शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

मुसळधार पावसाचा केडीएमटीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:36 IST

कल्याण: मुसळधार पावसाचा केडीएमटी उपक्रमाला चांगलाच फटका बसला आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीत प्रवासी संख्या घटल्याने त्याचा ...

कल्याण: मुसळधार पावसाचा केडीएमटी उपक्रमाला चांगलाच फटका बसला आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीत प्रवासी संख्या घटल्याने त्याचा परिणाम दैनंदिन उत्पन्नावर झाला आहे. त्याचबरोबर संरक्षक भिंतीअभावी वालधुनी नदीचे पाणी गणेशघाट आगारात घुसल्याने तीन बसचे नुकसान झाले आहे. दरवर्षी अतिवृष्टीमुळे आगारात पाणी घुसून बसगाड्यांचे नुकसान होते. यावेळी तीच परिस्थिती झाली.

उत्पन्न आणि खर्चातील वाढत्या तफावतीमुळे तोट्यात चाललेल्या केडीएमटी उपक्रमाला या ना त्या कारणांमुळे सातत्याने फटका बसत आहे. भंगार बसचा खितपत पडलेला मुद्दा असो अथवा वारंवार बस नादुरुस्त होऊन त्या रस्त्यातच बंद पडण्याची परंपरा, यात प्रमुख आगार असलेल्या गणेशघाट आगाराची दुरवस्था पाहता उपक्रमाला घरघर लागल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये उपक्रमाच्या ५० बस रस्त्यावर धावत आहेत. साडेचार लाखांपर्यंत मिळणारे दैनंदिन उत्पन्न कोरोनाच्या प्रादुर्भावात सध्या दोन लाखांपर्यंत मिळत आहे. रिक्षांची वाढती संख्या याला कारणीभूत ठरत असली तरी मुसळधार पावसाचाही उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. यात दैनंदिन उत्पन्नात आणखी जवळपास एक लाखाची घट झाली आहे.

-----------------------------------------------

बसचे नुकसान

आगाराच्या पाठीमागील बाजूकडील वालधुनी नदीला लागून असलेली संरक्षक भिंत कोसळली आहे. अन्य ठिकाणीही तीच अवस्था आहे. आगारातील संरक्षक भिंती कोसळल्याने तेथील बसगाड्या आणि अन्य साहित्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोघा चोरट्यांकडून गिअर बॉक्स चोरण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. दरम्यान, कोसळलेल्या संरक्षक भिंतींकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा पावसाचे पाणी आगारात घुसल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. आगाराला लागून असलेल्या वालधुनी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने आणि भिंत पडल्याने पाणी आगारात घुसले होते. यात तीन बसचे मोठे नुकसान झाले आहे.

----------------------------------------------