शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

 उल्हासनगर महापालिका समोर कामगार नेत्यांचे गुरगुंडा आंदोलन; कंत्राटी कामगारांचा ठेका रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 14:52 IST

महापालिकेचा कारभार प्रभारी अधिकारी व कामगाराकडे?

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील साफसफाईसाठी २७० कंत्राटी कामगार ठेक्या पद्धतीवर घेण्याला कामगार संघटनेसह विविध राजकीय पक्षानी विरोध करूनही ठेक्याला मंजुरी दिल्याच्या निषेधार्थ कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी महापालिका समोर गुरगुंडा आंदोलन केले. यावेळी ठेका रद्द करण्याची मागणी करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा साठे यांनी दिला. 

उल्हासनगर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी, साफसफाईसाठी ठेक्क्यावर २७० सफाई कामगारांची नियुक्ती महापालिका करणार आहे. कंत्राटी कामगाराच्या ठेक्यासाठी परस्परांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले भाजप व शिवसेना पक्ष एकत्र येऊन, २७० कंत्राटी कामगार ठेक्यावर घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. याप्रकारने एकच खळबळ उडाली असून भाजप-शिवसेनेच्या ध्येयधोरणावर शहरातून टीका झाली.

सत्ताधारी शिवसेना पक्षाचे मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, ओमी कलानी टीम व साई पक्षाने प्रस्तावाला विरोध करून यामध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला. तसेच सर्वच कामगार संघटनेने कंत्राटी कामगार घेण्याला विरोध करून, आंदोलनाचा इशारा दिला होता. कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी महापालिकेत काही राजकीय पक्ष सफाई कामगारात ठेकेदार पद्धत आणू पाहत आहे. त्यांचे कामगारा विरोधातील मनसुबे कामगार संघटना हाणून पाडणार असल्याची प्रतिक्रिया साठे यांनी दिली. 

महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना कंत्राटी कामगार घेण्याला कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी विरोध करण्याचे निवेदन यापूर्वीच देऊन, गुरगुंडा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार साठे यांनी सोमवारी महापालिका प्रवेशद्वार समोर गुरगुंडा आंदोलन करून कंत्राटी कामगार ठेक्याला विरोध दर्शविला. आरोग्य विभागाचे उपायुक्त मदन सोंडे यांनी महापालिकेच्या वतीने राधाकृष्ण साठे यांचे निवेदन स्वीकारुन महापालिका आयुक्ताकडे विचारांती निवेदन ठेवण्याचे आश्वासन दिले. महापालिकेत वर्ग-१ व २ ची ७०टक्के पदे रिक्त असून वर्ग-३ व ४ ची ३५ टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहे. रिक्त पदे भरून काढण्यासाठी कंत्राटी पदे भरण्याचा सपाटा महापालिकेने लावला असून महापालिका प्रभारी अधिकारी व कामगाराच्या हाता खालचे बाहुले बनल्याची प्रतिक्रिया साठे यांनी दिली.

 महापालिकेचा कारभार प्रभारी अधिकारी व कामगाराकडे?

महापालिकेच्या इतिहासात चार उपायुक्त मिळाले असलेतरी, शहर अभियंता, पाणी पुरवठा, विधुत व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पदे रिक्त आहेत, तसेच विधी अधिकारी, भांडार विभाग, पालिका सचिव, विधी अधिकारी, करनिर्धारक, नगररचनाकार संचालक, ४ सहायक आयुक्त आदी पदे रिक्त असून कनिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रभारी पदे देण्यात आली. तरथेट कामगारांची नियुक्ती न करता, प्रत्येक विभागात कंत्राटी पद्धतीने कामगार घेतले जात आहेत. वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर