शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

उल्हासनगरमध्ये भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: December 27, 2016 02:51 IST

पावसाळा संपून अवघे दोनच महिने उलटले असतानाच उल्हासनगरातील पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. जवळपास तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहत असून

उल्हासनगर : पावसाळा संपून अवघे दोनच महिने उलटले असतानाच उल्हासनगरातील पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. जवळपास तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहत असून उरलेले दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सध्या सात टक्के पाणीकपात लागू असताना ही स्थिती असताना पाटबंधारे विभागाने सुचवल्यानुसार जर २० टक्के पाणीकपात लागू झाली, तर हाहाकार माजण्याची भीती आहे. नागरिकांवर सध्या बोअरवेलचे दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. उल्हासनगर पालिकेकडे पाण्याचा स्वत:चा स्रोत नसल्याने पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. अपुऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल नगरसेवक एमआयडीसीला जबाबदार धरत आहेत, तर लोकसंख्येच्या गरजेच्या दुप्पट पाणीपुरवठा होऊनही जर नागरिकांना तीनच दिवस पाणी मिळत असेल, तर उरलेले अतिरिक्त पाणी जाते कुठे, असा प्रश्न आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना पडला आहे. त्यांनी शहराचा दौरा करून पाणीचोरी व गळतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अवैध नळजोडणी तोडण्याचे आदेश देऊनही हाती काहीच लागलेले नाही. गळती थांबवून मुबलक पाण्यासाठी ३०० कोटींची योजना राबवली. तीही ठप्प आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाण्याच्या टाक्यांवर कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती. टंचाईची झळ कमी करण्यासाठी पालिकेने भूगर्भीय सर्वेक्षण न करताच हातपंप व बोअरवेल खोदण्याचा सपाटा लावला. महिनाभरात २०० पेक्षा जास्त बोअरवेल व हातपंपाला पालिकेने मंजुरी दिली. त्यावर, चार कोटींचा खर्च केला. त्यातील अर्ध्याअधिक बोअरवेल दुरुस्ती व पाण्याविना कोरड्याठाक आहेत. सध्या धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही आठवड्यातून चार दिवस अपुरे पाणी मिळत असल्याने हातपंपाचे दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते सुभाष मनसुलकर यांनी दिली. (प्रतिनिधी) पूर्व-पश्चिम पाणीयुद्ध पेटणारपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पाण्याच्या प्रश्नाने राजकीय रंग घेतला आहे. शहराच्या पूर्वेला एमआयडीसीच्या जांभूळ व पाले जलसाठ्यातून ३७, तर पश्चिम बाजूला शहाड गावठाण जलसाठ्यातून ८८ एमएलडी पाणीपुरवठा होतो.पूर्वेला आठवड्यातून चार दिवस अपुरे व कमी दाबाने पाणी मिळते. पूर्व-पश्चिम भागात असमान पाणी वितरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून पूर्वेपेक्षा पश्चिमेला जादा पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ रविवारी नगरसेवक विजय पाटील यांनी रास्ता रोको केला. शिवसेनेचे गटनेते सुभाष मनसुलकर यांनी ३० डिसेंबरला शिवसेनेचे काही नगरसेवक पाण्यासाठी उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांच्यामुळे पाणीयोजना अडल्याचा आरोप यापूर्वी महासभेत झाला आहे. सेलवन हटाव, शहर बचाव, अशी मोहीम उघडण्यात आली होती. त्यांच्या हकालपट्टी व चौकशीची मागणी झाली होती. गेल्या उन्हाळ्यात हातपंप-बोअरवेल खोदण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी केला आहे.