शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

निवडणूक प्रचाराला उन्हाचा तडाखा

By admin | Updated: February 17, 2017 02:11 IST

ठाण्यासह उल्हासनगरमध्ये निवडणुकांच्या प्रचारासाठी उमेदवारांची चांगलीच कसरत होत आहे. आता पॅनल पद्धत असल्याने उमेदवारांना

अजित मांडके /पंकज पाटील / ठाणे/उल्हासनगरठाण्यासह उल्हासनगरमध्ये निवडणुकांच्या प्रचारासाठी उमेदवारांची चांगलीच कसरत होत आहे. आता पॅनल पद्धत असल्याने उमेदवारांना मोठा प्रभाग पिंजून काढावा लागत आहे. त्यात, गेल्या तीनचार दिवसांपासून उन्हाचा पारा ३७ अंशाच्यावर पोचल्याने त्याचा परिणाम उमेदवारांच्या प्रचारावर होत आहे. सकाळी दोन तास आणि थेट सायंकाळी ५ नंतरच उमेदवारांना प्रचारासाठी बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे कमी वेळेत जास्तीतजास्त प्रचार, हे गणित सोडवणे अवघड जात आहे. उन्हात फिरण्यास कार्यकर्ते तयार नसल्याने उमेदवार कासावीस झाले आहेत. तापलेल्या वातावरणात काम करताना निवडणूक कर्मचाऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला आहे. प्रचाराचा जोर आणि उन्हाचा पारा, यामध्ये वाढ झालेली असली तरी वेळेचे नियोजन करण्यात अनेक अडचणी येत आहेत. दिवसभर प्रचाराची मुदत असली तरी प्रत्यक्षात उमेदवारांना केवळ ६ तासच प्रचारासाठी मिळत आहेत. सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेतच ते प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. त्यानंतर, उन्हाचा तडाखा वाढत असल्याने कार्यकर्ते फिरण्यास तयार होत नाहीत. मतदारही दुपारच्या वेळेत प्रतिसाद देत नसल्याने इच्छा असतानाही उमेदवारांना प्रचारासाठी जाता येत नाही. त्यामुळे प्रचाराची खरी कसरत सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेतच दिसत आहे. सायंकाळच्या ४ तासांतच संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. उमेदवारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी आणि प्रचारपत्रके वाटण्यासाठी उमेदवारांना हीच वेळ योग्य आहे. तर, दुपारचे ४ तास इतर नियोजनात घालवण्याची वेळ आली आहे. उन्हाचा पारा वाढल्याने कोणीच बाहेर पडण्यास तयार होत नसल्याने ही वेळ कार्यकर्त्यांच्या आरामाची वेळ झाली आहे. मात्र, सायंकाळच्या ४ तासांत न थांबता आणि न थकता कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी व्हावे लागत आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावरच त्यांनी भर दिला आहे. त्यातच, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उल्हासनगरकडे पाठ फिरवल्याने तेथील उमेदवारांनी चौक सभा आणि प्रत्यक्ष भेटी यावरच भर दिला आहे. दरम्यान, चार उमेदवार एका पॅनलमध्ये असल्याने एकत्रित प्रचारापेक्षा ठाण्यासह उल्हासनगरच्या काही उमेदवारांनी वैयक्तिक प्रचारावर भर दिला आहे. संपूर्ण प्रभागात एकदा तरी मतदारांना भेटता यावे, हे लक्ष ठेवून उमेदवार आपल्या प्रचाराचे नियोजन करत आहेत. त्यातच, मतदानाच्या दोन दिवस आधीच प्रचार बंद होत असल्याने उमेदवारांना कमी वेळेत जास्तीतजास्त प्रचार करण्यावर भर देण्याची वेळ आली आहे.