शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मुसळधार पावसाने विस्कटले संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:52 IST

शनिवारी आणि रविवारी पुन्हा बरसलेल्या जोरदार पावसाने जनजीवन पार विस्कळीत

ठाणे : दि. २६ आणि २७ जुलै रोजीच्या मुसळधार पावसातून पूरग्रस्त सावरले नसतानाच, शनिवारी आणि रविवारी पुन्हा बरसलेल्या जोरदार पावसाने जनजीवन पार विस्कळीत केले. पुराचे पाणी शेकडो घरांमध्ये शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्याने पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पुराचा दोनवेळा फटका बसल्याने जनसामान्यांचे हाल झाले आहेत.सोमवारी पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. मात्र, रेल्वे वाहतूक अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. रेल्वेरुळांवरील खडी मोठ्या प्रमाणात वाहून गेली असून, दुरुस्तीची बरीच कामेही निघाली आहेत. त्यामुळे बदलापूर-कर्जत मार्गावरील रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी दिली.पावसाचा फटका रस्ते वाहतुकीलाही बसला. मुंबई-नाशिक महामार्गावरील वर्दळीच्या कसारा घाटातील एक किमी रस्ता चार ते पाच फूट खचला असून, मातीभराव वाहून गेल्याने रस्ता दबला आहे. सुमारे २०० फूट उंच डोंगरच घाटरस्त्यावर कोसळल्याने, येथील मुंबई-नाशिक लेन बंद ठेवली आहे. दुसरीकडे, खर्डी-वैतरणा रस्ता आंबिवली-खैरपाडा फाट्याजवळ खचल्याने सोमवारी आंबिवली, टेंभा, वैतरणा आणि वाड्याकडे जाणारी वाहतूकही बंद होती. त्यामुळे या भागातील अनेक गावांचा व आदिवासीपाड्यांचा संपर्क तुटला. याशिवाय, कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात सोमवारी संरक्षक भिंत कोसळून भूस्खलन झाले. याच महामार्गावरील कल्याणजवळील रायते पुलास लागून असलेला रस्ताही उल्हास नदीच्या पुरात वाहून गेल्याने या महामार्गावरील वाहतूक दिवसभर बंद होती. आठ दिवसांपूर्वीच्या पुरातून सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या बदलापुरातील कुटुंबांना शनिवारी आणि रविवारी पुन्हा पुराचा सामना करावा लागला. 

टॅग्स :Rainपाऊस