शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वारस अद्याप ‘बेवारस’

By admin | Updated: June 24, 2016 03:42 IST

प्रोबेस एंटरप्रायजेस या कंपनीत झालेल्या स्फोटात मरण पावलेल्या १२ जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय या घटनेला महिना पूर्ण झाला तरी सरकारने घेतलेला नाही

अनिकेत घमंडी,  डोंबिवलीप्रोबेस एंटरप्रायजेस या कंपनीत झालेल्या स्फोटात मरण पावलेल्या १२ जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय या घटनेला महिना पूर्ण झाला तरी सरकारने घेतलेला नाही. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी मदतीचे प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाडल्याचे सांगितले जात असले तरी औद्योगिक दुर्घटनेत प्राण गेलेल्यांच्या वारसांना मदत देण्याचे सरकारचे धोरण नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मदत द्यायची की नाही, द्यायची तर किती द्यायची व किती कालावधीत द्यायची, याचा निर्णय घेणार आहेत.प्रोबेस कंपनीच्या स्फोटात १२ जणांचे बळी गेले तर २०८ हून अधिक कामगार-नागरिक जखमी झाले. तब्बल तीन हजार घरांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट दिली तेव्हा मदत देण्याची घोषणा केली. मात्र जखमींवरील उपचाराचा खर्च काही रुग्णालयांनी वसूल केला. मृतांच्या वारसांना एक छदामही न मिळाल्याने त्यांच्यासमोर कसे जगायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी मदत देण्याबाबत तीन प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवले आहेत. मात्र त्याचा तपशील कळलेला नाही. मदत व पुनर्वसन खात्याचे सचिव के. गोविंदराज म्हणाले की, औद्योगिक दुर्घटनेत मरण पावलेल्यांना राज्य शासनाने मदत देण्याचे सरकारचे धोरण नाही. मात्र विशेष बाब म्हणून जर मदत द्यायची झाली तर ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिली जाईल. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मुख्यमंत्री कार्यालयास धाडतील व त्यावर किती रकमेची मदत द्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील. प्रोबेस कंपनीतील शक्तीशाली स्फोटात १० ते १२ जणांना आपला जीव गमवावा लागला त्या घटनेला येत्या रविवारी एक महिना पूर्ण होत आहे. मात्र महिनाभरात मृतांच्या कुटुंबीयांकडे ना शासनाचा अधिकारी फिरकला ना त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. सरकार दारू पिऊन मरणाऱ्यांना तत्परतेने मदत देते. मात्र इतक्या भीषण दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या नातलगांकडे सपशेल दुर्लक्ष करते हे अन्यायकारक असल्याचे या दुर्घटनेतील मृत मयुरेश वायकोळे आणि सुशांत कांबळे यांच्या नातलगांचे मत आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्रीसाहेब, सांगा कसं जागयचं’ असा आर्त सवाल या नातेवाईकांनी केला आहे.घरांच्या नुकसानीची भरपाई अशक्यस्फोटात तीन हजार घरांचे तब्बल ६ कोटींचे नुकसान झाले, मात्र त्यांना कोणतीही मदत मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे ज्यांच्या घरांचे स्फोटात नुकसान झाले होते त्या नागरिकांच्या अपेक्षांवर सपशेल पाणी फेरले जाणार आहे. भरपाई मिळणार नव्हती तर मुख्यमंत्र्यांनी घरांचे पंचनामे करण्याबाबत आदेश का दिले? पंचनाम्यांची नौटंकी कशाला करण्यात आली ? असे सवाल केले जात आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘घरांच्या नुकसान भरपाईला वाटाण्याच्या अक्षता’ अशा शीर्षकाचे वृत्त १० जून रोजीच प्रसिद्ध केले होते.