शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

कल्याणच्या पत्रीपुलाचे बांधकाम लष्कराकडे हस्तांतरित करा; आमदार नरेंद्र पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 19:19 IST

कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अंदाजे १०० वर्षापूर्वीचा पत्रीपूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अंदाजे १०० वर्षापूर्वीचा पत्रीपूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र गेली अनेक महिने कामामध्ये प्रगती जाणवत नाही. वाहतूक वाढल्याने नवीन समांतर पुलावर वाहतूक कोंडी होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. प्रशासन गतीने काम करत नसल्याने कल्याणकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत असल्याने आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पत्रीपूलाचे बांधकाम तातडीने लष्कराकडे हस्तांतरीत करण्याची मागणी केली. 

आंबिवली रेल्वे स्थानकावरचा पूल लष्कराने विक्रमी वेळात उभारल्याचे उदाहरण समोर असल्याने पत्रिपुलाचे बांधकामही लष्कराकडे सोपविण्यासंदर्भात आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नुकताच पत्रिपुलावर एका व्यक्तीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजनही काही महिन्यांपूर्वी झाले आहे, मात्र कामात गती येत नसल्याने आमदार पवार यांनी ही मागणी केली आहे. या पूलावरुन नवी मुंबई, पनवेल, अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली तसेच लांब पल्ल्याच्या वाहनांची रहदारी असते. मात्र जुना पूल तोडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे याचा फटका केवळ कल्याण – डोंबिवली नागरिकांनाच बसत नाही तर रुग्णवाहिकांनाही सहन करावा लागत आहे.    

यासंदर्भात पत्रिपुलाचे बांधकाम लष्कराकडे सोपविण्यासाठी तातडीने संबंधित विभागासा आदेश देऊन नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशीही मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका