शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तोफा थंडावल्या, उद्या मतदान; ठाण्यातील तीनही मतदारसंघांत दुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:43 IST

प्रशासन सज्ज, अखेरच्या दिवशी उमेदवारांची तारांबळ, मतदारांच्या भेटीगाठी

ठाणे : ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत असून, युती आणि आघाडीमध्ये तीनही मतदारसंघांत लढत होणार आहे. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, शनिवारी तीनही मतदारसंघांत उमेदवारांची सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचारासाठी चांगलीच तारांबळ उडाली.

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची लढत ही राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्याशी होत आहे. मागील काही दिवस त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचारात चांगलीच रंगत आली होती.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे हे दुसºयांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्याशी होत आहे. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून जातीच्या आणि आगरीकार्डच्या मुद्यावर प्रचार तापला होता. भिवंडीत भाजपचे कपिल पाटील हेसुद्धा दुसºयांदा रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्याशी होत आहे. या मतदारसंघात आगरी, कुणबी मते निर्णायक असून, पाटील यांच्या विरोधातील वातावरणामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रा.डॉ. अरुण सावंत हेदेखील रिंगणात असून, त्यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोदी सरकार संपूर्ण प्रचाराचे केंद्रबिंदू राहिले. भाजपने मोदी सरकारच्या यशोगाथा, तर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने अपयशाचे पाढे मतदारांसमोर वाचले. यावेळी प्रचारात फारशी आक्रमकता नव्हती. उलटपक्षी, मतदारांच्या गाठीभेठी व कॉर्नर मीटिंगवर उमेदवारांनी भर दिला.

निवडणुकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपला. अखेरचा दिवस असल्याने उमेदवारांची मतदारांच्या गाठीभेठीसाठी तारांबळ उडाली होती. आता मतदानापर्यंत मूक प्रचार होणार असून, मतदारांच्या घरोघरी वचननामा, जाहीरनामा पोहोचवण्याचे कामही पूर्ण झाले आहे. आता जिल्ह्यातील ६२ लाख २५ हजार १९४ मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न तीनही मतदारसंघांतील उमेदवारांकडून केला जाणार आहे.

मतदान वेळ सकाळी ७ ते सायं. ६ पर्यंतमतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मतदानकेंद्रांत ६ वाजेपर्यंत रांगेत असणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदानकेंद्रांतील अधिकारी कूपन देतील. ज्यांच्याजवळ कूपन असेल, त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthane-pcठाणेbhiwandi-pcभिवंडीkalyan-pcकल्याणMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019