शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

'हरवलेले मूल मुंबईत मिळाल्याचा आनंदच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:18 PM

घरफोडी, चोरी, दरोडे किंवा खून, फसवणूक यासारखे किंवा त्यापेक्षा किचकट गुन्हे आतापर्यंत उघडकीस आणणाऱ्या ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने नुकतेच देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि राजस्थान येथील एक नव्हे तर तीन अल्पवयीन मुलांचा ठाणे, नवी मुंबई व मुंबईसारख्या शहरांमध्ये शोध घेऊन त्यांना सुखरूपरीत्या स्वगृही धाडण्यात यश मिळवले.

- पंकज रोडेकर घरफोडी, चोरी, दरोडे किंवा खून, फसवणूक यासारखे किंवा त्यापेक्षा किचकट गुन्हे आतापर्यंत उघडकीस आणणाऱ्या ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने नुकतेच देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि राजस्थान येथील एक नव्हे तर तीन अल्पवयीन मुलांचा ठाणे, नवी मुंबई व मुंबईसारख्या शहरांमध्ये शोध घेऊन त्यांना सुखरूपरीत्या स्वगृही धाडण्यात यश मिळवले. यासंदर्भात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद...अपहरणाचे गुन्हे ठाण्यात किंवा मुंबईत दाखल नसताना ते कसे उघडकीस आणले?ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्वच पोलीस दलातील शाखांना अपहरण यासारखे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यातूनच मिळालेल्या माहितीच्या आधारे, दिल्लीतील मुलीचा विश्वास संपादन केला. त्यातून तिने सुरुवातीला वेगवेगळी खरी वाटेल अशी माहिती देताना, आईवडील नसल्याचे सांगितले. मात्र, शोध घेतल्यावर आईवडील असल्याचे समोर आले. तर, राजस्थान येथील मुलांबाबत स्थानिक पोलिसांना ही मुले ठाणे किंवा नवी मुंबई यासारख्या परिसरांत आहेत, असे समजले होते. त्यानुसार, त्यांचा शोध घेऊन हे गुन्हे उघडकीस आणले.चोरी, हत्या किंवा दरोडा यापेक्षा अपहरण गुन्ह्याचा तपास किती वेगळ्या प्रकारे करावा लागतोे?चोरी, हत्या किंवा दरोडा यासारख्या गुन्ह्यात नेमकी काहीतरी कारणे असतात. मात्र, या गुन्ह्यात तशी काही कारणे नसतात. त्यातच, सर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील हरवलेल्या मुलांची मिसिंग अशी नोंद न करता अपहरणाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यातच, हा गुन्हा इतर गुन्ह्यांपेक्षा निश्चित वेगळा आहे. यामध्ये त्या मुलांचा प्रथम विश्वास संपादन करून त्यांना बोलते करावे लागते. त्यातून त्यांच्याकडून थोडी तरी माहिती मिळाली की, तो गुन्हा उघडकीस येतो.मुले का घर सोडून पळतात?घरची मंडळी लहान वयात लग्न लावून देतील. तसेच आपल्यापेक्षा लहान भावंडांवर आईवडील जास्त प्रेम करतात. तर, एखाद्या परीक्षेत नापास झाल्याने मारण्याच्या भीतीने, घरातील पालकांची भांडणे, वडिलांचे व्यसन त्याचबरोबर प्रेमप्रकरण आदी कारणांतून मुले घर सोडतात.तुम्ही मुलांसह पालकांना काय सांगाल?मुलांपेक्षा पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. पालकांच्या दिवसेंदिवस मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच, कडक वागणूक यामुळे सुरक्षित वातावरण शोधण्यासाठी मुले घरातून पळ काढतात. त्यामुळे पालकांनी पाल्यांमधील बदलाकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून आपल्या पाल्याची माहिती घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमताही लक्षात घेऊन त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा करू नये. त्यातच, पालकांनी आपल्या चुका पहिल्या सुधारल्या पाहिजेत.