शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

प्रश्न विचारण्याची सवय आणि संशोधक वृत्ती वाढली पाहिजे – डॉ. संग्राम पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 15:43 IST

आपल्या देशात प्रश्न विचारायची सवय आणि संशोधक वृत्ती वाढवली पाहिजे, असे मत मूळचे महाराष्ट्रीयन आणि सध्या इंग्लंड येथील वैद्यकीय सेवेत कार्यरत असणारे डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केले.

कल्याण : कोरोना काळात ज्योतिष, गुरु, बाबा, मांत्रिक, अध्यात्मिक लोक, देवधर्माच्या संबंधित सर्वांनीच मैदानातून पळ काढला आहे. मानवी जीवन मौल्यवान असून प्रत्येकाने विवेकशीलता जपली पाहिजे. आपल्या देशात प्रश्न विचारायची सवय आणि संशोधक वृत्ती वाढवली पाहिजे, असे मत मूळचे महाराष्ट्रीयन आणि सध्या इंग्लंड येथील वैद्यकीय सेवेत कार्यरत असणारे डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केले. नुकताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात "कोरोना कडून आपण काय शिकावे ?" या विषयावर ते बोलत होते.

डॉ. संग्राम पाटील म्हणाले, राजकीय सजगतेचा अभाव आपल्या देशात दिसतो. देशात या आजाराची गंभीर परिस्थिती असताना धार्मिक कार्यक्रम घडवले जातात. कष्टर्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्यापेक्षा एका अभिनेत्याची आत्महत्या हा मुद्दा जास्त महत्वाचा  ठरतो. धर्म, प्रांत यांच्या अस्मितेपेक्षा माणुसकी महत्वाची ठरली पाहिजे. जगभरात सध्या एकाच प्रश्नाला भिडले जाते, ते म्हणजे कोरोनावर मात करणे.

लोकांचे प्रश्न, लोकांचे प्राण वाचवणे, लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती देणे. आपल्याकडे संशोधन वृत्तीला महत्त्व दिले जात नाही. शासकीय यंत्रणा माध्यमे यांच्या गैर व्यवस्थापनाने कोरोनाची भीती वाढली. योग्य काळजी घेतल्यास या आजारातून आपण नक्कीच बरे होऊ शकतो. आधुनिक जग हे पुराव्यावर विश्वास ठेवते. आपल्या देशात वैज्ञानिक दृष्टीकोन याला डावलून  फसवे विज्ञानाची चलती ही चिंताजनक आहे. निसर्गाने मानवाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याचा सुयोग्य वापर करावा. कोरोना आजाराकडे संधी म्हणून बघू या, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य दिल्यास कोरोनाशी यशस्वी मुकाबला करणे शक्य आहे.  

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते. ते म्हणाले की, अं नि स च्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी या कोरोना काळात खूप मोलाचे कार्य केले आहे. मुख्यमंत्री निधीला मदत, रक्तदान, अन्न दान करण्याचे, मानस मैत्र माध्यमातून मानसिक आधार देण्याचे काम केले आहे. या दरम्यान विविध अंधश्रद्धा पुढे आल्या. त्यालाही विरोध केला, लोकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस