शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत मुसळधार पावसाने झोडपले; मनपाचा आपत्कालीन विभाग सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 22:33 IST

घरात पाणी शिरलेल्या नागरिकांसाठी मनपाची कोणतीही सुविधा नसल्याने नागरिकांचा मनपा विरोधात तीव्र संताप

 

नितिन पंडीत

भिवंडी : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार रविवारी सायंकाळ पासून भिवंडी शहर व ग्रामीण भागात सुरू झालेले मुसळधार पावसाची संततधार सोमवारीही कायम राहिल्याने रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील शिवाजी चौक, ब्राह्मण आळी, अंबिकानगर ,कासार आळी,कमला हॉटेल, ईदगाह या नागरी वस्तीत सुमारे तीन फुटा पेक्षा अधिक पाणी साचल्याने नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.

          तीनबत्ती भाजी मार्केट मध्ये पाणी शिरल्याने सकाळ पासूनच भाजी मार्केट बंद पडले होते तर अनेक विक्रेत्यांनी आपल्या कडील भाजीपाला पाण्यात फेकून दिला होता .शहरातील अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरीकांना आपल्या कडील अत्यावश्यक साहित्य वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती .

            तर शहरातील ईदगाह या परिसरातील खाडी लगत असलेल्या झोपडीपट्टी मधील सुमारे ५०० हुन अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते ,तर येथील रस्त्यावर सुध्दा सुमारे चार फुटा हुन ही अधिक पाणी साचल्याने घरात अडकून पडलेल्या लहानग्यांसह पाळलेल्या बकरी बोकड यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्या साठीप होडीचा सहारा घ्यावा लागत होता . येथील नागरीकांना दुपारचे जेवण बनविण्यासाठी सुध्दा घरात जागा नसल्याने या नागरीकां वर उपाशी राहण्याची वेळ आली होती . परंतु या सर्व परिस्थितीत पालिका आपत्कालीन यंत्रणा सुस्त असल्याने कोणत्याच ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी पालिका कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आली नाही. तर मनपा प्रशासना विरोधात इडगा रोड परिसरात घरात पाणी शिरलेल्या नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Rainपाऊस