शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने विस्कटले संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:52 IST

शनिवारी आणि रविवारी पुन्हा बरसलेल्या जोरदार पावसाने जनजीवन पार विस्कळीत

ठाणे : दि. २६ आणि २७ जुलै रोजीच्या मुसळधार पावसातून पूरग्रस्त सावरले नसतानाच, शनिवारी आणि रविवारी पुन्हा बरसलेल्या जोरदार पावसाने जनजीवन पार विस्कळीत केले. पुराचे पाणी शेकडो घरांमध्ये शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्याने पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पुराचा दोनवेळा फटका बसल्याने जनसामान्यांचे हाल झाले आहेत.सोमवारी पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. मात्र, रेल्वे वाहतूक अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. रेल्वेरुळांवरील खडी मोठ्या प्रमाणात वाहून गेली असून, दुरुस्तीची बरीच कामेही निघाली आहेत. त्यामुळे बदलापूर-कर्जत मार्गावरील रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी दिली.पावसाचा फटका रस्ते वाहतुकीलाही बसला. मुंबई-नाशिक महामार्गावरील वर्दळीच्या कसारा घाटातील एक किमी रस्ता चार ते पाच फूट खचला असून, मातीभराव वाहून गेल्याने रस्ता दबला आहे. सुमारे २०० फूट उंच डोंगरच घाटरस्त्यावर कोसळल्याने, येथील मुंबई-नाशिक लेन बंद ठेवली आहे. दुसरीकडे, खर्डी-वैतरणा रस्ता आंबिवली-खैरपाडा फाट्याजवळ खचल्याने सोमवारी आंबिवली, टेंभा, वैतरणा आणि वाड्याकडे जाणारी वाहतूकही बंद होती. त्यामुळे या भागातील अनेक गावांचा व आदिवासीपाड्यांचा संपर्क तुटला. याशिवाय, कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात सोमवारी संरक्षक भिंत कोसळून भूस्खलन झाले. याच महामार्गावरील कल्याणजवळील रायते पुलास लागून असलेला रस्ताही उल्हास नदीच्या पुरात वाहून गेल्याने या महामार्गावरील वाहतूक दिवसभर बंद होती. आठ दिवसांपूर्वीच्या पुरातून सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या बदलापुरातील कुटुंबांना शनिवारी आणि रविवारी पुन्हा पुराचा सामना करावा लागला. 

टॅग्स :Rainपाऊस