शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

भिवंडीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी साचले पावसाचे पाणी

By नितीन पंडित | Updated: July 19, 2023 15:09 IST

वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर

भिवंडी: भिवंडीत रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील तीन बत्ती,भाजी मार्केट,दर्गा रोड,म्हाडा कॉलनी,ईडगाह ,पद्मानगर , धामणकर नाका, ७२ गाळा,नारपोली,कल्याण नाका अशा नाईक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे,त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शहरातील निजामपुरा भाजी मार्केट, गुलजार कोल्ड्रिंक हाऊस परिसरात कंबरभर पाणी साचले होते.रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.या वाहतूक कोंडीतून प्रवास करतांना वाहन चालकांसह नागरिकांचे मोठे हाल झाले होते. शहरातील भंडारी कंपाउंड ते दर्गाह नाका या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नागरिकांनी रस्सी बांधून या रस्त्यावरची ये जा बंद केली होती.कामतघर येथील वऱ्हाळादेवी तलाव देखील ओव्हरफ्लो झाला असून परिसरातील अनेक रहिवासी संकुलनांमध्ये देखील पाणी शिरले होते.अंजुरफाटा ओसवाल स्कुल परिसरात देखील प्रचंड पाणी भरल्याने येथील नागरिकांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागला.

तर अंजुरफाटा, राहनाळ ,काल्हेर येथे रस्त्यावर पाणी साचल्याने ठाणे काल्हेर अंजुरफाटा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती तर दापोडा परिसरात पाणी साचल्याने मानकोली अंजुरफाटा रस्त्यावरहि वाहतूक कोंडी झली होती.मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावर देखील।प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.