शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

दुकान बंद असल्याने कामगारांना निम्मा पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

अंबरनाथ : दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार देणे, हे दुकानदारांना बंधनकारक आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळून ठेवण्यासाठी काही ...

अंबरनाथ : दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार देणे, हे दुकानदारांना बंधनकारक आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळून ठेवण्यासाठी काही व्यापारी दुकान बंद असतानाही निम्मा पगार देऊन माणुसकी दाखवत आहेत. अद्याप लॉकडाऊन पूर्णपणे जाहीर न झाल्याने कर्मचारी आपल्या गावी जाण्यास तयार नाहीत. मात्र, ज्या दुकानात पगार देण्यास नकार दिला आहे, त्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी गावाला जाण्याचा मार्ग निवडला आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त फटका सोनेचांदी, कापड व्यापारी यांना बसला आहे. या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देणे आता दुकानमालकांना शक्य होत नाही. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमधील व्यावसायिक फटक्यातून सावरत नाही, तोच पुन्हा नव्या लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या कामगारांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित होत आहे. व्यवसायच होत नसेल तर कामगारांना पगार कुठून द्यावा, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांनी दुकानातील कामगारांना कामावरून कमी केले आहे. तर, निम्म्या कामगारांना अर्ध्या पगारावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या ठिकाणी काम मिळणे शक्य नसल्याने हे कामगारही निम्म्या पगारावर काम करण्यास तयार होत आहेत. जे कामगार परप्रांतातून आले आहेत, त्यांनी अपुऱ्या पगारामुळे आणि नोकरीवरून कमी केल्यामुळे गावाला जाण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र, त्यांची संख्या अल्प असून काही दुकानदार आणि त्या दुकानातील कामगार लॉकडाऊन कमी होण्याची वाट पाहत आहेत.

गेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील कर्मचारी आधीच कमी केले होते. त्यानंतर, दुकाने सुरू झाल्यावर दुकानमालकांनी जास्तीचे कर्मचारी न भरता आहेत त्या कर्मचाऱ्यांवर कसेबसे काम करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागल्याने दुकानातील कामगारांना सांभाळल्याशिवाय दुकानमालकांना पर्याय शिल्लक राहिलेला नाही. प्रशिक्षित कामगार पुन्हा मिळत नसल्याने काही दुकानदारांनी या कामगारांना निम्म्या पगारावर कामावर ठेवले आहे.