शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

मीरा भाईंदर शहराच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यावरील हरकती सूचनांवर फेब्रुवारीत २ टप्प्यात होणार सुनावणी

By धीरज परब | Updated: January 30, 2023 13:36 IST

मीरा भाईंदर शहराच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यावर आलेल्या हरकती व सूचनांवर फेब्रुवारी महिन्यात २ टप्प्यात भाईंदर येथील महापालिका मुख्यालयात सुनावणी होणार आहे. 

मीरारोड -

मीरा भाईंदर शहराच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यावर आलेल्या हरकती व सूचनांवर फेब्रुवारी महिन्यात २ टप्प्यात भाईंदर येथील महापालिका मुख्यालयात सुनावणी होणार आहे. 

मीरा भाईंदर शहराचा प्रारूप सुधारित विकास आराखडा आधी आरखडा फुटीने वादग्रस्त ठरला . नंतर  पालिके कडून काम काढून घेऊन ते ठाणे जिल्ह्याच्या नगररचना सहायक संचालक यांच्या कडे देण्यात आले होते . विविध कारणांनी विलंब झालेला प्रारूप आराखडा २८ ऑक्टोबर रोजी हरकती - सूचनांसाठी जाहीर केला होता.  

सहायक संचालक किशोर पाटील यांनी जाहीर केलेल्या प्रारूप आराखड्यावर हरकती - सूचनां साठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती . सदर प्रारूप आराखड्यावर देखील अस्तित्वातील रस्ते न दर्शवणे , आरक्षण कमी करणे , हरित पट्टा कमी करणे , काही राजकीय कम विकासकांना फायदा पोहचवणे आदी स्वरूपाचे आरोप सुद्धा झाले. तर मीरा भाईंदर महापालिकेत ३०५१  ;  ठाणे सहायक संचालक कार्यालयात २ हजार १५८  तर कोकण भवन येथील नगररचना सह संचालक यांच्या कार्यालयात ५३ अश्या एकूण ५ हजार २६२ हरकती व सूचना आल्या आहेत. 

आलेल्या हरकतींची छाननी केली असता त्यात अनेक हरकती एकसारख्या व दोनवेळा केलेल्या असल्याने प्रत्यक्षात त्याची संख्या कमी झाली आहे . हरकती सूचनांवर कार्यवाही साठी ४ सदस्यांची नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे . आता आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी  संबंधित अर्जदारांना नोटिसा बजावण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपवण्यात आली आहे. पालिकेने सुनावणीसाठी नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. 

दोन टप्प्यात सुनावणी होणार आहे . ८ व  ९ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात तर १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान दुसऱ्या टप्प्यात मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर येथील मुख्यालयातल्या दुसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभागृहात सुनावणी घेतली जाणार आहे . सुनावणी झाल्यावर आलेल्या हरकती - सूचना व मुद्द्यांची माहिती राज्य शासना कडे अहवालासह सादर केली जाईल . शासना कडून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाऊन अंतिम सुधारित विकास आराखडा मंजूर करून तो प्रसिद्ध केला जाणार आहे.