शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

तोफा थंडावल्या, उद्या मतदान; ठाण्यातील तीनही मतदारसंघांत दुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:43 IST

प्रशासन सज्ज, अखेरच्या दिवशी उमेदवारांची तारांबळ, मतदारांच्या भेटीगाठी

ठाणे : ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत असून, युती आणि आघाडीमध्ये तीनही मतदारसंघांत लढत होणार आहे. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, शनिवारी तीनही मतदारसंघांत उमेदवारांची सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचारासाठी चांगलीच तारांबळ उडाली.

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची लढत ही राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्याशी होत आहे. मागील काही दिवस त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचारात चांगलीच रंगत आली होती.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे हे दुसºयांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्याशी होत आहे. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून जातीच्या आणि आगरीकार्डच्या मुद्यावर प्रचार तापला होता. भिवंडीत भाजपचे कपिल पाटील हेसुद्धा दुसºयांदा रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्याशी होत आहे. या मतदारसंघात आगरी, कुणबी मते निर्णायक असून, पाटील यांच्या विरोधातील वातावरणामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रा.डॉ. अरुण सावंत हेदेखील रिंगणात असून, त्यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोदी सरकार संपूर्ण प्रचाराचे केंद्रबिंदू राहिले. भाजपने मोदी सरकारच्या यशोगाथा, तर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने अपयशाचे पाढे मतदारांसमोर वाचले. यावेळी प्रचारात फारशी आक्रमकता नव्हती. उलटपक्षी, मतदारांच्या गाठीभेठी व कॉर्नर मीटिंगवर उमेदवारांनी भर दिला.

निवडणुकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपला. अखेरचा दिवस असल्याने उमेदवारांची मतदारांच्या गाठीभेठीसाठी तारांबळ उडाली होती. आता मतदानापर्यंत मूक प्रचार होणार असून, मतदारांच्या घरोघरी वचननामा, जाहीरनामा पोहोचवण्याचे कामही पूर्ण झाले आहे. आता जिल्ह्यातील ६२ लाख २५ हजार १९४ मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न तीनही मतदारसंघांतील उमेदवारांकडून केला जाणार आहे.

मतदान वेळ सकाळी ७ ते सायं. ६ पर्यंतमतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मतदानकेंद्रांत ६ वाजेपर्यंत रांगेत असणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदानकेंद्रांतील अधिकारी कूपन देतील. ज्यांच्याजवळ कूपन असेल, त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthane-pcठाणेbhiwandi-pcभिवंडीkalyan-pcकल्याणMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019