शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भिवंडी: तिरंगा झेंडा बनविणारे हात कामात व्यस्त; शासनाच्या हर घर तिरंगा कार्यक्रमामुळे कामगारांवर वाढला ताण

By नितीन पंडित | Updated: August 6, 2022 09:25 IST

देशाच्या पंचात्तराव्या अमृत मोहत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त शासनाने हर घर तिरंगा मोहीम देशभर राबवण्याचे ठरविले आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क 

भिवंडी: देशाच्या पंचात्तराव्या अमृत मोहत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त शासनाने हर घर तिरंगा मोहीम देशभर राबवण्याचे ठरविले आहे. या मोहिमेअंतर्गत यावर्षी मोठ्या प्रमाणात तिरंगा झेंड्यांची खरेदी विक्री होणार आहे.झेंडा खरेदी विक्रीसाठी शासनाने विविध उपाययोजना केला असल्या तरी सध्या १५ ऑगस्टजवळ आल्याने तिरंगा झेंडा बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हात कामात व्यस्त झाले आहेत.विशेष म्हणजे या वर्षी हर घर तिरंगा मोहीम पहिल्यांदा राबविली जात असल्याने या कामगारांवर कामाचा अतिरिक्त ताण देखील वाढला आहे. 

भिवंडीतील दापोडा येथील साई धाम कॉम्पलेक्समध्ये दि फ्लॅग शॉप या कंपनीचा झेंडे बनविण्याचा कारखाना आहे.या कारखान्यात सध्या झेंडे बनविणारे कर्मचारी कामात व्यस्त आहेत.स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून हर घर तिरंगा मोहिमेमुळे या कंपनीतील कामगार सध्या तिरंगा झेंडा बनविण्यात प्रचंड व्यस्त आहेत. त्यातच काही कामगार बाहेरगावी तर काही कामगार कंपनीच्या दुसऱ्या शाखेत गेल्याने भिवंडीतील कारखान्यात सचिन गमरे व सिराज उलहक हे दोन कामगार झेंडा बनविण्याच्या कामात व्यस्त दिसले.या कंपनीत २ बाय ३ इंच तसेच ४ बाय ६ इंच पासून ते ४८ बाय ७१ फूट तसेच ६० बाय ९० फुटांपर्यंतचे लहान मोठे सर्वच झेंडे बनविले जात असून २ बाय ३ फूट ते ४ बाय ६ फुटाच्या मोजमापाचे सुमारे २०० ते ३०० झेंडे या कारखान्यात दिवसाला बनविले जातात. तर मोठे झेंडे एका दिवसात आठ पर्यंत बनविण्यात येत असल्याची माहिती येथील कामगारांनी दिली आहे.

कारखान्यात कामगारांना आठ तासांचे काम आहे मात्र सध्या झेंड्यांची मागणी वाढल्यामुळे येथील कामगारांना सकाळी १० ते रात्री १० असे बारा तास काम करावे लागत असून त्यासाठी कंपनीकडून २० ते २५ हजार रुपयांचे मासिक वेतन येथील कामगारांना दिले जाते.विशेष म्हणजे देशाच्या तिरंगी झेंड्याबरोबरच या कारखान्यात जगातील २५२ हुन अधिक देशांचे झेंडे बनविण्यात येत असून राजकीय पुढारी झेंड्यांची अर्धवट रक्कम देत नसल्याने राजकीय झेंडे येथे बनविले जात नसल्यची माहिती कामगारांनी दिली आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी