शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भिवंडी: तिरंगा झेंडा बनविणारे हात कामात व्यस्त; शासनाच्या हर घर तिरंगा कार्यक्रमामुळे कामगारांवर वाढला ताण

By नितीन पंडित | Updated: August 6, 2022 09:25 IST

देशाच्या पंचात्तराव्या अमृत मोहत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त शासनाने हर घर तिरंगा मोहीम देशभर राबवण्याचे ठरविले आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क 

भिवंडी: देशाच्या पंचात्तराव्या अमृत मोहत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त शासनाने हर घर तिरंगा मोहीम देशभर राबवण्याचे ठरविले आहे. या मोहिमेअंतर्गत यावर्षी मोठ्या प्रमाणात तिरंगा झेंड्यांची खरेदी विक्री होणार आहे.झेंडा खरेदी विक्रीसाठी शासनाने विविध उपाययोजना केला असल्या तरी सध्या १५ ऑगस्टजवळ आल्याने तिरंगा झेंडा बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हात कामात व्यस्त झाले आहेत.विशेष म्हणजे या वर्षी हर घर तिरंगा मोहीम पहिल्यांदा राबविली जात असल्याने या कामगारांवर कामाचा अतिरिक्त ताण देखील वाढला आहे. 

भिवंडीतील दापोडा येथील साई धाम कॉम्पलेक्समध्ये दि फ्लॅग शॉप या कंपनीचा झेंडे बनविण्याचा कारखाना आहे.या कारखान्यात सध्या झेंडे बनविणारे कर्मचारी कामात व्यस्त आहेत.स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून हर घर तिरंगा मोहिमेमुळे या कंपनीतील कामगार सध्या तिरंगा झेंडा बनविण्यात प्रचंड व्यस्त आहेत. त्यातच काही कामगार बाहेरगावी तर काही कामगार कंपनीच्या दुसऱ्या शाखेत गेल्याने भिवंडीतील कारखान्यात सचिन गमरे व सिराज उलहक हे दोन कामगार झेंडा बनविण्याच्या कामात व्यस्त दिसले.या कंपनीत २ बाय ३ इंच तसेच ४ बाय ६ इंच पासून ते ४८ बाय ७१ फूट तसेच ६० बाय ९० फुटांपर्यंतचे लहान मोठे सर्वच झेंडे बनविले जात असून २ बाय ३ फूट ते ४ बाय ६ फुटाच्या मोजमापाचे सुमारे २०० ते ३०० झेंडे या कारखान्यात दिवसाला बनविले जातात. तर मोठे झेंडे एका दिवसात आठ पर्यंत बनविण्यात येत असल्याची माहिती येथील कामगारांनी दिली आहे.

कारखान्यात कामगारांना आठ तासांचे काम आहे मात्र सध्या झेंड्यांची मागणी वाढल्यामुळे येथील कामगारांना सकाळी १० ते रात्री १० असे बारा तास काम करावे लागत असून त्यासाठी कंपनीकडून २० ते २५ हजार रुपयांचे मासिक वेतन येथील कामगारांना दिले जाते.विशेष म्हणजे देशाच्या तिरंगी झेंड्याबरोबरच या कारखान्यात जगातील २५२ हुन अधिक देशांचे झेंडे बनविण्यात येत असून राजकीय पुढारी झेंड्यांची अर्धवट रक्कम देत नसल्याने राजकीय झेंडे येथे बनविले जात नसल्यची माहिती कामगारांनी दिली आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी