शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

यंदा हापूस महाग, तर कर्नाटकी आंबा स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : आंबा म्हटले की, सगळ्य़ांच्याच तोंडाला पानी सुटते. आंबा हा फळांचा राजा असला तरी यालाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : आंबा म्हटले की, सगळ्य़ांच्याच तोंडाला पानी सुटते. आंबा हा फळांचा राजा असला तरी यालाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे असून, त्यांच्या विक्रीवर लॉकडाऊनचा परिमाण झाला आहे. लॉकडाऊनमध्ये होलसेल व्यापाऱ्यांना दोन तासांची मर्यादा आखून दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून आंब्याची मागणी कमी केली जात आहे. एकीकडे होलसेल बाजारात आंब्याला दीडपट कमी भाव मिळत असला तरी किरकोळ बाजारात हा भाव दीडपटीने जास्त आहे.

बाजारात रत्नागिरीचा हापूस कमी असून कर्नाटकी हापूस जास्त आहे. हापूसच्या जोडीला केशर, पायरी, गावरान आंब्याचीही विक्री केली जात आहे. दशेरी हा आंबा उत्तर भारतातून येतो. त्यालाही मागणी आहे. सध्या बाजारात केशर आणि दशेरी आंब्याची चलती आहे. त्याच्या जोडीला तोतापुरी, अलीबाग, बदाम या आंब्याची विक्री होत आहे. सामान्यांना हापूस परवडत नसल्याने त्यांच्याकडून तोतापुरी, बदाम आणि अलिबाग आंब्याला पसंती दिली जात आहे. मागच्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला. त्यावेळी व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. कारण त्यावेळी शिथिलता नव्हती. फळबाजार सुरू होता. मात्र, मागचे वर्ष फारसे तेजीचे नव्हते. यंदाही फारसी तेजी नाही.

------------

आंबा व्यापारी कोट

१. कोरोनामुळे संचारबंदी आहे. बाजाराची वेळ केवळ दोन तासच आहे. दोन तासांत धंदा काय करणार? त्यामुळे आम्ही माल कमी मागवत आहोत.

- बिसमिल्ला शेख, कल्याण

२. भाव कमी आहे. बाजारात ग्राहक नाहीत. त्यामुळे यंदा आंब्याने निराशा केली आहे. माल मागवून करणार काय? तो खराब होणार. होलसेलला भाव कमी आहे.

-हमीद बाबू, कल्याण

-------------

आंबा उत्पादक शेतकरी अडचणी

१. यंदा अवकाळी पावसामुळे हापूसचे उत्पादन फारसे झाले नाही. त्यामुळे बाजारात कर्नाटकी हापूसला मागणी जास्त आहे. त्यामुळे यंदा हापूस जास्त नाही.

-आबा केसरकर, शेतकरी

२.लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना विक्रीची वेळ कमी दिली आहे. त्यांच्याकडून मालाची मागणी केली जात नाही. त्यामुळे आम्हाला आंबा शेतात विकण्याची वेळ आली आहे. त्याला भाव जास्त नाही. शहरात भाव जास्त मिळतो.

-दिलीप भोगले, शेतकरी.

-------------

आवक असली तरी आम्हीच माल कमी मागवितो

सध्या रत्नागिरी हापूसपेक्षा कर्नाटकी हापूस बाजारात जास्त आहे. कोकणातील हापूस आंब्याऐवजी गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आंब्याची आवक आहे. बाजारात रत्नागिरी हापूस महाग असल्याने सामान्य लोक केशर आंब्याला पसंती देत आहेत. शेतकऱ्यांचे फोन येतात. माल घेता का, म्हणून विचारतात. मात्र, माल मागवून काय करणार? कमी वेळेत धंदा काय करणार? घेतलेला माल वेळेत विकला नाही तर तो खराब होणार. त्यामुळे व्यापारीच माल कमी मागवत आहेत.

-------------

आंब्याचे दर

हापूस (रत्नागिरी)-६०० ते ७०० रुपये डझन

हापूस (कर्नाटक) - ७० रुपये प्रतिकिलो

-------------

आंब्याचे प्रतिकिलो दर (किरकोळ)

केशर-१०० रुपये

पायरी-८० रुपये

गावरान-६० रुपये

-------------

आंब्याचे प्रतिकिलो दर (घाऊक)

केशर-७० रुपये

पायरी-४० रुपये

गावरान-३० रुपये

-------------