शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

उल्हासनगरमध्ये भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: December 27, 2016 02:51 IST

पावसाळा संपून अवघे दोनच महिने उलटले असतानाच उल्हासनगरातील पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. जवळपास तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहत असून

उल्हासनगर : पावसाळा संपून अवघे दोनच महिने उलटले असतानाच उल्हासनगरातील पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. जवळपास तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहत असून उरलेले दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सध्या सात टक्के पाणीकपात लागू असताना ही स्थिती असताना पाटबंधारे विभागाने सुचवल्यानुसार जर २० टक्के पाणीकपात लागू झाली, तर हाहाकार माजण्याची भीती आहे. नागरिकांवर सध्या बोअरवेलचे दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. उल्हासनगर पालिकेकडे पाण्याचा स्वत:चा स्रोत नसल्याने पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. अपुऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल नगरसेवक एमआयडीसीला जबाबदार धरत आहेत, तर लोकसंख्येच्या गरजेच्या दुप्पट पाणीपुरवठा होऊनही जर नागरिकांना तीनच दिवस पाणी मिळत असेल, तर उरलेले अतिरिक्त पाणी जाते कुठे, असा प्रश्न आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना पडला आहे. त्यांनी शहराचा दौरा करून पाणीचोरी व गळतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अवैध नळजोडणी तोडण्याचे आदेश देऊनही हाती काहीच लागलेले नाही. गळती थांबवून मुबलक पाण्यासाठी ३०० कोटींची योजना राबवली. तीही ठप्प आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाण्याच्या टाक्यांवर कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती. टंचाईची झळ कमी करण्यासाठी पालिकेने भूगर्भीय सर्वेक्षण न करताच हातपंप व बोअरवेल खोदण्याचा सपाटा लावला. महिनाभरात २०० पेक्षा जास्त बोअरवेल व हातपंपाला पालिकेने मंजुरी दिली. त्यावर, चार कोटींचा खर्च केला. त्यातील अर्ध्याअधिक बोअरवेल दुरुस्ती व पाण्याविना कोरड्याठाक आहेत. सध्या धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही आठवड्यातून चार दिवस अपुरे पाणी मिळत असल्याने हातपंपाचे दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते सुभाष मनसुलकर यांनी दिली. (प्रतिनिधी) पूर्व-पश्चिम पाणीयुद्ध पेटणारपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पाण्याच्या प्रश्नाने राजकीय रंग घेतला आहे. शहराच्या पूर्वेला एमआयडीसीच्या जांभूळ व पाले जलसाठ्यातून ३७, तर पश्चिम बाजूला शहाड गावठाण जलसाठ्यातून ८८ एमएलडी पाणीपुरवठा होतो.पूर्वेला आठवड्यातून चार दिवस अपुरे व कमी दाबाने पाणी मिळते. पूर्व-पश्चिम भागात असमान पाणी वितरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून पूर्वेपेक्षा पश्चिमेला जादा पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ रविवारी नगरसेवक विजय पाटील यांनी रास्ता रोको केला. शिवसेनेचे गटनेते सुभाष मनसुलकर यांनी ३० डिसेंबरला शिवसेनेचे काही नगरसेवक पाण्यासाठी उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांच्यामुळे पाणीयोजना अडल्याचा आरोप यापूर्वी महासभेत झाला आहे. सेलवन हटाव, शहर बचाव, अशी मोहीम उघडण्यात आली होती. त्यांच्या हकालपट्टी व चौकशीची मागणी झाली होती. गेल्या उन्हाळ्यात हातपंप-बोअरवेल खोदण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी केला आहे.