शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाचा केडीएमटीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:36 IST

कल्याण: मुसळधार पावसाचा केडीएमटी उपक्रमाला चांगलाच फटका बसला आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीत प्रवासी संख्या घटल्याने त्याचा ...

कल्याण: मुसळधार पावसाचा केडीएमटी उपक्रमाला चांगलाच फटका बसला आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीत प्रवासी संख्या घटल्याने त्याचा परिणाम दैनंदिन उत्पन्नावर झाला आहे. त्याचबरोबर संरक्षक भिंतीअभावी वालधुनी नदीचे पाणी गणेशघाट आगारात घुसल्याने तीन बसचे नुकसान झाले आहे. दरवर्षी अतिवृष्टीमुळे आगारात पाणी घुसून बसगाड्यांचे नुकसान होते. यावेळी तीच परिस्थिती झाली.

उत्पन्न आणि खर्चातील वाढत्या तफावतीमुळे तोट्यात चाललेल्या केडीएमटी उपक्रमाला या ना त्या कारणांमुळे सातत्याने फटका बसत आहे. भंगार बसचा खितपत पडलेला मुद्दा असो अथवा वारंवार बस नादुरुस्त होऊन त्या रस्त्यातच बंद पडण्याची परंपरा, यात प्रमुख आगार असलेल्या गणेशघाट आगाराची दुरवस्था पाहता उपक्रमाला घरघर लागल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये उपक्रमाच्या ५० बस रस्त्यावर धावत आहेत. साडेचार लाखांपर्यंत मिळणारे दैनंदिन उत्पन्न कोरोनाच्या प्रादुर्भावात सध्या दोन लाखांपर्यंत मिळत आहे. रिक्षांची वाढती संख्या याला कारणीभूत ठरत असली तरी मुसळधार पावसाचाही उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. यात दैनंदिन उत्पन्नात आणखी जवळपास एक लाखाची घट झाली आहे.

-----------------------------------------------

बसचे नुकसान

आगाराच्या पाठीमागील बाजूकडील वालधुनी नदीला लागून असलेली संरक्षक भिंत कोसळली आहे. अन्य ठिकाणीही तीच अवस्था आहे. आगारातील संरक्षक भिंती कोसळल्याने तेथील बसगाड्या आणि अन्य साहित्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोघा चोरट्यांकडून गिअर बॉक्स चोरण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. दरम्यान, कोसळलेल्या संरक्षक भिंतींकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा पावसाचे पाणी आगारात घुसल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. आगाराला लागून असलेल्या वालधुनी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने आणि भिंत पडल्याने पाणी आगारात घुसले होते. यात तीन बसचे मोठे नुकसान झाले आहे.

----------------------------------------------