शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पावसामुळे हापूस, काजूवर करपा रोगाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:43 IST

वीटभट्टी चालकांमध्येही चिंतेचे वातावरण

ठाणे :  मागील दोन ते तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात ढगाळ वातावरण होते. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने हजरी लावली. सोमवारी सकाळीही पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे गुरांच्या वैरणीसाठी खळ्यात साठवून ठेवलेला पेंढा भिजला असून हापूस आंबा आणि काजूच्या मोहरावर करपा रोगाचे संकट घोंगावू लागले आहे. याशिवाय वीटभट्टी चालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.ठाणे जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपूर्वीपासून झालेल्या बदलामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारी मध्यरात्री तसेच सोमवारीही पावसाने आपले बरसणे सुरू ठेवले. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. कृषी विभागाने पुढील दोन दिवस उत्तर कोकण विभागामध्ये ढगाळ हवामान आणि पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. यामुळे वातावरणातील आर्द्रतेमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने विविध पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे हापूस आंबा आणि काजूच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यावर नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे बुरशीनाशकाची फवारणी करणे उपयुक्त होईल. यासाठी थायोफिनेट मिथाईल एक ग्रॅम प्रति लीटर किंवा कार्बेन्डेंझिम एक ग्रॅम प्रति लीटर किंवा प्रोपीनेब दोन ग्रॅम प्रति लीटर किंवा कार्बेन्डेंझिम १२ टक्के अधिक मॅन्कोझेब ६३ टक्के हे मिश्रण एक ग्रॅम प्रति लीटर पाणी यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची स्टिकर मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाल्यामध्ये केवडा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मॅन्कोझेब २.५ ग्राम प्रति लीटर प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी, असा सल्ला दिला आहे.आरोग्याची काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. तसेच कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.ढगाळ वातावरण, मध्येच पडणारा पाऊस यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. त्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करून नये, असेही खाजगी डॉक्टरांनी सांगितले.