शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पारा गेला चाळिशीपार! ठाणे ४३ अंशांवर, वाढत्या उकाड्याने ठाणेकरांची लाहीलाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 06:26 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील तापमानात कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे.

ठाणे/मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील तापमानात कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यातही गेले तीन दिवस शहराचे तापमान ४० अंशांपेक्षा अधिक दिसून आले आहे. बुधवारी शहरातील तापमान ४३.३ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. वाढत्या तापमानामुळे एप्रिल महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागले असून या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. ठाणे जिल्ह्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने बदल झाले. ऐन उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. यानंतर रात्री थंडी आणि दिवसा उष्मा असे वातावरण बदल दिसून आले, असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होऊन शहराचे तापमान चाळीशी पार गेले आहे. शहरात १० एप्रिलला ४२.१ अंश सेल्सियस, तर ११ एप्रिलला ४२.८ अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे, तर बुधवारी म्हणजेच १२ एप्रिलला तापमानात आणखी वाढ झाली असून शहरात ४३.३ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदविले गेले आहे. 

सकाळी १० पासूनच चटके     वाढत्या तापमानामुळे शहरात सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत हे वातावरण कायम असते. या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.      यापासून बचाव करण्यासाठी नागरिक छत्री, स्कार्फ, टोपी, गॉगलचा वापर करताना दिसत आहेत. तसेच ताक, उसाचा रस, लिंबू सरबत असे पेय पीत असून यामुळे थंडपेयाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.

मुंबईचा पारा ३६च्या पुढे ; पुढील पाच दिवस पावसाचेमुंबईकरांना उन्हाचा तडाखा बसत असून, मुंबईचे कमाल तापमान आता ३६ अंशांपार गेले आहे. तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून, पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही भागांना पावसाचा इशारा दिला असून, यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा देण्यात आल्याने अवकाळीचे संकट आणखी गहिरे झाले आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांसाठी राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. १४ एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची दाट शक्यता आहे. १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्टरत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार