शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

तोफा थंडावल्या, उद्या मतदान; ठाण्यातील तीनही मतदारसंघांत दुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:43 IST

प्रशासन सज्ज, अखेरच्या दिवशी उमेदवारांची तारांबळ, मतदारांच्या भेटीगाठी

ठाणे : ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत असून, युती आणि आघाडीमध्ये तीनही मतदारसंघांत लढत होणार आहे. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, शनिवारी तीनही मतदारसंघांत उमेदवारांची सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचारासाठी चांगलीच तारांबळ उडाली.

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची लढत ही राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्याशी होत आहे. मागील काही दिवस त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचारात चांगलीच रंगत आली होती.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे हे दुसºयांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्याशी होत आहे. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून जातीच्या आणि आगरीकार्डच्या मुद्यावर प्रचार तापला होता. भिवंडीत भाजपचे कपिल पाटील हेसुद्धा दुसºयांदा रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्याशी होत आहे. या मतदारसंघात आगरी, कुणबी मते निर्णायक असून, पाटील यांच्या विरोधातील वातावरणामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रा.डॉ. अरुण सावंत हेदेखील रिंगणात असून, त्यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोदी सरकार संपूर्ण प्रचाराचे केंद्रबिंदू राहिले. भाजपने मोदी सरकारच्या यशोगाथा, तर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने अपयशाचे पाढे मतदारांसमोर वाचले. यावेळी प्रचारात फारशी आक्रमकता नव्हती. उलटपक्षी, मतदारांच्या गाठीभेठी व कॉर्नर मीटिंगवर उमेदवारांनी भर दिला.

निवडणुकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपला. अखेरचा दिवस असल्याने उमेदवारांची मतदारांच्या गाठीभेठीसाठी तारांबळ उडाली होती. आता मतदानापर्यंत मूक प्रचार होणार असून, मतदारांच्या घरोघरी वचननामा, जाहीरनामा पोहोचवण्याचे कामही पूर्ण झाले आहे. आता जिल्ह्यातील ६२ लाख २५ हजार १९४ मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न तीनही मतदारसंघांतील उमेदवारांकडून केला जाणार आहे.

मतदान वेळ सकाळी ७ ते सायं. ६ पर्यंतमतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मतदानकेंद्रांत ६ वाजेपर्यंत रांगेत असणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदानकेंद्रांतील अधिकारी कूपन देतील. ज्यांच्याजवळ कूपन असेल, त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthane-pcठाणेbhiwandi-pcभिवंडीkalyan-pcकल्याणMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019