केले होते. त्यांची घरे काढून घेतली होती. तशीच कारवाई येथे होणार का, हा प्रश्न आहे.अन्य नगरसेवकांचे दबावतंत्रकोपरीतील नगरसेवकांना या पाहणीची माहिती कळताच त्यांनी फोन करुन घेर भाड्याने देणाºयांची बाजू घेतली. या रहिवाशांकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांना शाळा, कामाचे ठिकाण आणि इतर सोई-सुविधा जवळ मिळत नव्हत्या. म्हणून त्यांनी घरे भाड्याने दिल्याची कबुली देत अप्रत्यक्षपणे हा प्रकार ठावूक असल्याचे दाखवून दिले.करारनामाही धक्कादायक : ही घरे पालिकेने प्रकल्पग्रस्तांना दिली होती, त्यांनी ती दुसºयांना भाड्याने देतांना केलेला करारनामाही धक्कादायक आहे. त्यात प्रकल्पग्रस्ताने मला सध्या या घराची गरज नसल्याचे म्हटले आहे. या व्यक्ती विस्थापित झाल्या, त्यांना रहायला घर नाही म्हणून पालिकेने त्यांना हे घर दिलेले असताना त्यांनी या घराची गरज नसल्याने भाड्याने देत असल्याचे करार केले आहेत. ज्याला भाड्याने दिले, त्याला तातडीची गरज असल्याने मी हे घर ११ महिन्यांच्या करारावर भाड्याने देत असल्याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात करण्यात आला आहे.