शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दुकान बंद असल्याने कामगारांना निम्मा पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

अंबरनाथ : दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार देणे, हे दुकानदारांना बंधनकारक आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळून ठेवण्यासाठी काही ...

अंबरनाथ : दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार देणे, हे दुकानदारांना बंधनकारक आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळून ठेवण्यासाठी काही व्यापारी दुकान बंद असतानाही निम्मा पगार देऊन माणुसकी दाखवत आहेत. अद्याप लॉकडाऊन पूर्णपणे जाहीर न झाल्याने कर्मचारी आपल्या गावी जाण्यास तयार नाहीत. मात्र, ज्या दुकानात पगार देण्यास नकार दिला आहे, त्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी गावाला जाण्याचा मार्ग निवडला आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त फटका सोनेचांदी, कापड व्यापारी यांना बसला आहे. या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देणे आता दुकानमालकांना शक्य होत नाही. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमधील व्यावसायिक फटक्यातून सावरत नाही, तोच पुन्हा नव्या लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या कामगारांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित होत आहे. व्यवसायच होत नसेल तर कामगारांना पगार कुठून द्यावा, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांनी दुकानातील कामगारांना कामावरून कमी केले आहे. तर, निम्म्या कामगारांना अर्ध्या पगारावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या ठिकाणी काम मिळणे शक्य नसल्याने हे कामगारही निम्म्या पगारावर काम करण्यास तयार होत आहेत. जे कामगार परप्रांतातून आले आहेत, त्यांनी अपुऱ्या पगारामुळे आणि नोकरीवरून कमी केल्यामुळे गावाला जाण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र, त्यांची संख्या अल्प असून काही दुकानदार आणि त्या दुकानातील कामगार लॉकडाऊन कमी होण्याची वाट पाहत आहेत.

गेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील कर्मचारी आधीच कमी केले होते. त्यानंतर, दुकाने सुरू झाल्यावर दुकानमालकांनी जास्तीचे कर्मचारी न भरता आहेत त्या कर्मचाऱ्यांवर कसेबसे काम करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागल्याने दुकानातील कामगारांना सांभाळल्याशिवाय दुकानमालकांना पर्याय शिल्लक राहिलेला नाही. प्रशिक्षित कामगार पुन्हा मिळत नसल्याने काही दुकानदारांनी या कामगारांना निम्म्या पगारावर कामावर ठेवले आहे.