शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

भिवंडीत मुसळधार पावसाने झोडपले; मनपाचा आपत्कालीन विभाग सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 22:33 IST

घरात पाणी शिरलेल्या नागरिकांसाठी मनपाची कोणतीही सुविधा नसल्याने नागरिकांचा मनपा विरोधात तीव्र संताप

 

नितिन पंडीत

भिवंडी : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार रविवारी सायंकाळ पासून भिवंडी शहर व ग्रामीण भागात सुरू झालेले मुसळधार पावसाची संततधार सोमवारीही कायम राहिल्याने रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील शिवाजी चौक, ब्राह्मण आळी, अंबिकानगर ,कासार आळी,कमला हॉटेल, ईदगाह या नागरी वस्तीत सुमारे तीन फुटा पेक्षा अधिक पाणी साचल्याने नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.

          तीनबत्ती भाजी मार्केट मध्ये पाणी शिरल्याने सकाळ पासूनच भाजी मार्केट बंद पडले होते तर अनेक विक्रेत्यांनी आपल्या कडील भाजीपाला पाण्यात फेकून दिला होता .शहरातील अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरीकांना आपल्या कडील अत्यावश्यक साहित्य वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती .

            तर शहरातील ईदगाह या परिसरातील खाडी लगत असलेल्या झोपडीपट्टी मधील सुमारे ५०० हुन अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते ,तर येथील रस्त्यावर सुध्दा सुमारे चार फुटा हुन ही अधिक पाणी साचल्याने घरात अडकून पडलेल्या लहानग्यांसह पाळलेल्या बकरी बोकड यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्या साठीप होडीचा सहारा घ्यावा लागत होता . येथील नागरीकांना दुपारचे जेवण बनविण्यासाठी सुध्दा घरात जागा नसल्याने या नागरीकां वर उपाशी राहण्याची वेळ आली होती . परंतु या सर्व परिस्थितीत पालिका आपत्कालीन यंत्रणा सुस्त असल्याने कोणत्याच ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी पालिका कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आली नाही. तर मनपा प्रशासना विरोधात इडगा रोड परिसरात घरात पाणी शिरलेल्या नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Rainपाऊस