शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

येरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 18:00 IST

जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना 14 दिवसांच्या संचीत रजेवर आलेला आरोपी हा 12 मार्च 2000 रोजी फरार झाला आहे.

अंबरनाथ : जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना 14 दिवसांच्या संचीत रजेवर आलेला आरोपी हा 12 मार्च 2000 रोजी फरार झाला आहे. सुट्टी संपल्यावर त्याने पुन्हा येरवडा तुरुंगात हरज होणे अपेक्षित होते. मात्र तो हजर झाला नव्हता. त्याच्यावर कायदेशिर कारवाई सुरु असतांनाच 18 वर्षानंतर या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुवापाडा येथे राहणारा दंडप्पा पुजारी (37) हा गुन्हेगार हत्येच्या प्रकरणात येरवडा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. ही हत्या 1991 मध्ये झाली होती. त्या प्रकरणात त्याला 1995 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असतांना पुजारी हा 26 फेब्रुवारीला 14 दिवसांच्या संचित रजेवर बाहेर आला होता. मात्र त्यानंतर तो पुन्हा 12 मार्चला येरवडा तुरुंगात पुन्हा हजर होणो अपेक्षित होते. मात्र तो तुरुंगात हजर झालाच नाही. संचित रजेवर बाहेर पडलेल्या आरोपीच्या विरोधात जी कारवाई करणो अपेक्षित होते ती कारवाई त्या काळात करण्यात आली. ती प्रक्रिया सुरु असतांनाच येरवडा तुरुंग प्रशासनाने या आरोपी विरोधात 18 वर्षानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 18 वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. तुरुंगरक्षक जितेंद्र बांदल यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात नेमके काय घडले याचा तपास पोलीस करित आहेत. ज्या वेळेस हा आरोपी फरार झाला होता त्या वेळेस आरोपीच्या विरोधात फरार झाल्याची न्यायालयीन प्रक्रिया करावी लागत होती. त्या काळात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नव्हती. मात्र 2013 मध्ये नवीन आदेश आल्यावर तुरुंगातुन रजेवर गेलेला आरोपी फळाल्यास त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्याचे अधिकार दिले आहेत. या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे एका तुरुंग अधिका-याने लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले. मात्र 2013 ला आलेल्या आदेशानंतरही 4 वर्षानंतर गुन्हा दाखल झाल्याने हा विलंब का झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Yerwadaयेरवडा