शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

घोषणांच्या बाजारात फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 23:28 IST

सरकारविरोधात संताप : पॅकेजचा विसर पडल्याची टीका

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रथम संचारबंदी आणि त्यानंतर लॉकडाऊन लागू केला. या लॉकडाऊनमध्ये रोजी बंद असली तरी रोटीची व्यवस्था केली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साडेपाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यात रिक्षाचालक, फेरीवाले यांच्या खात्यात दीड हजार रुपये १५ ते ३० एप्रिलपर्यंत जमा केले जातील, अशी घोषणा केली. मात्र, आता पुन्हा १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला तरी अद्याप फेरीवाल्यांच्या खात्यात एक दमडीही जमा झालेली नाही.

सरकारची रोटी देण्याची घोषणा केवळ कागदावर असून ती हवेत विरली आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या पॅकेजची रक्कम गेली कुठे असा सवाल फेरीवाले करीत आहेत. सरकारने ही रोटीची रक्कम देण्यासाठी नोंदणीकृत फेरीवाल्यांचा निकष लावला होता. नोंदणी नसलेले फेरीवाले हे माणूस नाहीत का असाही सवाल नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांनी केला. मात्र, आता नोंदणी असलेल्या फेरीवाल्यांच्या पदरातही काही पडलेले नाही. दिवसाला १०० रुपये याप्रमाणे पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनचा अंदाज घेता दीड हजार रुपये जमा करण्यात येतील असे सांगितले होते. पहिल्या पंधरा दिवसांची रक्कमच खात्यात जमा झालेली नसताना लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीसाठी कोणतीही मदत नाही. पहिलीच मदत प्राप्त झालेली नसताना दुसऱ्या मदतीची अपेक्षा कशी काय करणार असा प्रश्न फेरीवाल्यांनी केला आहे. फेरीवाल्यांसाठी लढा देणाऱ्या डाव्या संघटनांनी महाविकास आघाडीची ही घोषणा निव्वळ अफवा होती अशी टीका केली आहे. संचारबंदीयुक्त लॉकडाऊनमुळे १४ एप्रिल ते १५ मे पर्यंतचा फेरीवाल्यांचा धंदा बुडाला आहे. महिनाभर बसून असल्याने कुटुंबाच्या पोटाला खायला  काय घालायचे असा प्रश्न फेरीवाल्यांना सतावित आहे. रोजी पण नाही आणि रोटी पण नाही अशी स्थिती फेरीवाल्यांवर आली आहे.

फेरीवाले काय म्हणतात

आमचा रोजगार बुडाला आहे. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा पूर्ण रोजगार ठप्प होता. लाट ओसरल्यावर कुठे धंदा सुरू झाला होता. आता पुन्हा बंद आहे. पोटाला काय खायचे असा प्रश्न आहे. सरकारने घोषित केलेली मदत खात्यात जमाच झालेली नाही.         -विलास उतेकर

मी नोंदणीकृत फेरीवाला आहे.  राज्य सरकारने लॉकडाऊन करताना जाहीर केलेली रक्कम कशी आणि कुठून मिळणार, याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. त्यामुळे मी मदतीपासून वंचित आहे. माझ्याबरोबर इतरांनाही मदत मिळालेली नाही.         - रामदास बोडके

अनेकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र, त्यापैकी एकाच्याही खात्यात दीड हजार रुपये जमा झालेले नाहीत. घोषणा करणाऱ्या सरकारने केवळ घोषणा करून आशा लावण्यापेक्षा खरोखरच ही मदत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली की नाही याची पाहणी करावी.    - संतोष गुप्ता

सरकारने घोषणा केली आहे. मात्र, त्यासंदर्भातील पत्रक अथवा आदेश आमच्या विभागाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अद्याप आमच्याकडे एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. सरकारी आदेश प्राप्त झाल्याशिवाय नक्की काय व कशा प्रकारे करायचे हे अद्याप स्पष्ट नाही.    - प्रशांत गवाणकर, फेरीवाला विभाग अधिकारी, केडीएमसी.

 

टॅग्स :thaneठाणे