शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

भिवंडीतील पाणी टंचाई विरोधात श्रमजीवीचा दहा ग्राम पंचायतींवर 'हंडा मोर्चा'

By नितीन पंडित | Updated: April 1, 2024 19:09 IST

भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.

भिवंडी: तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत क्षेत्रातील नळ पाणी पुरवठा योजना ठप्प पडलेल्या असल्याने तेथील अनेक आदिवासी पाडे वस्त्यांवर पाणी नसल्याने या पाणीटंचाईच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी सोमवारी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील दहा ग्रामपंचायत कार्यालयांवर हंडा मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात शेकडो महिला व नागरिक सहभागी झाले होते.

तालुक्यातील गणेशपुरी,अकलोली,वज्रेश्वरी, महाळूंगे, घोटगाव, दाभाड, राहुर, धामणगाव, वडपे व जुनांदुर्खी या गावातील आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाईची भीषणता अधिक असताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप यावेळी श्रमजीवीचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांनी केला आहे.

भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. परंतु अनेक गावांमध्ये पाण्याचे स्तोत्र नसताना कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असून, कागदा वरील ठेकेदार व प्रत्यक्षात काम करणारे ठेकेदार हे वेगवेगळे असल्या कारणाने ही कामे रेंगाळत पडले असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य ग्रामीण जनतेला बसत असल्याचा आरोप अशोक सापटे यांनी केला आहे.

या मोर्चामध्ये प्रवक्ता प्रमोद पवार,तालुकाध्यक्ष सुनील लोणे,शहराध्यक्ष सागर देसक,महेंद्र निरगुडा, मोतीराम नामखुडा यांसह स्थानिक गाव कमिटी सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ज्या गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकट आहे तेथे तात्काळ टँकर द्वारे पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी या मोर्चाच्या वतीने सर्व ग्रामपंचायत प्रशासना कडे करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी