शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

भिवंडी: तिरंगा झेंडा बनविणारे हात कामात व्यस्त; शासनाच्या हर घर तिरंगा कार्यक्रमामुळे कामगारांवर वाढला ताण

By नितीन पंडित | Updated: August 6, 2022 09:25 IST

देशाच्या पंचात्तराव्या अमृत मोहत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त शासनाने हर घर तिरंगा मोहीम देशभर राबवण्याचे ठरविले आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क 

भिवंडी: देशाच्या पंचात्तराव्या अमृत मोहत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त शासनाने हर घर तिरंगा मोहीम देशभर राबवण्याचे ठरविले आहे. या मोहिमेअंतर्गत यावर्षी मोठ्या प्रमाणात तिरंगा झेंड्यांची खरेदी विक्री होणार आहे.झेंडा खरेदी विक्रीसाठी शासनाने विविध उपाययोजना केला असल्या तरी सध्या १५ ऑगस्टजवळ आल्याने तिरंगा झेंडा बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हात कामात व्यस्त झाले आहेत.विशेष म्हणजे या वर्षी हर घर तिरंगा मोहीम पहिल्यांदा राबविली जात असल्याने या कामगारांवर कामाचा अतिरिक्त ताण देखील वाढला आहे. 

भिवंडीतील दापोडा येथील साई धाम कॉम्पलेक्समध्ये दि फ्लॅग शॉप या कंपनीचा झेंडे बनविण्याचा कारखाना आहे.या कारखान्यात सध्या झेंडे बनविणारे कर्मचारी कामात व्यस्त आहेत.स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून हर घर तिरंगा मोहिमेमुळे या कंपनीतील कामगार सध्या तिरंगा झेंडा बनविण्यात प्रचंड व्यस्त आहेत. त्यातच काही कामगार बाहेरगावी तर काही कामगार कंपनीच्या दुसऱ्या शाखेत गेल्याने भिवंडीतील कारखान्यात सचिन गमरे व सिराज उलहक हे दोन कामगार झेंडा बनविण्याच्या कामात व्यस्त दिसले.या कंपनीत २ बाय ३ इंच तसेच ४ बाय ६ इंच पासून ते ४८ बाय ७१ फूट तसेच ६० बाय ९० फुटांपर्यंतचे लहान मोठे सर्वच झेंडे बनविले जात असून २ बाय ३ फूट ते ४ बाय ६ फुटाच्या मोजमापाचे सुमारे २०० ते ३०० झेंडे या कारखान्यात दिवसाला बनविले जातात. तर मोठे झेंडे एका दिवसात आठ पर्यंत बनविण्यात येत असल्याची माहिती येथील कामगारांनी दिली आहे.

कारखान्यात कामगारांना आठ तासांचे काम आहे मात्र सध्या झेंड्यांची मागणी वाढल्यामुळे येथील कामगारांना सकाळी १० ते रात्री १० असे बारा तास काम करावे लागत असून त्यासाठी कंपनीकडून २० ते २५ हजार रुपयांचे मासिक वेतन येथील कामगारांना दिले जाते.विशेष म्हणजे देशाच्या तिरंगी झेंड्याबरोबरच या कारखान्यात जगातील २५२ हुन अधिक देशांचे झेंडे बनविण्यात येत असून राजकीय पुढारी झेंड्यांची अर्धवट रक्कम देत नसल्याने राजकीय झेंडे येथे बनविले जात नसल्यची माहिती कामगारांनी दिली आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी