शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रचाराला उन्हाचा तडाखा

By admin | Updated: February 17, 2017 02:11 IST

ठाण्यासह उल्हासनगरमध्ये निवडणुकांच्या प्रचारासाठी उमेदवारांची चांगलीच कसरत होत आहे. आता पॅनल पद्धत असल्याने उमेदवारांना

अजित मांडके /पंकज पाटील / ठाणे/उल्हासनगरठाण्यासह उल्हासनगरमध्ये निवडणुकांच्या प्रचारासाठी उमेदवारांची चांगलीच कसरत होत आहे. आता पॅनल पद्धत असल्याने उमेदवारांना मोठा प्रभाग पिंजून काढावा लागत आहे. त्यात, गेल्या तीनचार दिवसांपासून उन्हाचा पारा ३७ अंशाच्यावर पोचल्याने त्याचा परिणाम उमेदवारांच्या प्रचारावर होत आहे. सकाळी दोन तास आणि थेट सायंकाळी ५ नंतरच उमेदवारांना प्रचारासाठी बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे कमी वेळेत जास्तीतजास्त प्रचार, हे गणित सोडवणे अवघड जात आहे. उन्हात फिरण्यास कार्यकर्ते तयार नसल्याने उमेदवार कासावीस झाले आहेत. तापलेल्या वातावरणात काम करताना निवडणूक कर्मचाऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला आहे. प्रचाराचा जोर आणि उन्हाचा पारा, यामध्ये वाढ झालेली असली तरी वेळेचे नियोजन करण्यात अनेक अडचणी येत आहेत. दिवसभर प्रचाराची मुदत असली तरी प्रत्यक्षात उमेदवारांना केवळ ६ तासच प्रचारासाठी मिळत आहेत. सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेतच ते प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. त्यानंतर, उन्हाचा तडाखा वाढत असल्याने कार्यकर्ते फिरण्यास तयार होत नाहीत. मतदारही दुपारच्या वेळेत प्रतिसाद देत नसल्याने इच्छा असतानाही उमेदवारांना प्रचारासाठी जाता येत नाही. त्यामुळे प्रचाराची खरी कसरत सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेतच दिसत आहे. सायंकाळच्या ४ तासांतच संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. उमेदवारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी आणि प्रचारपत्रके वाटण्यासाठी उमेदवारांना हीच वेळ योग्य आहे. तर, दुपारचे ४ तास इतर नियोजनात घालवण्याची वेळ आली आहे. उन्हाचा पारा वाढल्याने कोणीच बाहेर पडण्यास तयार होत नसल्याने ही वेळ कार्यकर्त्यांच्या आरामाची वेळ झाली आहे. मात्र, सायंकाळच्या ४ तासांत न थांबता आणि न थकता कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी व्हावे लागत आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावरच त्यांनी भर दिला आहे. त्यातच, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उल्हासनगरकडे पाठ फिरवल्याने तेथील उमेदवारांनी चौक सभा आणि प्रत्यक्ष भेटी यावरच भर दिला आहे. दरम्यान, चार उमेदवार एका पॅनलमध्ये असल्याने एकत्रित प्रचारापेक्षा ठाण्यासह उल्हासनगरच्या काही उमेदवारांनी वैयक्तिक प्रचारावर भर दिला आहे. संपूर्ण प्रभागात एकदा तरी मतदारांना भेटता यावे, हे लक्ष ठेवून उमेदवार आपल्या प्रचाराचे नियोजन करत आहेत. त्यातच, मतदानाच्या दोन दिवस आधीच प्रचार बंद होत असल्याने उमेदवारांना कमी वेळेत जास्तीतजास्त प्रचार करण्यावर भर देण्याची वेळ आली आहे.