शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

भिवंडीत मुसळधार पावसाने झोडपले; मनपाचा आपत्कालीन विभाग सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 22:33 IST

घरात पाणी शिरलेल्या नागरिकांसाठी मनपाची कोणतीही सुविधा नसल्याने नागरिकांचा मनपा विरोधात तीव्र संताप

 

नितिन पंडीत

भिवंडी : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार रविवारी सायंकाळ पासून भिवंडी शहर व ग्रामीण भागात सुरू झालेले मुसळधार पावसाची संततधार सोमवारीही कायम राहिल्याने रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील शिवाजी चौक, ब्राह्मण आळी, अंबिकानगर ,कासार आळी,कमला हॉटेल, ईदगाह या नागरी वस्तीत सुमारे तीन फुटा पेक्षा अधिक पाणी साचल्याने नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.

          तीनबत्ती भाजी मार्केट मध्ये पाणी शिरल्याने सकाळ पासूनच भाजी मार्केट बंद पडले होते तर अनेक विक्रेत्यांनी आपल्या कडील भाजीपाला पाण्यात फेकून दिला होता .शहरातील अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरीकांना आपल्या कडील अत्यावश्यक साहित्य वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती .

            तर शहरातील ईदगाह या परिसरातील खाडी लगत असलेल्या झोपडीपट्टी मधील सुमारे ५०० हुन अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते ,तर येथील रस्त्यावर सुध्दा सुमारे चार फुटा हुन ही अधिक पाणी साचल्याने घरात अडकून पडलेल्या लहानग्यांसह पाळलेल्या बकरी बोकड यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्या साठीप होडीचा सहारा घ्यावा लागत होता . येथील नागरीकांना दुपारचे जेवण बनविण्यासाठी सुध्दा घरात जागा नसल्याने या नागरीकां वर उपाशी राहण्याची वेळ आली होती . परंतु या सर्व परिस्थितीत पालिका आपत्कालीन यंत्रणा सुस्त असल्याने कोणत्याच ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी पालिका कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आली नाही. तर मनपा प्रशासना विरोधात इडगा रोड परिसरात घरात पाणी शिरलेल्या नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Rainपाऊस