शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील पाणी टंचाई विरोधात श्रमजीवीचा दहा ग्राम पंचायतींवर 'हंडा मोर्चा'

By नितीन पंडित | Updated: April 1, 2024 19:09 IST

भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.

भिवंडी: तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत क्षेत्रातील नळ पाणी पुरवठा योजना ठप्प पडलेल्या असल्याने तेथील अनेक आदिवासी पाडे वस्त्यांवर पाणी नसल्याने या पाणीटंचाईच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी सोमवारी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील दहा ग्रामपंचायत कार्यालयांवर हंडा मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात शेकडो महिला व नागरिक सहभागी झाले होते.

तालुक्यातील गणेशपुरी,अकलोली,वज्रेश्वरी, महाळूंगे, घोटगाव, दाभाड, राहुर, धामणगाव, वडपे व जुनांदुर्खी या गावातील आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाईची भीषणता अधिक असताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप यावेळी श्रमजीवीचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांनी केला आहे.

भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. परंतु अनेक गावांमध्ये पाण्याचे स्तोत्र नसताना कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असून, कागदा वरील ठेकेदार व प्रत्यक्षात काम करणारे ठेकेदार हे वेगवेगळे असल्या कारणाने ही कामे रेंगाळत पडले असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य ग्रामीण जनतेला बसत असल्याचा आरोप अशोक सापटे यांनी केला आहे.

या मोर्चामध्ये प्रवक्ता प्रमोद पवार,तालुकाध्यक्ष सुनील लोणे,शहराध्यक्ष सागर देसक,महेंद्र निरगुडा, मोतीराम नामखुडा यांसह स्थानिक गाव कमिटी सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ज्या गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकट आहे तेथे तात्काळ टँकर द्वारे पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी या मोर्चाच्या वतीने सर्व ग्रामपंचायत प्रशासना कडे करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी