शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

शासकीय जागेवरील दुकानांच्या वादावर आज सुनावणी

By admin | Updated: February 13, 2017 04:58 IST

अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोरील शाळेसाठी दिलेल्या शासकीय जागेवर अनधिकृतपणे ४५ गाळे उभारण्यात आले होते.

अंबरनाथ : अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोरील शाळेसाठी दिलेल्या शासकीय जागेवर अनधिकृतपणे ४५ गाळे उभारण्यात आले होते. या दुकानांवर कारवाई करून तो भूखंड मोकळा करण्याची मागणी एका नागरिकाने केली होती. त्यानुसार, या गाळ्यांवर कारवाईदेखील होणार होती. मात्र, येथील दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचा निर्णय घेतला असून ती उद्या, १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सुनावणीत अतिक्रमण हटवण्याच्या आदेशाला तारीख मिळते की, थेट निर्णय मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालयासाठी शासनाने शेती विषय शिकवण्यासाठी शाळेला भूखंड दिला होता. मात्र, कालांतराने शेती विषय बंद झाल्याने हा भूखंड पडीक अवस्थेत होता. या जागेवर काही व्यापाऱ्यांनी ४५ अनधिकृत गाळे उभारत त्यावर अतिक्रमण केले. हे अतिक्रमण हटवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शौकत शेख यांनी केली होती. मात्र, स्थानिक आणि जिल्हापातळीवर कारवाई होत नसल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. शासनाने या अनधिकृत गाळ्यांना दिलेल्या स्थगिती आदेशावर सुनावणी करताना ही स्थगिती उठवण्याचा निर्णय दिला. स्थगिती आदेश उठल्याने या दुकानांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, तहसीलदारांनी कारवाईचे आदेशदेखील काढले होते. मात्र, कारवाई होणार, हे निश्चित झाल्यावर येथील व्यापाऱ्यांनी पुन्हा राजकीय दबाव निर्माण करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाई रोखण्याची मागणी केली. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात नव्याने सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. पुन्हा सुनावणी होणार असल्याने ही कारवाई तात्पुरती पुढे ढकलली आहे. आता उद्या तारीख मिळते की थेट निर्णय, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)