शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

भिवंडी न्यायालयांत राहुल गांधीं यांच्यावरील याचिकेची १५ डिसेंबर रोजी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 20:51 IST

भिवंडी : भिवंडी न्यायालयांत राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल याचीकेची आज सोमवारी सुनावणी होऊन याचीकाकर्त्याचा अर्ज न्यायालयाने खारीज केला. त्यामुळे याचीकेला वेगळे वळण मिळाले असून न्यायालयाने पुढील सुनावणी १५ डिसेंबर रोजी ठेवली आहे.त्या वेळी साक्षीचे जाबजबाब होणार असल्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार राहूल गांधी हे या सुनावणीसाठी हजर ...

ठळक मुद्देसुनावणी दरम्यान याचीकाकर्त्याचा अर्ज न्यायालयाने केला खारीजयाचिका समन्स ट्रायलने चालणारपुढील सुनावणी १५ डिसेंबर रोजी

भिवंडी: भिवंडी न्यायालयांत राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल याचीकेची आज सोमवारी सुनावणी होऊन याचीकाकर्त्याचा अर्ज न्यायालयाने खारीज केला. त्यामुळे याचीकेला वेगळे वळण मिळाले असून न्यायालयाने पुढील सुनावणी १५ डिसेंबर रोजी ठेवली आहे.त्या वेळी साक्षीचे जाबजबाब होणार असल्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार राहूल गांधी हे या सुनावणीसाठी हजर रहाण्याची दाट शक्यता आहे.तालुक्यातील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत राहूल गांधी यांनी महात्मा गांधींजींची हत्या आरएसएसनेच घडवून आणली,असे खळबळजनक वक्तव्य केल्याचा आरोप करीत आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिके विरोधात राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून सदरच्या याचिकेची सुनावणी दिल्ली न्यायालयांत करण्याची विनंती केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रासोबत भाषणातील उतारा दाखल केला होता. तो उतारा भिवंडी कोर्टात पुरावा म्हणून दाखल करून घ्यावा,असा अर्ज याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयाकडे केला होता.परंतू मागील १२जून २०१८ रोजी भिवंडी न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी राहूल गांधी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. तसेच राहुल गांधी यांच्या वकीलांनी ही याचिका समन्स ट्रायल प्रमाणे चालविण्याची मागणी केली तसेच उच्च न्यायालयातील कागदपत्रे भिवंडी न्यायालयांत दाखल करून घेण्यास न्यायालयास विरोध दर्शविला होता. त्यावेळी ही याचिका समन्स ट्रायल प्रमाणे चालविणयास न्यायालयाने मान्यता दिली. आज रोजी भिवंडी न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर भिवंडी न्यायालतील मुख्य न्यायाधिश ए.ए.शेख यांनी याचिकाकर्त्यांचा अर्ज व इतर सादर केलेले पुरावे फेटाळले. तसेच याचिका कर्त्यांनी दोषारोप पत्रासोबत सादर केलेले पुरावे न्यायालसमोर सिध्द करावेत,असा युक्तीवाद राहूल गांधी यांच्या वकीलांनी केला असता तो न्यायालयाने मान्य केला. त्याचबरोबर न्यायालयाने पुढील सुनावणी १५ डिसेंबर २०१८ रोजी ठेवली आहे. ही याचिका समन्स ट्रायलने चालणार असल्याने याचिकाकर्त्यांना सबळ पुरावे न्यायालयासमोर आणावे लागणार आहे. तसेच पुढील सुनावणीत साक्ष होणार असल्याने या सुनावणीच्या वेळी राहूल गांधी न्यायालयात हजर रहाण्याची दाट शक्यता आहे. आज सुनावणी वेळी राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर,तुषार मोर,सुदीप पाटभोर यांनी पाहिले असुन त्यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRahul Gandhiराहुल गांधी