शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

महामार्गांवरील कोंडी थांबवण्यासाठी अवजड वाहनांना ठेवणार वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:20 IST

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे.

ठाणे : ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नवरात्रोत्सवापूर्वी जिल्ह्यातील खड्डे भरण्याची तंबी सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी संबंधित यंत्रणांना दिली. याशिवाय, महामार्गांवर होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहने ठिकठिकाणी थांबवून ती काही वेळेनंतर टप्प्याटप्प्याने सोडण्याचे आदेशही त्यांनी वाहतूक नियंत्रण विभागास दिले.येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी शिंदे यांनी रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूककोंडी या विषयावर खास बैठक घेतली. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आणि वाहतूककोंडी दूर करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी खड्डे न भरल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेतही शिंदे यांनी यावेळी दिले. त्यामुळे अधिकाऱ्यांना खड्डे भरण्याची कारवाई युद्धपातळीवर करावी लागणार आहे. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी जेएनपीटीकडून येणारी अजवड वाहने त्यांच्याकडे असलेल्या भूखंडावर रोखायची. त्यानंतर, ती टप्प्याटप्प्याने सोडायची. यामुळे घोडबंदर रोडसह अन्य रस्त्यांवर या वाहनांमुळे वाहतूककोंडी होणार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.पालघरकडून घोडबंदर, अहमदाबाद महामार्गाने येणाºया अजवड वाहनांना रोखण्यासाठी व नाशिक महामार्गावरील अवजड वाहनांना रोखण्यासाठी मोठ्या भूखंडांचा तत्काळ शोध घेण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले. या भूखंडांवर ही अवजड वाहने थांबवण्यात यावी. त्यानंतर, ती टप्प्याटप्प्याने महामार्गांवर सोडावी, असे निर्देश शिंदे यांनी वाहतूक नियंत्रण विभागास दिले. यासाठी पडघ्याजवळ किंवा शहापूर, मुरबाड परिसरात भूखंड शोधण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, जेएनपीटी, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा प्रशासन आदी यंत्रणांनी समन्वय साधून वाहतूककोंडीवर एकत्रितपणे उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.याबरोबरच वाहतूककोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांसंदर्भात वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. या बैठकीस पालघर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार संजय केळकर, शांताराम मोरे, बाळाराम पाटील, बालाजी किणीकर, सुभाष भोईर, ज्योती कलानी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे आदींसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.ठाणे शहरामध्ये येणाºया आणि बाहेर जाणाºया रस्त्यांवर होणाºया वाहतूककोंडीची कारणे आणि त्यावर संबंधित यंत्रणेकडून करण्यात येणाºया उपाययोजनांचा यावेळी शिंदे आणि चव्हाण यांनी आढावा घेत यंत्रणांना धारेवर धरले. ठाणे वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यासाठी जेएनपीटीमध्ये असलेल्या वाहनतळाचा तत्काळ वापर सुरू करण्यात यावा, रायगडच्या जिल्हाधिकाºयांनी यामध्ये लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना शिंदे यांनी केल्या. सिडकोकडे असलेली वाहनतळे तत्काळ हस्तांतरित करण्यात यावीत. पालघरच्या जिल्हाधिकाºयांनी पालघरमधील दापचेरी, मनोर, चारोटीनाका येथील जागांची उपलब्धता वाहनतळांसाठी करून द्यावी, असेही त्यांनी यावेळी सूचित केले. ठाणे ग्रामीण भागातील शहापूर, पडघ्याचा वापर करावा. या वाहनतळाच्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन, फलक तसेच बॅरिकेड्स लावण्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले. ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकांचे बळीदेखील गेले आहेत. याची गांभीर्याने दखल घेत चव्हाण यांनी खड्ड्यांबाबत अधिकाºयांना फैलावर घेतले. ठाणे जिल्ह्यासह पालघर व रायगड जिल्ह्यांत पावसामुळे पडलेले खड्डे आणि वाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिकांनाही फटका बसत असून, रुग्णांना प्राण गमवावे लागल्याच्या मुद्द्यावर या वेळी चर्चा झाली. ठाणे महापालिकेच्या अधिकाºयांनी पालिका क्षेत्रातील खड्ड्यांची माहिती या वेळी दिली.।पथकर मार्गावरील खड्डे प्राधान्याने भरण्याबाबत संबंधित संस्थांना चव्हाण यांनी आदेश दिले. खड्डे तत्काळ न भरल्यास पथकर बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शीळफाटा, कळंबोलीनाका, पनवेल-उरण रस्ता, मुंब्रा बायपास आदी ठिकाणी होणाºया वाहतूककोंडीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.कोपरी पूल, पत्रीपूल कामाच्या सद्यस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. या पुलांच्या कामाबाबत नागरिकांना माहिती देणारा फलक लावावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला केल्या. यावेळी वाहतूककोंडीवरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. अवजड वाहनांना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचे काटेकोर पालन झालेच पाहिजे, असे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिले.