शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पक्ष्यांना उष्माघाताचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:10 IST

सर्वाधिक १४ घारी, आठ ससाण्यांचा समावेश : एसपीसीए संस्थेला त्यांचे जीव वाचवण्यात यश

ठाणे: फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा अचानक काही प्रमाणात पारा वाढल्याने ठाणे, डोंबिवली, मुलुंड आणि घोडबंदर या परिसरांत वावरणाऱ्या दुर्मीळ २४ पक्ष्यांना उष्माघाताचा तडाखा बसला आहे. त्यांना प्राणी व पक्षिमित्रांनी वेळीच ठाण्यातील एसपीसीए या संस्थेत उपचारार्थ दाखल केल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक १४ घारींसह ससाणे आणि बगळे यासारख्या पक्ष्यांचाही समावेश असून त्यातील काही पक्षी लवकरच आकाशी पुन्हा एकदा भरारी घेण्यास तयार झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

आॅक्टोबर आणि मे या महिन्यांत पशुपक्ष्यांना उष्माघाताचा जास्त त्रास होतो. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात वावरणाºया २४ दुर्मीळ पक्ष्यांना उष्माघात झाल्याचे समोर आले आहे. २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान ठाणे एसपीसीए या संस्थेच्या रुग्णालयात या पक्ष्यांवर उपचार सुरू आहेत. या जखमींमधील पक्ष्यांमध्ये १४ घारी, आठ ससाणे आणि दोन बगळे असून त्यातील निम्म्या पक्ष्यांना दोन ते चार दिवसांत मुक्तसंचार करण्यासाठी येऊर, कर्नाळा किंवा ज्याज्या परिसरांतून आणले, त्यात्या परिसरांत सोडले जाणार आहे. उर्वरित पक्ष्यांनाही लवकरच सोडण्यात येईल. तसेच अशा पक्ष्यांसाठी सद्य:परिस्थितीनुसार त्यांच्यासाठी खास व्यवस्थाही केली असून तेथे त्यांच्यावर योग्यरीत्या उपचार सुरू असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास राणे यांनी दिली.विहिरीत पडून कोल्हा जखमीपाण्याच्या शोधात ऐरोली परिसरात आलेला कोल्हा तेथील एका कोरड्या विहिरीत पडला होता. त्याला वनविभाग आणि अग्निशामक दलाने विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर, सामाजिक संस्था आणि वनविभागाचे अधिकारी रविवारी (२४ फेब्रुवारीला) ठाणे एसपीसीए या संस्थेत उपचारार्थ दाखल केले होते. तपासणीत त्याच्या मानेला दुखापत झाल्याचे समोर आले असून त्याला पुढे वनविभागाच्या रुग्णालयात हलवले आहे. अशा प्रकारे वर्षभरात साधारणत: पाच कोल्ह्यांना उपचारार्थ आणल्याची माहिती डॉ. राणे यांनी दिली.