शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

ठामपा मुख्यालय नवीन जागेत?

By admin | Updated: March 22, 2017 01:28 IST

ठाणे महापालिकेचे पाचपाखाडी भागातील मुख्यालय हलविण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. सध्याच्या मुख्यालयाचा भार दिवसेंदिवस वाढत असून

ठाणे : ठाणे महापालिकेचे पाचपाखाडी भागातील मुख्यालय हलविण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. सध्याच्या मुख्यालयाचा भार दिवसेंदिवस वाढत असून यासाठी नवीन महापालिका भवन बांधण्याचा प्रस्ताव यापूर्वीच तयार केला आहे. मात्र, या प्रस्तावाला फारशी चालना मिळाली नसून तो फायलीतच अडकला आहे. मात्र, येत्या काही महिन्यात सध्याचे मुख्यालय हलविण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याचे बोलले जात आहे.विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयावरून निर्माण झालेला वाद संपला असला तरी या मुद्यावरून दुर्लक्षित राहिलेल्या नवीन प्रशासकीय भवनाच्या प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीला जिल्हा परिषदेसमोर तिचे मुख्यार्यालय होते. या ठिकाणी आता कोणतेच काम होत नसून पाचपाखाडी येथे असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतींमधूनच गेल्या अनेक वर्षांपासून सर्व कारभार हाकला जात आहे. त्याचबरोबर कामाच्या विस्तारीकरणासाठी प्रभागस्तरावर १० प्रभाग कार्यालयेदेखील आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे कामाचा बोजा वाढला असून अनेक विभाग वाढले आहेत. दैनंदिन कामासाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक मुख्यालयात येतात. कामाचा हा ताण कमी करण्यासाठी २०१३ मध्ये नवीन महापालिका भवन बांधण्याचे प्रस्तावित केले होते. या प्रस्तावाबाबत अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नाहीत. २०१३ पासून हा प्रस्ताव तसाच प्राथमिक पातळीवर अडकला आहे. रेमंडच्या सुविधा भूखंडावर हे नवीन महापालिका भवन उभारण्यात येणार होते. ते भविष्यात जरी निर्माण झाले तरी पालिकेचा कारभार दोन्ही प्रशासकीय इमारतींमधून सुरु ठेवण्यात येणार आहे. पालिकेने मुख्यालय वगळता माजिवडा या ठिकाणी नागरी संशोधन केंद्रदेखील बांधले आहे. यामध्ये केवळ महत्त्वाच्या बैठका तसेच संशोधन संदर्भात महत्त्वाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. बराच वेळ पालिकेचे अधिकारी या नागरी संशोधन केंद्रामध्येच उपलब्ध असल्याने त्याच ठिकाणी पालिकेचा अर्धा कारभार सुरु आहे. माजी महापौर अशोक वैती यांनीदेखील महापालिकेचा कारभार नवीन मुख्यालय बांधून त्याठिकाणी हलवावा अशी सूचना केल्यानंतर या प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)